शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

१३२ जणांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: January 11, 2016 01:43 IST

दरवर्षी पहिल्या महिन्याच्या पंधरवड्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करुन वाहन चालकांना वाहतुकीचे नियम सांगितले जातात.

वर्षभरात घडले २७७ अपघात : अनेकांना मिळाले जीवनदान गोंदिया : दरवर्षी पहिल्या महिन्याच्या पंधरवड्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करुन वाहन चालकांना वाहतुकीचे नियम सांगितले जातात. तरीदेखील हलगर्जीपणे वाहन चालवून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. सन २०१५ मध्ये २७७ अपघात घडले आहेत. यातील १२२ प्राणांतिक अपघात असून यात १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१७ लोक गंभीर जखमी झाले. किरकोळ जखमींची १०६ आहे. एकंदर अपघातांतून बचावलेल्यांना जीवनदानच मिळाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वाहतूक पोलीस, सर्व पोलीस ठाणे व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा केला जातो. वाहन चालविणाऱ्यांनी वाहतुकीचे नियम लक्षात ठेऊन वर्षभर नियमाच्या अधिन राहून वाहन चालविणे हे अपेक्षीत असते. परंतु मद्याच्या धुंदीत किंवा हलगर्जीपणे वाहन चालवून अपघात घडल्यास बहुदा अनेकांना प्राण ही गमवावा लागतो. रस्ता सुरक्षा पंधरवड्याच्या निमित्ताने अपघात होऊ नये किंवा अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात. परंतु पंधरवडा उलटल्यानंतर वाहन चालकही वाहतुकीच्या नियमांकडे लक्ष घालत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत.सन २०१५ मध्ये जानेवारी महिन्यात ११ अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला असून त्यात नऊ पुरुष तीन महिला आहेत. फेबु्रवारी महिन्यात सहा अपघातांत सात पुरुषांचा मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यात नऊ अपघातांत नऊ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल मध्ये १८ अपघातात १९ जणांना मृत्यू झाला असून १८ पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. मे महिन्यात १३ अपघातांत १४ लोकांचा मृत्यू झाला असून १३ पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. जून महिन्यात नऊ अपघातांत ११ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात सहा अपघातांत सात पुरुषांचा मृत्यू झाला आहे. आॅगस्ट महिन्यात सहा अपघातांत सात जणांचा मृत्यू झाला असून पाच पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात सहा अपघातांत सात पुरुषांचा मृत्यू झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात ११ अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला असून १० पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात १५ अपघातांत १५ जणांचा मृत्यू झाला असून १३ पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. तर डिसेंबर महिन्यात १२ अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला असून आठ पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)