शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

बल्लारशा रेल्वे मार्गावर १६५ किमी विद्युतीकरण

By admin | Updated: February 21, 2016 00:57 IST

बल्लारशा रेल्वे मार्गावर सन २०१२ पासून सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम सन २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.

१०३ किमीचे काम पूर्ण : ठरलेल्या कालावधीत काम पूर्ण होण्याची शक्यता विकास बोरकर गोंदियाबल्लारशा रेल्वे मार्गावर सन २०१२ पासून सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम सन २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र निश्चित करण्यात आलेल्या २६२ किलोमीटरच्या विद्युतीकरणातील फक्त १६५ किलोमीटरचे विद्युतीकरण करण्यात यश आले आहे. परिणामी रेल्वे विभागाने विद्युतीकरणाचा कालावधी वाढवून आता सन २०१७ पर्यंत हे काम करण्याची मुभा दिली आहे. तरीही उर्वरित १०३ किमी अंतराचे विद्युतीकरण या कालावधीत पूर्ण होणार काय? याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. विद्युतीकरणाच्या या कामाचे कं त्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. सिकंदराबाद येथून मुख्य परियोजनेचे कामकाज पाहीले जात आहे. गोंदिया रेल्वे स्टेशनवरील काही अभियंतेही या कामावर नजर ठेवून आहेत. हा जुना प्रोजेक्ट असल्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. असे असतानाही कामाची गती कमी आहे. यामुळेच २६२ किमी अंतराच्या विद्युतीकरणाच्या या कामातील फक्त १६५ किमी अंतराचेच विद्युतीकरण झाले आहे. गोंदिया ते आलेवाहीपर्यंतचे विद्युतीकरण झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात प्रोजेक्ट कार्यालयातील कार्यरत अभियंता एस.एम.शरीफ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला.असा होणार लाभ विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यास गाड्यांमध्ये बोगींची संख्या वाढणे शक्य आहे. म्हणजेच या मार्गावर गाडी जास्त भार वहन करू शकणार आहे. याशिवाय काही लांब पल्ल्याच्या गाडयांना गोंदियात पॉवर चेंज (इंजिन बदल) करावा लागत होता तो नंतर करावा लागणार नाही.दुसरी लाईन टाकणे गरजेचे विद्युतीकरणाचा थोडा फायदा असला तरी खूप जास्त फायदा होणार असल्याचे दिसून येत नाही. खऱ्या अर्थाने या मार्गावर लाभ देण्यासाठी दुसरी लाईन टाकणे गरजेचे आहे. मात्र रेल्वे विभागाने त्याकडे अद्याप फारसे लक्ष दिलेले नाही. येथे दुसरी लाईन टाकल्यास गाड्यांच्या संख्येत वाढ करणे शक्य होणार आहे.अहीर यांच्याकडून दबावचंद्रपूरचे खासदार तथा केंद्र शासनात मंत्री असलेल्या हंसराज अहिर यांच्या मतदार संघात या रेल्वे लाईनचा काही भाग येतो. त्यांनी या कामाला लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे विभागावर चांगलाच दबाव बनविल्याची माहिती आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील काही भाग या रेल्वेमार्गात येतो. रेल्वे विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्चनंतर बल्लारशापासून गोंदियाच्या दिशेने विद्युतीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे.