शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

एनआरएचएमच्या १५ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला

By admin | Updated: August 3, 2016 00:13 IST

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत १५ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित भविष्याला घेवून चिंता सतावत आहे.

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत १५ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित भविष्याला घेवून चिंता सतावत आहे. यापैकी आशा कार्यकर्ती सोडून गोंदिया जिल्ह्यातील ५९८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (तांत्रिक) द्वारे ३१ मार्च २०१७ नंतर प्रतिनियुक्ती समाप्त करण्याच्या आदेशाने जिल्ह्यासह राज्यभरात अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश आहे. सन २००५ पासून कार्यान्वित राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रथम चरण सन २०१२ मध्ये पूर्ण झाले होते. यानंतर १ एप्रिल २०१२ पासून सुरू झालेले दुसरे चरण ३१ मार्च २०१७ रोजी समाप्त होत आहे. यानंतर अभियान सुरू राहील किंवा नाही, या संदर्भात केंद्र शासनाकडून आतापर्यंत कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य/परिमंडळ/जिल्हा/तालुकास्तरावर मोठ्या संख्येत कंत्राटी पद्धतीवर अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे काम कंत्राटी काळात समाधानकारक आढळले व त्यांना ११ महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे. ३१ मार्च २०१७ पर्यंत अभियान सुरू राहण्यासंदर्भात सहसंचालक (तांत्रिक) द्वारे राज्याच्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र प्राचार्य, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आदींना पत्राच्या माध्यमातून सूचित करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत अनेक कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा ४५ वर्षांच्या जवळ पोहोचली आहे. त्यांच्यावर आपल्या कुटुंबाच्या पालन-पोषण, आरोग्य व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. अभियान बंद झाल्यावर सर्व कर्मचारी बेरोजगार होतील. यात विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक ८, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ३४, जिल्हा लेखा व्यवस्थापक ३४, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी ४२, आयपीएचएस ३४, डाटा एंट्री आॅपरेटर/कार्यक्रम सहायक ७५०, लेखापाल ७५०, कार्यक्रम अधिकारी ३५०, एएनएम ५ हजार, स्टॉफ नर्स १,३५०, एचएचव्ही ६७०, प्रयोगशाळा तज्ज्ञ ६८०, विविध तज्ज्ञ ७५०, सांख्यिकी अन्वेषक १५०, अभियंता ४५०, औषध निर्माण अधिकारी १,१५०, तालुका समूह संघटक ३६०, एडीओ मेट्रिशियन २३, बजेट वित्त अधिकारी ३९, क्लर्क ५५ व चतुर्थ श्रेणी ड्रेसर ५११ यांचा समावेश आहे.