शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

नक्षलवाद्यांच्या २० वर्षात १३४ हिंसक कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:07 IST

नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात दहशतवाद्यांसारखे नक्षलवाद्यांचेही कृत्य हिंसक झाले आहेत. गोंदिया जिल्हा निर्मितीपासून आजपर्यंत २० वर्षांच्या काळात जिल्ह्यात १३४ कारवाया झाल्या आहेत.

ठळक मुद्दे३३ सामान्य नागरिकांचाही मृत्यू : २९ चकमकीत २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बलिदानजागतिक दहशतवाद विरोधी दिन विशेष

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात दहशतवाद्यांसारखे नक्षलवाद्यांचेही कृत्य हिंसक झाले आहेत. गोंदिया जिल्हा निर्मितीपासून आजपर्यंत २० वर्षांच्या काळात जिल्ह्यात १३४ कारवाया झाल्या आहेत.त्यात नक्षलवादी आणि पोलिसांच्या झालेल्या चकमकीत आतापर्यंत जिल्ह्यातील २२ अधिकारी-कर्मचारी शहीद झाले आहेत. तर ३३ सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती नक्षल विरोधी अभियान पथकाकडून मिळाली.गोंदिया जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ रोजी झाली. तेव्हापासून सन २०१८ च्या अखेर पर्यंत जिल्ह्यात १३४ कारवाया झाल्या आहेत. २०१२ मध्ये नक्षल्यांकडून सर्वाधीक १७ कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर सन २००६ मध्ये १५ कारवाया, सन २००३ मध्ये १३, सन २०१८ व सन २००९ मध्ये प्रत्येकी १०, सन २०१० व सन २०११ मध्ये प्रत्येकी नऊ, सन २००२ मध्ये आठ, सन २००७ मध्ये सहा, सन २००१ मध्ये पाच, सन २००४, सन २०१३ व सन २०१७ मध्ये प्रत्येकी चार, सन २००८, सन २०१४ व सन २०१६ या वर्षात प्रत्येकी तीन, सन २००० व सन २०१५ या दोन्ही वर्षात प्रत्येकी दोन तर सन १९९९ मध्ये एक कारवाई करण्यात आली आहे.आपल्या मागण्या पूर्ण करवून घेण्यासाठी बळजबरीने अत्यंत भिती दाखवून नक्षलवाद्यांकडून हिंसाचार केला जातो. जाळपोळ, अपहरण व खून केले जाते. लोकशाहीच्या विरोधात कामे करून विकासात अडथळा आणण्याचे काम केले जाते. पोलीस खबºयाच्या संशयावरून अनेकांचा खून करण्यात आला. महाराष्टÑात गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया पाहायला मिळतात. अवघ्या काही दिवसांपूर्वीच गडचिरोली येथे वाहनांची जाळपोळ करून पोलीस वाहनाला स्फोटाने उडविले. त्यात १५ जवान शहीद झाले. शासन गरीब आदिवासी जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यासाठी पुढाकार घेत आहे.तर विकासाच्या कामात अडथळा आणण्याचे काम नक्षलवाद्यांकडून केले जाते. नक्षलवादी व पोलीस यांच्या मधात असलेल्या आदिवासी जनतेला नेहमी दहशतीच्या सावटातच जीवन जगावे लागते. ‘हा कहे तो मॉ मरे, ना कहे तो बाप’ अशी स्थिती आजही नक्षलग्रस्त भागातील गावात आहे. मागील काही दिवसांपासून नक्षलवादी पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण करीत असल्याने नक्षल चळवळीला चांगलाच हादरा बसला आहे.जाळपोळीच्या ३४ घटनानक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसक कारवायांचा आढावा घेतला असता आतापर्यंत २२ अधिकारी-कर्मचारी शहीद झाले. ३३ नागरिकांना प्राणास मुकावे लागले. त्यात १७ लोकांचा खून करण्यात आला. चौघांवर खुनाचा प्रयत्न करण्यात आला. लूटपाटच्या १० घटना, जबरी चोरीचे दोन गुन्हे, जाळपोळच्या ३४ घटना नमूद आहेत. २९ चकमक झाल्या असून ३८ इतर गुन्हे केले आहेत.तंटामुक्त मोहिमेमुळे पोलिसांना मदतआदिवासी नक्षलग्रस्त गावात नक्षलवाद्यांची माहिती काढण्यासाठी जाणाºया पोलिसांना लोक मदत करीत नसतात. पोलीस गावात गेले की नागरिक आपल्या घरची दारे बंद करतात. परंतु महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांनी आणलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमुळे पोलीस व आदिवासी जनता यांच्यातील दुरावा संपला. जे आदिवासी नक्षलवाद्यांना जेवण देत होते तेच आदिवासी तंटामुक्त मोहीमेमुळे पोलिसांना माहिती देऊ लागले. त्यामुळे नक्षलवाद्यांनी या तंटामुक्त मोहिमेचा जोरदार विरोध केला. तंटामुक्त मोहीम ही आदिवासी जनता व पोलीस यांच्यात समन्वय साधणारा दुवा ठरली.सन्मानाचे जीवन जगण्यासाठी पुढे यानक्षल्यांचे जीवन खडतर आहे. त्यात पोलिसांच्या गोळीवर त्यांचे नाव लिहिले असून हे अमूल्य निरर्थक जाणार आहे. त्यामुळे हे जीवन सन्मानाचे जगण्यासाठी हिंसक नक्षलवादाचा मार्ग सोडून नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घ्यावा.- विनीता शाहू, पोलीस अधीक्षक गोंदिया.