शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

गोदामातून १३ हजार ६४० कट्टे धानाची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:08 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्गंत सालेकसा येथील एका सहकारी संस्थेने खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानापेक्षा प्रत्यक्षात गोदामात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देधान खरेदीतील घोळ प्रकरण : चौकशी अहवालाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्गंत सालेकसा येथील एका सहकारी संस्थेने खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानापेक्षा प्रत्यक्षात गोदामात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गोदामात नेमके किती धान कमी अथवा बरोबर याची चौकशी करण्यासाठी धानाचे वजन केले जात आहे. संस्थेच्या गोदामात सोमवारी (दि.२७) सायंकाळपर्यंत १३ हजार ६४० कट्टे धानाची उचल करण्यात आल्याची माहिती आहे.सालेकसा येथील एका सहकारी संस्थेने खरीप हंगामात १ लाख ४० हजार क्विंटल धानाची खरेदी केली होती. यापैकी ६९ हजार क्विंटल धानाची जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या आदेशानुसार राईस मिलर्सनी उचल केली. त्यामुळे खरेदी केलेल्या धानानुसार संस्थेच्या गोदामात ६१ हजार क्विंटल धान शिल्लक असणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात संस्थेच्या गोदामात खरेदी केलेल्या धानापेक्षा ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी याची गांर्भियाने दखल घेत संस्थेच्या गोदामाला सील ठोकण्याचे आदेश दिले. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनचे महासंचालक कोक आणि भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी गणेश खर्चे यांची चौकशी समिती नेमली.या समितीने सुरूवातीला धान खरेदीच्या कागदपत्रांची चौकशी केली. मात्र केवळ कागदपत्रांच्या आधारावर गोदामात नेमके किती धान कमी आहे हे सांगता येणे अवघड आहे.त्यामुळे गोदामातील धानाची उचल करुनच धान कमी अथवा बरोबर आहे सांगता येणे शक्य असल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकारी व मार्केटिंग फेडरेशनकडे सादर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धानाचे वजन करण्यासाठी गोदामातून धानाची उचल करण्याचे आदेश दिले.त्यानंतर गोदामातील धानाची उचल करण्यास सुरूवात झाली. सालेकसा येथील सहकारी संस्थेच्या गोदामातून आत्तापर्यंत एकूण १३ हजार ६४० कट्टे धानाची उचल करण्यात आली असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.धानाची उचल करण्यास पुन्हा १५ दिवससालेकसा येथील सहकारी संस्थेच्या गोदामात स्टॉक बुक नुसार ६१ हजार क्विंटल धान शिल्लक असणे आवश्यक आहे.आत्तापर्यंत १३ हजार ६४० कट्टे धानाची उचल करण्यात आली आहे. हे धान जवळपास ५ हजार क्विंटलवर असण्याची शक्यता आहे.त्यामुळे पूर्ण धानाची उचल करुन वजन करण्यास पुन्हा १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.अहवाल येण्यास महिना लागणारसहकारी संस्थेच्या गोदामातील संपूर्ण धानाचे वजन करुन त्याचा अंतीम चौकशी अहवाल येण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मात्र या चौकशीवर सुध्दा काही जणांनी आपेक्ष घेतला असून मंत्रालयात तक्रार केल्याची माहिती आहे.