शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

मुदत संपूनही १.७८ लाख नागरिकांनी घेतला नाही दुसरा डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST

कपिल केकत गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशातच कहर केला व कित्येकांना त्यांच्या कुटुंबीयांपासून हिरावून नेले. कोरोनाचा कहर ...

कपिल केकत

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशातच कहर केला व कित्येकांना त्यांच्या कुटुंबीयांपासून हिरावून नेले. कोरोनाचा कहर पुढे होऊ नये यासाठी शास्त्रज्ञांनी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करावे असा सल्ला दिला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम जोमात राबविली जात आहे. याचे फलित असे की, १६ जानेवारी रोजी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७५१७८७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात जिल्हा अग्रेसर असून, ही वाखाणण्याजोगी बाब आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल १७८००० नागरिकांनी मुदत संपूनही आतापर्यंत दुसरा डोस घेतलेला नाही. कोरोनापासून सुरक्षेसाठी दोन्ही डोस घेणे गरजेचे असताना मात्र हे नागरिक आपल्याच मस्तीत वागत असताना दिसत आहेत.

------------------------

१) लस दुसऱ्या डोससाठीची मुदत

कोविशिल्ड ८४ दिवस

कोव्हॅक्सिन २८ दिवस

२) जिल्ह्यात झालेले लसीकरण (ग्राफ)

पहिला डोस - ५८१२२६

दुसरा डोस - १७०५६१

--------------------

दुसरा डोसही तितकाच आवश्यक

- कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी अत्यंत प्रभावी असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. शरीरात कोरोनाविरोधात प्रतिपिंड तयार करण्यासाठी या लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे शास्त्रज्ञांकडून सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे.

- त्यानुसार, दोन्ही लसींमध्ये ठरावीक कालावधी ठरवून दुसरा डोस दिला जात आहे; कारण यातून त्या लसींची कार्यक्षमता अधिक वाढते व प्रतिपिंड तयार होऊन अधिक कालावधीपर्यंत आपल्या सुरक्षित ठेवते.

------------------------------

शेतीची कामे, कोरोना गेल्याचा संभ्रम

जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असून आजघडीला जिल्ह्यात फक्त दोन बाधित आहेत. यामुळे आत कोरोना गेल्याने लस घेण्याची गरज काय, असा संभ्रम नागरिकांत आहे. शिवाय, सध्या शेतीची कामे सुरू असून डोस घेतल्यास ताप येणार व अशात कामे खोळंबणार हा विचार करूनही नागरिक दुसरा डोस टाळत असल्याचे दिसून येत आहे.

------------------------------

दोन्ही डोस गरजेचे

कोरोनापासून सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. आता जिल्ह्यातून कोरोना गेला असा संभ्रम न बाळगता प्रत्येकाने आपले डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे लवकरात लवकर डोस घेऊन स्वत:सह आपल्या कुटुंबालाही सुरक्षित करा.

- डॉ. भूमेश पटले, जिल्हा समन्वयक