शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

सात महिन्यात १९७ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:09 IST

जिल्ह्यातील मातामृत्यू व बालमृत्यू शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अभियान राबविले जात आहे.

ठळक मुद्देशून्य मृत्यू अभियान अपयशी : गोंदियात होऊ शकते गोरखपूरची पुनरावृत्ती

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील मातामृत्यू व बालमृत्यू शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अभियान राबविले जात आहे. मात्र दुसरीकडे याच अभियानाला काळे फासण्याचे काम बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय करीत आहे. गेल्या सात महिन्यात एकट्या गंगाबाईत रुग्णालयात १९७ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.जिल्हा आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल आहे. या भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. यासाठी शून्य मृत्यू अभियान राबविण्याचा संकल्प जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे केला.त्यांनी बैठका घेऊन सर्व आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांना सूचनाही दिल्या. मात्र गंगाबाईतील बालमृत्यूचे तांडव सुरूच आहे. गंगाबाईत आलेल्या रूग्णांची आकडेवारी पाहता जानेवारी महिन्यात ५६५ महिलांची प्रसूती करण्यात आली. त्यात आयूडी ११ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे पाच बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील ८ बालके अश्या २४ बालकांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात ५१० महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी ८ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील १३ बालके अश्या २३ बालकांचा मृत्यू झाला. मार्च महिन्यात ५५४ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी ५ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील ९ बालके अश्या १६ बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात ४९७ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी १० बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील १२ बालके अश्या २४ बालकांचा मृत्यू झाला. मे महिन्यात ५६४ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी १५ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे ५ बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील १९ बालके अश्या ३९ बालकांचा मृत्यू झाला. जून महिन्यात ५२५ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी १५ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे ४ बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील ९ बालके अश्या २८ बालकांचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात ५६६ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी २० बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील २१ बालके अश्या ४३ बालकांचा मृत्यू झाला. या सात महिन्यात बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात बालमृत्यूचे तांडव सुरू असतानाही आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासनही निद्रावस्थेत आहे.अतिदक्षता कक्षावर प्रश्नचिन्हगंगाबाई स्त्री रूग्णालयात मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंबातील गर्भवती प्रसूतीसाठी दाखल होतात. येथे जन्माला येणारी बालके सर्व सामान्य बालकांच्या वजनापेक्षा कमी वजनाची असल्यामुळे त्या बालकांना योग्य उपचार देण्यासाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सुसज्ज नवजात अतिदक्षता कक्ष उभारण्यात आला. परंतु येथे जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ९१ बालकांचा मृत्यू झाला.रिक्त पदांमुळे कर्मचारी त्रस्तगंगाबाई स्त्री रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाºयांवर भार येत आहे. त्यामुळे त्यांना अठरा अठरा तास काम करावे लागते. गंगाबाई स्त्री रूग्णालयात ६ बधीरीकरण तज्ज्ञांची गरज आहे. परंतु येथे एकच तज्ज्ञ कार्यरत आहेत. मेडीकल कॉलेजचे बधीरीकरण तज्ज्ञ काम करीत नाही. गंगाबाई स्त्री रूग्णालयात सहा बालरोग तज्ज्ञांची गरज असताना केवळ तीनच कार्यरत आहेत. परिचारीकांची ६० पदे मंजूर असताना ३४ जागाच भरल्या आहेत. वर्ग चारचे ४० पदे रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांना स्ट्रेचरवर नेण्याचे काम नातेवाईकांनाच करावे लागते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.गर्भातच दगावली ८४ बालकेगर्भवती महिलांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी केलेले दुर्लक्ष, वेळोवेळी उपचार नाही, खानपाणात अनियमितता, असंतुलीत आहार, प्रथीने, विटॉमीन, लोह गर्भवतींना वेळीच मिळत नसल्यामुळे त्यांच्या पोटातील गर्भाची वाढ होऊ शकली नाही. सतत होणाºया दुर्लक्षीततेमुळे जानेवारी महिन्यात ११, फेब्रुवारी ८, मार्च ५, एप्रिल १०, मे १५, जून १५ व जुलै २० अशा एकूण ८४ बालकांचा गर्भातच मृत्यू झाला.