शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

१६५ गावे होणार ‘जलयुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:56 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१८-१९ साठी जिल्हास्तरीय कमिटीकडून १६५ गावांना मंजुरी मिळाली आहे. मात्र दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप गावांचे आराखडे बनविणे व गावस्तरावर ग्रामसभांमध्ये मंजुरी घेण्याचे काम पूर्णत्वास गेले नाही.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : गाव आराखडे बनविण्यास सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१८-१९ साठी जिल्हास्तरीय कमिटीकडून १६५ गावांना मंजुरी मिळाली आहे. मात्र दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप गावांचे आराखडे बनविणे व गावस्तरावर ग्रामसभांमध्ये मंजुरी घेण्याचे काम पूर्णत्वास गेले नाही. तरी १६५ गावे जलयुक्त होणार, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.यात गोंदिया तालुक्यातील आंभोरा, वडेगाव, चारगाव, छिपिया, इर्री, जिरूटोला, कामठा, कटंगटोला, खातिया, कोरणी, मोरवाही, मुंडीपार खु., पांजरा, परसवाडा, रजेगाव, सातोना, सावरी, सरकारटोला, शिरपूर, झिलमिली, आसोली, रतनारा, बनाथर, बरबसपुरा, बटाना, भादुटोला, चिरामणटोला, जगनटोला, कोचेवाही, लंबाटोला, मरारटोला, मोगर्रा व मुरपार अशा सर्वाधिक ३४ गावांचा समावेश आहे. गोरेगाव तालुक्यातील आसलपाणी, ईसाटोला, तुमखेडा बु., बोळूंदा, कुºहाडी, गणखैरा, धानुटोला, बोरगाव, रामाटोला, खाडीपार, सर्वाटोला, पिंडकेपार, बबई, तुमसर, तेढा, पालेवाडा, म्हसगाव, कवडीटोला, हिराटोला व पलखेडा या २० गावांचा समावेश आहे. तर तिरोडा तालुक्यातील केसलवाडा, खेडेपार, कुल्पा, लेदडा, मनोरा, मुरपार, नांदलपार, निलागोंदी, सिल्ली, सोनेखारी, सितेपार, बोदा, किंडगीपार, सावरा, बिहिरिया, भुराटोला, मुंडीकोटा, सरांडी, खुरखुडी व डोंगरगाव या २० गावांचा समावेश आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तिडका, देऊळगाव, चापटी, इंजोरा, कोहालगाव, सोमलपूर, भुरसीटोला, पांढरवानी-रै, सुकडी, निलज, चान्ना, अरततोंडी, धाबेटेकडी-आदर्श, सिरेगावबांध, चुटिया व संजयनगर अशा १६ गावांचा समावेश आहे. तर आमगाव तालुक्यात मंजूर झालेल्या १५ गावांमध्ये रामजीटोला, वाघडोंगरी, रामाटोला, धावडीटोला, धोबीटोला, मक्कीटोला, तिगाव, आसोली, बोथली, ठाणाटोला, बुराडीटोला, शिवणटोला, मोहगाव, सोनेखारी व वडद गावाचा समावेश आहे. तसेच देवरी तालुक्याच्या मंजूर २७ गावांमध्ये मुरमाडी, चिपोटा, सुकडी, रोपा, पिपरखारी, वडेकसा, शिरपूरबांध, टोयागोंदी, हळदी, पावरटोला, धानोरी, बोंडे, पळसगाव, रेहडी, भागी, निलज, म्हल्हारबोडी, चिचेवाडा, सिंदीबिरी, सालई, पांढरवानी, डवकी, पिंडकेपार-देवरी, पिंडकेपार-चि, सुरतोली, मुल्ला व देवाटोला गावांचा समावेश आहे.तसेच सालेकसा तालुक्यातील बिजेपार, ब्राह्मणी, डोमाटोला, हल्बीटोला, खेडेपार, कोटरा, कुंभारटोला, लभानधारणी, लटोरी, नवेगाव, लोहारा, पांढरी, पाणगाव, पाऊलदौना, सोनपुरी, तिरखेडी, मरकाखांदा, मराबजोब व पठानटोला अशी १९ गावे तर सडक-अर्जुनी तालुक्यातील सितेपार, दोडके-जांभळी, कोकणा-जमि., खोबा-चिंगी, कोहळीटोला-चिखली, मोहघाट, धानोरी, दल्ली, सालेधारणी, चिरचाडी, राजगुडा, खडकी, कोसमघाट व खजरी अशा १४ गावांचा समावेश आहे.अशी एकूण १६५ गावे यावर्षी जलयुक्त शिवार अभियानातून जलयुक्त करण्यात येणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी गावांची संख्या दुपटीपेक्षा अधिक आहेत.जिल्ह्यातील ५८२ कामे अपूर्णचमागील वर्षी सन २०१७-१८ मध्ये शासनाच्या विविध विभागांना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेल्या ६३ गावांमध्ये एकूण १९९१ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्या सर्वांना प्रशासकीय मान्यता मिळून त्यासाठी ७१८६.४४ लाख रूपयांची तरतूद होती. यापैकी १९४८ कामांना कार्यारंभाचे आदेश देण्यात आले होते. त्यातही १९१२ कामे सुरू करण्यात आली होती. यात २९ गावांमध्ये १३३० कामे १०० टक्के पूर्ण करण्यात आली. तर ५८२ कामे अपूर्णच असून त्यांचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार