शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

२० टक्के रोवण्या अजूनही अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 00:11 IST

हव्या त्या प्रमाणात पाऊस पडत नसल्याने आजही अनेक शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत.

नुकसान भरपाई द्या : दिलीप बंसोड यांनी केली पीक पाहणीकाचेवानी : हव्या त्या प्रमाणात पाऊस पडत नसल्याने आजही अनेक शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. वरथेंबी पावसावर अवलंबून असलेली खरिपाची शेती पाण्याविहीन कोरडी पडली आहे. माजी आमदार दिलीप बंसोड यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शुक्रवार (दि.२६) पिकांची पाहणी केली. त्यात २० टक्के रोवण्या आजही अपूर्णच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाण्याअभावी ज्या शेतकऱ्यांनी रोवण्या केल्या नाहीत, त्यांना तपासणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे माजी आमदार बंसोड यांनी सांगितले. आधीच दारिद्र्यात जीवन जगत असलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाने दगा दिला आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी रोवण्या आटोपल्या आहेत, त्यांच्या शेतातील पिकांना पाण्याची गरज आहे. पाऊस न पडता ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचे आक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खुले वातावरण व चांगले पाऊस उत्तम पीक घेण्यासाठी गरजेचे झाले आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिले. तिरोडा तालुक्यात वडेगाव क्षेत्रात पावसाच्या कमी प्रमाणामुळे अनेक गावांत २० टक्के रोवण्या झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी डोक्यावर हात ठेवून आकाशाकडे नजरा वळविल्या आहेत. खोळंबलेल्या रोवण्यांची कृषी विभागाकडून चौकशी करण्यात यावी व त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी बंसोड यांच्याकडे व्यक्त केली आहे.याप्रसंगी माजी आ. दिलीप बन्सोड यांच्यासह जि.प. सदस्य गीता बिसेन, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, जि.प. सदस्य सुनिता मडावी, पंचम बिसेन, पं.स. सदस्य निता रहांगडाले, पं.स. सभापती उषा किंदरले, रामकुमार असाटी, संभाजी ठाकरे, कैलाश कडव, जीवन गौतम, सूर्यकांता टेंभरे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आ. बंसोड यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह तिरोडा तालुक्यातील सर्रा, कोडेलोहारा, कोयलारी, नांदलपार, मुरमाडी, खैरी, कुल्पा, मनोरा, केसलवाडा, सिल्ली, येडमाकोड, माल्ही, नवेगाव, गांगला, लेदडा व घोगरा गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी करण्यात आली. तसेच अपूर्ण रोवणी असलेल्या भागाची पाहणी करण्यात आली. यावेळी आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून २० टक्के अपूर्ण रोवणी असलेल्या शेतांची पाहणी करून व त्याचे प्रस्ताव तयार करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे आश्वासन माजी आ. बंसोड यांनी दिली. (वार्ताहर)