शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

१२ गावातील शेतकऱ्यांचा लोकार्पणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:17 IST

इटियाडोह धरणामुळे बाधित झालेल्या १२ आदिवासी गावातील शेतकऱ्यांना जोपर्यंत झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी उपलब्ध होत नाही तोवर इटियाडोह धरणातील पाणी नवेगावबांध जलाशयात पाडू देणार नाही, असा आदिवासी गावातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे लोकार्पणाच्या लगीनघाईला ब्रेक लागणार आहे.

ठळक मुद्देझाशीनगर उपसा सिंचन योजनेचा लोकार्पण सोहळा रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : इटियाडोह धरणामुळे बाधित झालेल्या १२ आदिवासी गावातील शेतकऱ्यांना जोपर्यंत झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी उपलब्ध होत नाही तोवर इटियाडोह धरणातील पाणी नवेगावबांध जलाशयात पाडू देणार नाही, असा आदिवासी गावातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे लोकार्पणाच्या लगीनघाईला ब्रेक लागणार आहे.झाशीनगर उपसा सिंचन योजना ही येरंडी, जब्बारटोला, पवनी, कोहलगाव,धाबेटेकडी, जांभळी, चुटिया, कान्होली, तिडका, झाशीनगर, येलोडी व रामपुरी या १२ आदिवासी गावातील २५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याच्या मुळ हेतूने तयार करण्यात आली. या योजनेद्वारे २५.३३ दलघमी पाण्यचा उपसा करुन सिंचन केले जाणार आहे. यावर्षी इटियाडोह धरणातील २५ दलघमी पाणी याकामी राखीव करण्यात आले आहे. मात्र अद्यापही मुख्य कालवा व उपकालव्यांचे काम पूर्ण झालेले नाही. परंतु झाशीनगर उपसा सिंचन विस्तारित योजनेद्वारे नवेगाव जलाशयात पाणी सोडून लोकार्पणाची घाई करण्यात येत आहे. दोन दिवसांपुर्वीच राष्टÑवादी काँग्रेसचे जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, राकाँचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, जि.प. सदस्य किशोर तरोणे यांनी या कार्यक्रमाचा पत्रकार परिषदेतून विरोध केला होता.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने झाशीनगर उपसा सिंचन योजना टप्पा १ च्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन २९ डिसेंबरला केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले व उद्घाटक म्हणून जलसंपदा जलसंधारण आणि सांसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे हे राहणार होते. पाटबंधारे महामंडळातर्फे लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. हा लोकार्पण सोहळा येरंडी दर्रे या गावात होत असला तरी याची माहिती या योजनेच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकºयांना नव्हती हे विशेष. वर्तमानपत्रातून जेव्हा या सोहळ्याची प्रसिद्धी झाली तेव्हा परिसरातील शेतकरी आक्रमक झाले. कामे अपूर्ण व सिंचनाने शेतीला पाणी उपलब्ध होत नसतांना हा लोकार्पण सोहळा गुप्तपणे कसा पार पडला जात आहे. म्हणून शेतकरी अवाक राहिले. उद्दिग्न असलेले आदिवासी शेतकरी या कार्यक्रमाचा विरोध दर्शविण्यासाठी झाशीनगर येथून ट्रॅक्टरने लोकार्पणस्थळी एकत्र आले. मात्र या कार्यक्रमात कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक? हा सोहळाच रद्द झाला. विरोध करण्यासाठी गोळा झालेले आदिवासी शेतकरी हा कार्यक्रम रद्द झाल्याचे ऐकून आनंदाने गावाकडे परतले.टप्पा १ अंतर्गत लाभधारक क्षेत्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना जोपर्यंत सिंचनाचा लाभ मिळत नाही. तोपर्यंत टप्पा २ चे लोकार्पण होऊ देणार नाही. अशा घोषणा शेतकऱ्यांनी केल्या. या वेळी श्यामराव ठवरे, पं.स.सदस्य प्रेमलाल गेडाम, बळीराम कारंगे, ताराचंद ठवरे, भिमराव नंदेश्वर, विक्की अरोरा व १२ गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.