शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

नक्षलवाद्यांच्या २० वर्षात १३४ हिंसक कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:07 IST

नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात दहशतवाद्यांसारखे नक्षलवाद्यांचेही कृत्य हिंसक झाले आहेत. गोंदिया जिल्हा निर्मितीपासून आजपर्यंत २० वर्षांच्या काळात जिल्ह्यात १३४ कारवाया झाल्या आहेत.

ठळक मुद्दे३३ सामान्य नागरिकांचाही मृत्यू : २९ चकमकीत २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बलिदानजागतिक दहशतवाद विरोधी दिन विशेष

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात दहशतवाद्यांसारखे नक्षलवाद्यांचेही कृत्य हिंसक झाले आहेत. गोंदिया जिल्हा निर्मितीपासून आजपर्यंत २० वर्षांच्या काळात जिल्ह्यात १३४ कारवाया झाल्या आहेत.त्यात नक्षलवादी आणि पोलिसांच्या झालेल्या चकमकीत आतापर्यंत जिल्ह्यातील २२ अधिकारी-कर्मचारी शहीद झाले आहेत. तर ३३ सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती नक्षल विरोधी अभियान पथकाकडून मिळाली.गोंदिया जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ रोजी झाली. तेव्हापासून सन २०१८ च्या अखेर पर्यंत जिल्ह्यात १३४ कारवाया झाल्या आहेत. २०१२ मध्ये नक्षल्यांकडून सर्वाधीक १७ कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर सन २००६ मध्ये १५ कारवाया, सन २००३ मध्ये १३, सन २०१८ व सन २००९ मध्ये प्रत्येकी १०, सन २०१० व सन २०११ मध्ये प्रत्येकी नऊ, सन २००२ मध्ये आठ, सन २००७ मध्ये सहा, सन २००१ मध्ये पाच, सन २००४, सन २०१३ व सन २०१७ मध्ये प्रत्येकी चार, सन २००८, सन २०१४ व सन २०१६ या वर्षात प्रत्येकी तीन, सन २००० व सन २०१५ या दोन्ही वर्षात प्रत्येकी दोन तर सन १९९९ मध्ये एक कारवाई करण्यात आली आहे.आपल्या मागण्या पूर्ण करवून घेण्यासाठी बळजबरीने अत्यंत भिती दाखवून नक्षलवाद्यांकडून हिंसाचार केला जातो. जाळपोळ, अपहरण व खून केले जाते. लोकशाहीच्या विरोधात कामे करून विकासात अडथळा आणण्याचे काम केले जाते. पोलीस खबºयाच्या संशयावरून अनेकांचा खून करण्यात आला. महाराष्टÑात गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया पाहायला मिळतात. अवघ्या काही दिवसांपूर्वीच गडचिरोली येथे वाहनांची जाळपोळ करून पोलीस वाहनाला स्फोटाने उडविले. त्यात १५ जवान शहीद झाले. शासन गरीब आदिवासी जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यासाठी पुढाकार घेत आहे.तर विकासाच्या कामात अडथळा आणण्याचे काम नक्षलवाद्यांकडून केले जाते. नक्षलवादी व पोलीस यांच्या मधात असलेल्या आदिवासी जनतेला नेहमी दहशतीच्या सावटातच जीवन जगावे लागते. ‘हा कहे तो मॉ मरे, ना कहे तो बाप’ अशी स्थिती आजही नक्षलग्रस्त भागातील गावात आहे. मागील काही दिवसांपासून नक्षलवादी पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण करीत असल्याने नक्षल चळवळीला चांगलाच हादरा बसला आहे.जाळपोळीच्या ३४ घटनानक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसक कारवायांचा आढावा घेतला असता आतापर्यंत २२ अधिकारी-कर्मचारी शहीद झाले. ३३ नागरिकांना प्राणास मुकावे लागले. त्यात १७ लोकांचा खून करण्यात आला. चौघांवर खुनाचा प्रयत्न करण्यात आला. लूटपाटच्या १० घटना, जबरी चोरीचे दोन गुन्हे, जाळपोळच्या ३४ घटना नमूद आहेत. २९ चकमक झाल्या असून ३८ इतर गुन्हे केले आहेत.तंटामुक्त मोहिमेमुळे पोलिसांना मदतआदिवासी नक्षलग्रस्त गावात नक्षलवाद्यांची माहिती काढण्यासाठी जाणाºया पोलिसांना लोक मदत करीत नसतात. पोलीस गावात गेले की नागरिक आपल्या घरची दारे बंद करतात. परंतु महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांनी आणलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमुळे पोलीस व आदिवासी जनता यांच्यातील दुरावा संपला. जे आदिवासी नक्षलवाद्यांना जेवण देत होते तेच आदिवासी तंटामुक्त मोहीमेमुळे पोलिसांना माहिती देऊ लागले. त्यामुळे नक्षलवाद्यांनी या तंटामुक्त मोहिमेचा जोरदार विरोध केला. तंटामुक्त मोहीम ही आदिवासी जनता व पोलीस यांच्यात समन्वय साधणारा दुवा ठरली.सन्मानाचे जीवन जगण्यासाठी पुढे यानक्षल्यांचे जीवन खडतर आहे. त्यात पोलिसांच्या गोळीवर त्यांचे नाव लिहिले असून हे अमूल्य निरर्थक जाणार आहे. त्यामुळे हे जीवन सन्मानाचे जगण्यासाठी हिंसक नक्षलवादाचा मार्ग सोडून नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घ्यावा.- विनीता शाहू, पोलीस अधीक्षक गोंदिया.