शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

१४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 15, 2014 22:58 IST

धान उत्पादकांच्या या जिल्ह्यातील शेतकरी संपन्न नसला तरी पोटापुरते कमावून खाणारा आहे. कर्ज काढून भपकेबाजपणा दाखविण्याची सवय नसल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कितीही वाईट

गोंदिया : धान उत्पादकांच्या या जिल्ह्यातील शेतकरी संपन्न नसला तरी पोटापुरते कमावून खाणारा आहे. कर्ज काढून भपकेबाजपणा दाखविण्याची सवय नसल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कितीही वाईट परिस्थिती आली तरी ते आत्महत्येच्या वाटेने जात नाहीत. मात्र यावर्षी गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत १४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामागे नापिकी, कर्जबाजारीपणासह इतरही कारणे असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांच्या आत्महत्या दरवर्षीच होत असतात. मात्र यावर्षी आत्महत्यांचे हे प्रमाण वाढले आहे. सडक/अर्जुनी तालुक्याच्या चिंगी येथील नानाजी श्रीपत रहिले (४०) या शेतकऱ्याने १ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. गोरेगाव तालुक्याच्या चांदीटोला येथील धनलाल कुशन सोनटक्के (६५) यांनी ३१ मार्च रोजी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या झरपडा येथील बालकदास धर्मा खोब्रागडे (५२) या शेतकऱ्याने २० एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली. गोंदिया तालुक्याच्या सावरी येथील कपूरचंद यशवंत बिसेन (४७) यांनी २३ एप्रिल रोजी गळफास घेऊन, सडक/अर्जुनी तालुक्याच्या बकी/मेनडकी येथील येथील मुलचंद महागू मेश्राम (६५) यांनी ६ मार्च रोजी विषप्राशन करून, तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील तानसेन दुर्गा परिहार (४८) यांनी १५ मे रोजी गळफास घेऊन, देवरी तालुक्याच्या पालांदूर/जमी. येथील सदाशिव फुकटू सोरले (४४) या शेतकऱ्याने २५ मे रोजी गळफास घेऊन, सडक/अर्जुनी तालुक्याच्या डुंडा येथील प्रेमचंद सुखराम भोवते यांनी २५ मे रोजी विष पा्रशन करून, देवरी तालुक्याच्या मुरपार येथील किशोर बिसन लटये (३४) यांनी ११ जून रोजी गळफास घेऊन, देवरी तालुक्याच्या शिरपूरबांध येथील पुरूषोत्तम बळीराम मेंढे यांनी १८ आॅगस्ट रोजी गळफास घेऊन, अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या निमगाव येथील गोपाल मसाजी ठाकरे यांनी १७ आॅगस्ट रोजी गळफास घेऊन, सडक/अर्जुनी तालुक्याच्या डुंडा येथील प्रकाश रामाजी टेंभरे (४६) यांनी १४ जुलै रोजी विषप्राशन करून, अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या खोकरी येथील चंदू उरकुडा निंबार्ते(७०) यांनी ७ नोव्हेंबर रोजी विषप्राशन करून तर गोंदिया तालुक्याच्या मोगर्रा येथील झनकलाल सदाराम पटले (४५) यांनी १५ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.या आत्महत्या नेमक्या कशामुळे झाल्या आहेत याची चौकशी सुरू आहे. काही आत्महत्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे झाल्याचे सिद्धही झाले आहे. यावर्षी शासनाच्या धान खरेदीला उशिर झाला. भावातही उत्पादन खर्चावर आधारित वाढ झाली नाही. गतवर्षी मिळालेला बोनसही यावर्षी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)