शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अतिदक्षता कक्षात १७० नवजातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:19 IST

शासन माता व बाल मृत्यूवर आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करीत असले तरी बालमृत्यूचे तांडव थांबता थांबेना अशी स्थिती दिसून येत आहे. येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी उत्कृष्ट असे नवजात अतिदक्षता कक्ष उभारण्यात आले आहे.

ठळक मुद्देगंगाबाई स्त्री रूग्णालयातील प्रकार : व्यंगत्वामुळे होतो नवजात बालकांचा मृत्यू

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासन माता व बाल मृत्यूवर आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करीत असले तरी बालमृत्यूचे तांडव थांबता थांबेना अशी स्थिती दिसून येत आहे. येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी उत्कृष्ट असे नवजात अतिदक्षता कक्ष उभारण्यात आले आहे. तरीही या कक्षात वर्षभरात १७० बालकांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार ८३० बालकांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.जिल्ह्यासाठी एकमेव असलेल्या बाई गंगाबाई महिला रूग्णालयात वर्षाकाठी नऊ हजार महिलांची प्रसूती होते. मनुष्यबळ अभावी येथील डॉक्टरांवर कामाचा ताण असतो. नवजात अतिदक्षता कक्षात बालरोग तज्ज्ञ नसल्यामुळे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षात दोन हजार नवजात बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यापैकी एक हजार ८३० बालकांवर उपचार केल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र १७० बालकांवर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.यात ७०० ग्रॅम व त्यापेक्षा कमी वजन असलेल्या २० बालकांचा मृत्यू झाला. एक किलो वजनापेक्षा कमी २५ बालकांचा, दोन किलो पेक्षा कमी वजनाच्या २५ बालकांचा, गर्भातच व्यंगत्व आल्यामुळे ५० बालकांचा तर इंफेक्शनमुळे ५० बालकांचा मृत्यू झाला आहे. या दोन हजार बालकांच्या मातांपैकी ४६७ मातांची प्रसूती गंगाबाईत झाली नसून बाहेर प्रसूती झाल्यानंतर त्यांच्या बाळांना उपचारासाठी गंगाबाई स्त्री रूग्णालयात आणण्यात आले होते. गंगाबाईत दाखल झालेल्या बालकांपैकी ८.२ टक्के बालकांचा मृत्यू होत असल्याचे चित्र पुढे आले आहे.व्यंगत्वामुळे सर्वाधिक बालकांचा मृत्यूआईच्या गर्भातच अर्भकाची वाढ व्हावी यासाठी त्यांना संतुलीत आहार देणे आवश्यक असते. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला व विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु गर्भावस्थेत गर्भवतींकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे हृदयविकार, फुफुसाचे व्यंगत्व, मेंदू व किडणी यांच्यात व्यंगत्व येते. व्यंगत्व व इंफेक्शनमुळे समान मृत्यू होण्याचा दर मागील वर्षीची आकडेवारी दाखविते.तीन व्हेंटिलेर बंदचगंगाबाई स्त्री रूग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षात चार व्हेंटीलेटरची गरज आहेत. परंतु सद्यस्थितीत फक्त एकच व्हेंटीलेटर सुरू आहे. तीन व्हेंटीलेटर बंद आहेत. त्यामुळे नवजात बालकांचा उपचार करण्याची अडचण येत असून त्यामुळे चिमुलकल्यांचा मृत्यू तर होत नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.व्यवस्था ३२ ची ठेवतात ५० रूग्णनवजात अतिदक्षता कक्षात ३२ बालके एकासोबत दाखल राहू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु ३२ बालकांचीच व्यवस्था असताना गंगाबाईतील रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहता एकाच वेळी आजघडीला ५० चिमुकल्यांवर उपचार करण्यात येतो. बालरोग विभाग ४० बेडचा आहे. परंतु त्या ठिकाणीही हीच अवस्था आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल