शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांना मिळणार १५० दिवसांचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 21:04 IST

कमी पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. पावसाअभावी शेतकºयांच्या हाती काहीच उत्पन्न न आल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : रोहयो सचिवांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : कमी पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. पावसाअभावी शेतकºयांच्या हाती काहीच उत्पन्न न आल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमी योजनेची कामे शंभर दिवसांऐवजी १५० दिवस कामे उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. विजय रहांगडाले यांनी रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली. त्यांनी ही मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन रावल यांनी रहांगडाले यांना दिले.पावसाअभावी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना शेती पडीक ठेवावी लागली. काही शेतकऱ्यांनी लावले धान कीडरोगांमुळे नष्ट झाले. शेतीची कामे नसल्याने शेतकरी व शेतमजुरांसमोर रोजगाचा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकºयांवरील संकट दूर करण्यासाठी रोजगार हमी योजनेतंर्गत कामे उपलब्ध करून देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात आहे. यासंबंधिचे पत्र राज्याचे रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना दिले होते.त्यानंतर हिवाळी अधिवेशना दरम्यान रोहयो मंत्री रावल यांचे सचिव यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. तेव्हा सचिवांनी कामे सुरू करण्याबाबत व निधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश लवकर काढण्याचे आश्वासन रहांगडाले यांना दिले. आ. रहांगडाले यांनी नरेगा अंतर्गत १०० दिवसाच्या कामाची हमी ही केंद्र शासनाची असून राज्य शासनाची असल्याचे निदर्शनात आणून दिले. रोहयोचे कामे राज्य शासनाने निर्मित करुन मजुरांना सरसकट रोहयो अंतर्गत कामे उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.जास्तीत जास्त दिवस कामे द्यामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मंजुरांना सध्या केवळ १०० दिवस कामे दिले जाते. मात्र यंदा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता मजुरांना दीडशे दिवस कामे उपलब्ध करुन देण्याची मागणी रहांगडाले यांनी शासनाकडे केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहानभुतीपूर्वक विचार करुन १५० दिवस कामे उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.त्या शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावातिरोडा तालुक्यातील बेरडीपार व एकोडीच्या मध्यभागी लोहजारी तलाव तयार करण्याचा शासनाचा विचार होता. २० वर्षापूर्वी या तळ्याची मान्यता शासनानी दिली होती. मात्र लोहजारी तळ्याची मान्यता रद्द करुन तेथील शेतकऱ्यांना मोकळे केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या सातबारावर तोलारी तळ्याकरिता प्रस्तावित अशी नोंद आहे. तेथील शेतकरी जमीन खरेदी विक्री करु शकत नाही. यावर शासनानी हस्तक्षेप करुन लोहतारी प्रस्तावित ही नोंद खोडून शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावण्याची मागणी आ. रहांगडाले यांनी केली आहे.