शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

१२६३ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:02 IST

जिल्ह्यात १५ ते १७ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे १२६३ घरांची पडझड झाली. तर गोठ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.

ठळक मुद्देतीन दिवस झालेल्या पावसाचा फटका : प्रशासनाचे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात १५ ते १७ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे १२६३ घरांची पडझड झाली. तर गोठ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नागरिकांची ओरड वाढल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे १६ घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर ११२३ घरांचे अशंत: नुकसान झाले. १२९ जनावरांचे गोठे सुध्दा कोसळल्याने पशुपालकांना आर्थिक फटका बसला. पावसाचा सर्वाधिक फटका गोंदिया, गोरेगाव, आमगाव, सालेकसा तालुक्यातील नागरिकांना बसला. पावसामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये गोंदिया २२६, तिरोडा, ८५, गोरेगाव २८४, अर्जुनी मोरगाव ७०, देवरी ४५, आमगाव ३०६, सालेकसा ५९, सडक अर्जुनी ४७ घरे पडून नुकसान झाले. गोंदिया तालुक्यात ११, तिरोडा ४, अर्जुनी मोरगाव १, देवरी तालुक्यातील १ असे एकूण १६ घरे पूर्णपणे कोसळल्याने कुटुंबीयांवर उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. जिल्हा प्रशासनाने ११२२ पैकी केवळ ५९७ घरांचे नुकसान भरपाई देण्याचा अहवाल तयार केल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक जण शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.कृषी विभागाचा अहवाल भोवणारजिल्ह्यात १५ ते १७ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची रोवणी व धानाची पºहे वाहून गेली. तर पावसामुळे बांध्या फुटल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मात्र कृषी विभागाने पावसामुळे शेतीचे कोणतेच नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे.प्रकल्पांतील पाणी साठ्यात वाढ१५ ते १७ जुलै दरम्यान जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात पडणाºया पावसाची सरासरी गाठल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.