शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

मुदत संपूनही १.७८ लाख नागरिकांनी घेतला नाही दुसरा डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST

कपिल केकत गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशातच कहर केला व कित्येकांना त्यांच्या कुटुंबीयांपासून हिरावून नेले. कोरोनाचा कहर ...

कपिल केकत

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशातच कहर केला व कित्येकांना त्यांच्या कुटुंबीयांपासून हिरावून नेले. कोरोनाचा कहर पुढे होऊ नये यासाठी शास्त्रज्ञांनी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करावे असा सल्ला दिला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम जोमात राबविली जात आहे. याचे फलित असे की, १६ जानेवारी रोजी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७५१७८७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात जिल्हा अग्रेसर असून, ही वाखाणण्याजोगी बाब आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल १७८००० नागरिकांनी मुदत संपूनही आतापर्यंत दुसरा डोस घेतलेला नाही. कोरोनापासून सुरक्षेसाठी दोन्ही डोस घेणे गरजेचे असताना मात्र हे नागरिक आपल्याच मस्तीत वागत असताना दिसत आहेत.

------------------------

१) लस दुसऱ्या डोससाठीची मुदत

कोविशिल्ड ८४ दिवस

कोव्हॅक्सिन २८ दिवस

२) जिल्ह्यात झालेले लसीकरण (ग्राफ)

पहिला डोस - ५८१२२६

दुसरा डोस - १७०५६१

--------------------

दुसरा डोसही तितकाच आवश्यक

- कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी अत्यंत प्रभावी असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. शरीरात कोरोनाविरोधात प्रतिपिंड तयार करण्यासाठी या लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे शास्त्रज्ञांकडून सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे.

- त्यानुसार, दोन्ही लसींमध्ये ठरावीक कालावधी ठरवून दुसरा डोस दिला जात आहे; कारण यातून त्या लसींची कार्यक्षमता अधिक वाढते व प्रतिपिंड तयार होऊन अधिक कालावधीपर्यंत आपल्या सुरक्षित ठेवते.

------------------------------

शेतीची कामे, कोरोना गेल्याचा संभ्रम

जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असून आजघडीला जिल्ह्यात फक्त दोन बाधित आहेत. यामुळे आत कोरोना गेल्याने लस घेण्याची गरज काय, असा संभ्रम नागरिकांत आहे. शिवाय, सध्या शेतीची कामे सुरू असून डोस घेतल्यास ताप येणार व अशात कामे खोळंबणार हा विचार करूनही नागरिक दुसरा डोस टाळत असल्याचे दिसून येत आहे.

------------------------------

दोन्ही डोस गरजेचे

कोरोनापासून सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. आता जिल्ह्यातून कोरोना गेला असा संभ्रम न बाळगता प्रत्येकाने आपले डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे लवकरात लवकर डोस घेऊन स्वत:सह आपल्या कुटुंबालाही सुरक्षित करा.

- डॉ. भूमेश पटले, जिल्हा समन्वयक