शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

१२ गावातील शेतकऱ्यांचा लोकार्पणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:17 IST

इटियाडोह धरणामुळे बाधित झालेल्या १२ आदिवासी गावातील शेतकऱ्यांना जोपर्यंत झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी उपलब्ध होत नाही तोवर इटियाडोह धरणातील पाणी नवेगावबांध जलाशयात पाडू देणार नाही, असा आदिवासी गावातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे लोकार्पणाच्या लगीनघाईला ब्रेक लागणार आहे.

ठळक मुद्देझाशीनगर उपसा सिंचन योजनेचा लोकार्पण सोहळा रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : इटियाडोह धरणामुळे बाधित झालेल्या १२ आदिवासी गावातील शेतकऱ्यांना जोपर्यंत झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी उपलब्ध होत नाही तोवर इटियाडोह धरणातील पाणी नवेगावबांध जलाशयात पाडू देणार नाही, असा आदिवासी गावातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे लोकार्पणाच्या लगीनघाईला ब्रेक लागणार आहे.झाशीनगर उपसा सिंचन योजना ही येरंडी, जब्बारटोला, पवनी, कोहलगाव,धाबेटेकडी, जांभळी, चुटिया, कान्होली, तिडका, झाशीनगर, येलोडी व रामपुरी या १२ आदिवासी गावातील २५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याच्या मुळ हेतूने तयार करण्यात आली. या योजनेद्वारे २५.३३ दलघमी पाण्यचा उपसा करुन सिंचन केले जाणार आहे. यावर्षी इटियाडोह धरणातील २५ दलघमी पाणी याकामी राखीव करण्यात आले आहे. मात्र अद्यापही मुख्य कालवा व उपकालव्यांचे काम पूर्ण झालेले नाही. परंतु झाशीनगर उपसा सिंचन विस्तारित योजनेद्वारे नवेगाव जलाशयात पाणी सोडून लोकार्पणाची घाई करण्यात येत आहे. दोन दिवसांपुर्वीच राष्टÑवादी काँग्रेसचे जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, राकाँचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, जि.प. सदस्य किशोर तरोणे यांनी या कार्यक्रमाचा पत्रकार परिषदेतून विरोध केला होता.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने झाशीनगर उपसा सिंचन योजना टप्पा १ च्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन २९ डिसेंबरला केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले व उद्घाटक म्हणून जलसंपदा जलसंधारण आणि सांसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे हे राहणार होते. पाटबंधारे महामंडळातर्फे लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. हा लोकार्पण सोहळा येरंडी दर्रे या गावात होत असला तरी याची माहिती या योजनेच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकºयांना नव्हती हे विशेष. वर्तमानपत्रातून जेव्हा या सोहळ्याची प्रसिद्धी झाली तेव्हा परिसरातील शेतकरी आक्रमक झाले. कामे अपूर्ण व सिंचनाने शेतीला पाणी उपलब्ध होत नसतांना हा लोकार्पण सोहळा गुप्तपणे कसा पार पडला जात आहे. म्हणून शेतकरी अवाक राहिले. उद्दिग्न असलेले आदिवासी शेतकरी या कार्यक्रमाचा विरोध दर्शविण्यासाठी झाशीनगर येथून ट्रॅक्टरने लोकार्पणस्थळी एकत्र आले. मात्र या कार्यक्रमात कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक? हा सोहळाच रद्द झाला. विरोध करण्यासाठी गोळा झालेले आदिवासी शेतकरी हा कार्यक्रम रद्द झाल्याचे ऐकून आनंदाने गावाकडे परतले.टप्पा १ अंतर्गत लाभधारक क्षेत्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना जोपर्यंत सिंचनाचा लाभ मिळत नाही. तोपर्यंत टप्पा २ चे लोकार्पण होऊ देणार नाही. अशा घोषणा शेतकऱ्यांनी केल्या. या वेळी श्यामराव ठवरे, पं.स.सदस्य प्रेमलाल गेडाम, बळीराम कारंगे, ताराचंद ठवरे, भिमराव नंदेश्वर, विक्की अरोरा व १२ गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.