शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

मानव विकासच्या बसेसने दिले १.५० कोटीचे उत्पन्न

By admin | Updated: February 23, 2016 02:21 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावांपासून शाळेपर्यंत पोहोचवून परत आणण्यासाठी शासनाने मानव विकास

गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावांपासून शाळेपर्यंत पोहोचवून परत आणण्यासाठी शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत ‘स्कूल बस’ ची सोय केली. राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात मानव विकास कार्यक्रमाच्या एकूण २८ बसेस असून एप्रिल २०१५ ते आतापर्यंत साडेदहा महिन्यात या बसेसद्वारे एक कोटी ५० लाख ९६ हजार ९१६ रूपयांचे उत्पन्न गोंदिया आगाराला मिळाले आहे. जिल्हाभरात मानव विकास कार्यक्रमाच्या एकूण ५६ बसेस धावतात. यापैकी गोंदिया आगारात एकूण २८ बसेस आहेत. सप्टेंबर महिन्यापूर्वी गोंदिया आगारात केवळ २६ बसेस होत्या. सप्टेंबर महिन्यात दोन बसेस मिळाल्याने मानव विकासच्या बसेसची संख्या २८ पर्यंत पोहोचली आहे. मानव विकास कार्यक्रमाच्या सुरूवातीला गोंदिया आगाराला एकूण २० बसेस मिळाल्या होत्या. गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सालेकसा या चार तालुक्यांसाठी प्रत्येकी पाच बसेस मिळाल्या होत्या. आता त्यात पुन्हा आठ बसेस भर पडल्याने प्रत्येक तालुक्यासाठी सात स्कूल बसेसची सोय झाली आहे. गोंदिया आगारातील मानव विकासच्या स्कूल बसेस एप्रिल २०१५ ते फेब्रुवारीच्या आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी पाच लाख ३७ हजार ७१६ किमी (८१३ फेऱ्या) धावल्या. त्याद्वारे ३१ लाख ४९ हजार ०८१ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर शाळांव्यतिरिक्त (लिंक) या स्कूल बसेसने सात लाख ८३ हजार ११६ किमीचा (९९६ फेऱ्या) प्रवास केला. त्याद्वारे एक कोटी १९ लाख ४७ हजार ८३५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. अशाप्रकारे मानव विकासच्या २८ स्कूल बसेसने एकूण १३ लाख २० हजार ८३२ किमी प्रवास करून एकूण एक कोटी ५० लाख ९६ हजार ९१६ रूपयांचे उत्पन्न मिळवून दिले.१५ एप्रिलनंतर स्कूल बसेस प्रवासी सेवेत४आठवी, नववी व अकरावीच्या परीक्षा आटोपल्यानंतर मानव विकासच्या स्कूल बसेस प्रवासी सेवेसाठी धावणार आहेत. १५ एप्रिलपूर्वी शैक्षणिक सत्रातील स्कूल बसेस २१५ दिवस धावण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. यानंतर या बसेसला रिकाम्या उभ्या ठेवता येत नाही. त्यामुळे या स्कूल बसेस १५ एप्रिलनंतर प्रवासी सेवेत लावण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.