शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

गोंदिया जिल्ह्यासाठी १६५ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

गोंदिया : कोविड महामारीमुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला असून तब्बल ७५ हजार कोटी रुपयांची ही तूट आहे. ...

गोंदिया : कोविड महामारीमुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला असून तब्बल ७५ हजार कोटी रुपयांची ही तूट आहे. जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात गोंदिया जिल्ह्याला १६५ कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीतील निधी मंजूर करण्यात आला. मात्र मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा बैठक अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत पार पडली, या वेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार डॉ. परिणय फुके, अभिजित वंजारी, विनोद अग्रवाल, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संदीप भिमटे, शलाका सूर्यवंशी, पूजा पाटील या वेळी उपस्थित होते. बैठकीत उपस्थित आमदार व जिल्हाधिकारी मीना यांनी गडचिरोलीनंतर गोंदिया हा दुसऱ्या क्रमांकावरील नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याला अतिरिक्त निधी मिळण्यासह तसेच यंदाच्या वर्षातील विकासनिधी खर्चासाठी ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली. यावर अर्थमंत्री पवार यांनी, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले. मुळातच यंदा कोरोना महामारीमुळे राज्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. असे असले तरीही आरोग्य यंत्रणेला प्राधान्य देण्यात येणार असून, राज्यातील इतर विभागांतील जिल्ह्यांच्या निधीमध्ये कपात करण्यात आली आहे. ही कपात विदर्भातील जिल्ह्यांचा विकास निधी वाढवून देण्यात येणार असला तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या बळकटीकरणास प्राधान्य देण्यास सांगितले. जिल्ह्याच्या यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी (सन २०२०-२१) १६० कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद मंजूर होती. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षासाठी (२०२१-२२) जिल्हा वार्षिक‍ योजनेच्या आराखड्यात १० टक्के वाढीव निधी देण्याची मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केली. राज्यस्तरावरील पशुवैद्यकीय रुग्णालये, चिकित्सालयांचे बांधकाम, ग्रामीण विकास आणि शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांसाठी जिल्ह्याने केलेल्या अतिरिक्त मागणीनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

.....

जिल्हा निधीत वाढ करा

राज्य शासनाने जिल्ह्याला यंदाच्या आर्थिक वर्षात १६० कोटी ४५ लाख रुपयांचा निधी वितरित केला होता. उर्वरित विकासनिधी खर्च करण्यासाठी मुदतवाढीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पोलीस विभागाला नक्षलवाद्यांशी लढताना भूसुरुंगस्फोट विरोधी वाहनांच्या खरेदीसाठी तीन कोटी ६० लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्यामुळे या वर्षीही निधीमध्ये वाढ करण्याची जिल्हा प्रशासनाकडून विनंती करण्यात आली.

....

तीन टक्के निधी यासाठी राखीव

ग्रामीण भागात पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करणे, शालेय शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण, सिंचन क्षमता वाढविणे, पर्यटनाला वाव देणे, पर्यटनस्थळी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांसाठी ३ टक्के निधी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

.....