शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

१५ टक्के नागरिक निरक्षर

By admin | Updated: August 8, 2015 01:54 IST

निरक्षरांना नवसाक्षर करण्यासाठी केंद्र शासनामार्फत ८ एप्रिल २०११ पासून साक्षर भारत अभियान सुरू करण्यात आले.

दोन वर्षांपासून कार्यक्रम बंद : जिल्ह्यात ७५ हजार प्रौढ निरक्षरनरेश रहिले गोंदियानिरक्षरांना नवसाक्षर करण्यासाठी केंद्र शासनामार्फत ८ एप्रिल २०११ पासून साक्षर भारत अभियान सुरू करण्यात आले. परंतु दोन वर्षे थातूरमातूर पध्दतीने चाललेल्या या अभियानाचा जिल्ह्यातील लोकांना कोणताच फायदा झाला नाही. जिल्ह्यात आजही ७५ हजार लोक निरक्षर असल्याची कबुली निरंतर शिक्षण विभाग देत आहे. निरक्षरांची ही संख्या १५ टक्के आहे.१५ वर्षावरील व्यक्तींना साक्षर करून त्यांना चौथी, आठवी व त्यावरील शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे, आक्षर झालेल्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे व घेतलेले शिक्षण कायम राहील याचे नियोजन करण्यासाठी केंद्र शासनाने साक्षर भारत अभियान अंमलात आणले. सन २०१० मध्ये जि.प. शाळातील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी निरक्षरांचा आकडा एक लाख पाच हजाराच्या घरात होता. त्यांनतर डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ पर्यंत या तीन महिन्यात निरक्षरांना साक्षर करण्यात आले. त्यावेळी २५ हजार जणांना नवसाक्षर करण्याचे उद्दीष्ट असताना २३ हजार जणांना नवसाक्षर करण्यात आले. मार्च २०१३ ला या अभियानासाठी निधी आला नाही. परिणामी हे अभियान बंद राहीले. शासनाने आता पुन्हा नव्याने प्रत्येक निरक्षरामागे अनुदान देण्याचे ठरविले. त्यासाठी नवीन सर्वेक्षण करण्याचे ठरविले. निरंतर शिक्षण विभागाने सर्वेक्षणासाठी प्रेरक नियुक्त करून महिनाभरात निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात आले. महिला निरक्षरांचे प्रमाण ६५ टक्केनिरंतर शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात गोंदिया जिल्ह्यात ७५ हजार लोक निरक्षर आढळले. यात महिलांचे प्रमाण ६५ टक्के आहे. तर पुरूषांचे प्रमाण ३५ टक्के आहे. सन २०११ मध्ये जिल्हास्तरावर पुस्तकासाठी १३ लाख ६४ हजार रूपये देण्यात आले होते. त्यातून पुस्तक खरेदी करण्यात आले. त्यानंतर टेबल, खुर्ची व कपाटासाठी निधी देण्यात आला होता. मार्च २०१३ मध्ये हा कार्यक्रम बंद असल्यामुळे निरक्षरांना साक्षर करता आले नाही. फक्त तीनच महिने शिकविल्यामुळे निरक्षरांची संख्या जास्त आहे. ११०० प्रेरकांना सोडले वाऱ्यावरनिरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रत्येक गावात दोन प्रेरक तयार करण्यात आले. त्यांना २ हजार रूपये मानधनावर नेमण्यात आले होते. सुरूवातीचे तीन महिने काम केल्यानंतर त्यांना बंद करण्यात आले. पैश्याअभावी त्यांना बंद करण्यात आले. जिल्ह्यातील ११०० प्रेरक वस्तीशाळा शिक्षकांप्रमाणे आशा ठेवून बसले होते. परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे ते निराशेत आहेत. उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकारगोंदिया जिल्हा निर्मितीला १६ वर्षाचा कालावधी लोटला, मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी निरंतर शिक्षण विभागाचे कार्यालय नाही. हे काम भंडारावरून चालते. या संदर्भात केव्हाही संपर्क केल्यावर टाळाटाळीचे उत्तरे दिले जाते. अनेक वेळा फोनच उचलला जात नाही. या कार्यालयात उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.