शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

मानव विकासच्या बसेसने दिले १.५० कोटीचे उत्पन्न

By admin | Updated: February 23, 2016 02:21 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावांपासून शाळेपर्यंत पोहोचवून परत आणण्यासाठी शासनाने मानव विकास

गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावांपासून शाळेपर्यंत पोहोचवून परत आणण्यासाठी शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत ‘स्कूल बस’ ची सोय केली. राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात मानव विकास कार्यक्रमाच्या एकूण २८ बसेस असून एप्रिल २०१५ ते आतापर्यंत साडेदहा महिन्यात या बसेसद्वारे एक कोटी ५० लाख ९६ हजार ९१६ रूपयांचे उत्पन्न गोंदिया आगाराला मिळाले आहे. जिल्हाभरात मानव विकास कार्यक्रमाच्या एकूण ५६ बसेस धावतात. यापैकी गोंदिया आगारात एकूण २८ बसेस आहेत. सप्टेंबर महिन्यापूर्वी गोंदिया आगारात केवळ २६ बसेस होत्या. सप्टेंबर महिन्यात दोन बसेस मिळाल्याने मानव विकासच्या बसेसची संख्या २८ पर्यंत पोहोचली आहे. मानव विकास कार्यक्रमाच्या सुरूवातीला गोंदिया आगाराला एकूण २० बसेस मिळाल्या होत्या. गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सालेकसा या चार तालुक्यांसाठी प्रत्येकी पाच बसेस मिळाल्या होत्या. आता त्यात पुन्हा आठ बसेस भर पडल्याने प्रत्येक तालुक्यासाठी सात स्कूल बसेसची सोय झाली आहे. गोंदिया आगारातील मानव विकासच्या स्कूल बसेस एप्रिल २०१५ ते फेब्रुवारीच्या आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी पाच लाख ३७ हजार ७१६ किमी (८१३ फेऱ्या) धावल्या. त्याद्वारे ३१ लाख ४९ हजार ०८१ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर शाळांव्यतिरिक्त (लिंक) या स्कूल बसेसने सात लाख ८३ हजार ११६ किमीचा (९९६ फेऱ्या) प्रवास केला. त्याद्वारे एक कोटी १९ लाख ४७ हजार ८३५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. अशाप्रकारे मानव विकासच्या २८ स्कूल बसेसने एकूण १३ लाख २० हजार ८३२ किमी प्रवास करून एकूण एक कोटी ५० लाख ९६ हजार ९१६ रूपयांचे उत्पन्न मिळवून दिले.१५ एप्रिलनंतर स्कूल बसेस प्रवासी सेवेत४आठवी, नववी व अकरावीच्या परीक्षा आटोपल्यानंतर मानव विकासच्या स्कूल बसेस प्रवासी सेवेसाठी धावणार आहेत. १५ एप्रिलपूर्वी शैक्षणिक सत्रातील स्कूल बसेस २१५ दिवस धावण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. यानंतर या बसेसला रिकाम्या उभ्या ठेवता येत नाही. त्यामुळे या स्कूल बसेस १५ एप्रिलनंतर प्रवासी सेवेत लावण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.