शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

१४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 15, 2014 22:58 IST

धान उत्पादकांच्या या जिल्ह्यातील शेतकरी संपन्न नसला तरी पोटापुरते कमावून खाणारा आहे. कर्ज काढून भपकेबाजपणा दाखविण्याची सवय नसल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कितीही वाईट

गोंदिया : धान उत्पादकांच्या या जिल्ह्यातील शेतकरी संपन्न नसला तरी पोटापुरते कमावून खाणारा आहे. कर्ज काढून भपकेबाजपणा दाखविण्याची सवय नसल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कितीही वाईट परिस्थिती आली तरी ते आत्महत्येच्या वाटेने जात नाहीत. मात्र यावर्षी गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत १४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामागे नापिकी, कर्जबाजारीपणासह इतरही कारणे असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांच्या आत्महत्या दरवर्षीच होत असतात. मात्र यावर्षी आत्महत्यांचे हे प्रमाण वाढले आहे. सडक/अर्जुनी तालुक्याच्या चिंगी येथील नानाजी श्रीपत रहिले (४०) या शेतकऱ्याने १ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. गोरेगाव तालुक्याच्या चांदीटोला येथील धनलाल कुशन सोनटक्के (६५) यांनी ३१ मार्च रोजी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या झरपडा येथील बालकदास धर्मा खोब्रागडे (५२) या शेतकऱ्याने २० एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली. गोंदिया तालुक्याच्या सावरी येथील कपूरचंद यशवंत बिसेन (४७) यांनी २३ एप्रिल रोजी गळफास घेऊन, सडक/अर्जुनी तालुक्याच्या बकी/मेनडकी येथील येथील मुलचंद महागू मेश्राम (६५) यांनी ६ मार्च रोजी विषप्राशन करून, तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील तानसेन दुर्गा परिहार (४८) यांनी १५ मे रोजी गळफास घेऊन, देवरी तालुक्याच्या पालांदूर/जमी. येथील सदाशिव फुकटू सोरले (४४) या शेतकऱ्याने २५ मे रोजी गळफास घेऊन, सडक/अर्जुनी तालुक्याच्या डुंडा येथील प्रेमचंद सुखराम भोवते यांनी २५ मे रोजी विष पा्रशन करून, देवरी तालुक्याच्या मुरपार येथील किशोर बिसन लटये (३४) यांनी ११ जून रोजी गळफास घेऊन, देवरी तालुक्याच्या शिरपूरबांध येथील पुरूषोत्तम बळीराम मेंढे यांनी १८ आॅगस्ट रोजी गळफास घेऊन, अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या निमगाव येथील गोपाल मसाजी ठाकरे यांनी १७ आॅगस्ट रोजी गळफास घेऊन, सडक/अर्जुनी तालुक्याच्या डुंडा येथील प्रकाश रामाजी टेंभरे (४६) यांनी १४ जुलै रोजी विषप्राशन करून, अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या खोकरी येथील चंदू उरकुडा निंबार्ते(७०) यांनी ७ नोव्हेंबर रोजी विषप्राशन करून तर गोंदिया तालुक्याच्या मोगर्रा येथील झनकलाल सदाराम पटले (४५) यांनी १५ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.या आत्महत्या नेमक्या कशामुळे झाल्या आहेत याची चौकशी सुरू आहे. काही आत्महत्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे झाल्याचे सिद्धही झाले आहे. यावर्षी शासनाच्या धान खरेदीला उशिर झाला. भावातही उत्पादन खर्चावर आधारित वाढ झाली नाही. गतवर्षी मिळालेला बोनसही यावर्षी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)