शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
3
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
4
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
5
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
6
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
7
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
8
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
9
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
10
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
11
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
12
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
14
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
15
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
16
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
17
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
18
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
19
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
20
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'

१५ टक्के नागरिक निरक्षर

By admin | Updated: August 8, 2015 01:54 IST

निरक्षरांना नवसाक्षर करण्यासाठी केंद्र शासनामार्फत ८ एप्रिल २०११ पासून साक्षर भारत अभियान सुरू करण्यात आले.

दोन वर्षांपासून कार्यक्रम बंद : जिल्ह्यात ७५ हजार प्रौढ निरक्षरनरेश रहिले गोंदियानिरक्षरांना नवसाक्षर करण्यासाठी केंद्र शासनामार्फत ८ एप्रिल २०११ पासून साक्षर भारत अभियान सुरू करण्यात आले. परंतु दोन वर्षे थातूरमातूर पध्दतीने चाललेल्या या अभियानाचा जिल्ह्यातील लोकांना कोणताच फायदा झाला नाही. जिल्ह्यात आजही ७५ हजार लोक निरक्षर असल्याची कबुली निरंतर शिक्षण विभाग देत आहे. निरक्षरांची ही संख्या १५ टक्के आहे.१५ वर्षावरील व्यक्तींना साक्षर करून त्यांना चौथी, आठवी व त्यावरील शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे, आक्षर झालेल्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे व घेतलेले शिक्षण कायम राहील याचे नियोजन करण्यासाठी केंद्र शासनाने साक्षर भारत अभियान अंमलात आणले. सन २०१० मध्ये जि.प. शाळातील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी निरक्षरांचा आकडा एक लाख पाच हजाराच्या घरात होता. त्यांनतर डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ पर्यंत या तीन महिन्यात निरक्षरांना साक्षर करण्यात आले. त्यावेळी २५ हजार जणांना नवसाक्षर करण्याचे उद्दीष्ट असताना २३ हजार जणांना नवसाक्षर करण्यात आले. मार्च २०१३ ला या अभियानासाठी निधी आला नाही. परिणामी हे अभियान बंद राहीले. शासनाने आता पुन्हा नव्याने प्रत्येक निरक्षरामागे अनुदान देण्याचे ठरविले. त्यासाठी नवीन सर्वेक्षण करण्याचे ठरविले. निरंतर शिक्षण विभागाने सर्वेक्षणासाठी प्रेरक नियुक्त करून महिनाभरात निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात आले. महिला निरक्षरांचे प्रमाण ६५ टक्केनिरंतर शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात गोंदिया जिल्ह्यात ७५ हजार लोक निरक्षर आढळले. यात महिलांचे प्रमाण ६५ टक्के आहे. तर पुरूषांचे प्रमाण ३५ टक्के आहे. सन २०११ मध्ये जिल्हास्तरावर पुस्तकासाठी १३ लाख ६४ हजार रूपये देण्यात आले होते. त्यातून पुस्तक खरेदी करण्यात आले. त्यानंतर टेबल, खुर्ची व कपाटासाठी निधी देण्यात आला होता. मार्च २०१३ मध्ये हा कार्यक्रम बंद असल्यामुळे निरक्षरांना साक्षर करता आले नाही. फक्त तीनच महिने शिकविल्यामुळे निरक्षरांची संख्या जास्त आहे. ११०० प्रेरकांना सोडले वाऱ्यावरनिरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रत्येक गावात दोन प्रेरक तयार करण्यात आले. त्यांना २ हजार रूपये मानधनावर नेमण्यात आले होते. सुरूवातीचे तीन महिने काम केल्यानंतर त्यांना बंद करण्यात आले. पैश्याअभावी त्यांना बंद करण्यात आले. जिल्ह्यातील ११०० प्रेरक वस्तीशाळा शिक्षकांप्रमाणे आशा ठेवून बसले होते. परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे ते निराशेत आहेत. उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकारगोंदिया जिल्हा निर्मितीला १६ वर्षाचा कालावधी लोटला, मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी निरंतर शिक्षण विभागाचे कार्यालय नाही. हे काम भंडारावरून चालते. या संदर्भात केव्हाही संपर्क केल्यावर टाळाटाळीचे उत्तरे दिले जाते. अनेक वेळा फोनच उचलला जात नाही. या कार्यालयात उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.