शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

२५ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:46 IST

मागील वर्षी खरीप हंगामात कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर शासनाने आमगाव व सालेकसा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्देकीडरोगामुळे झाले होते नुकसान : पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : मागील वर्षी खरीप हंगामात कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर शासनाने आमगाव व सालेकसा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.आमगाव, सालेकसा, देवरी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली होती.सुरूवातीला या पिकांना पावसाचा व त्यानंतर कीडरोगाचा फटका बसला. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमविण्याची पाळी आली होती. कीडरोगांमुळे हाती आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचे संकट ओढवले. बँकेतून व उधार उसनवारी करुन शेतकऱ्यांनी खरीपात पिकांची लागवड केली होती. मात्र कमी पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे यावर पाणी फेरल्या गेले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. कीडरोगांमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. याचीच दखल आ. सजंय पुराम यांनी या दोन्ही तालुक्यातील कीडरोगांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला. शेतकऱ्यांना नुकसान भरापाई मिळावी, यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत शासनाने या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १२ कोटी १० लाख ५९ हजार २२६ रूपयांचा निधी मंजूर केला. याचा लाभ आमगाव तालुक्यातील १४ हजार ४३ शेतकऱ्यांना तर सालेकसा तालुक्यातील ११ हजार ४८९ शेतकऱ्यांना मिळणार आहे. नुकसान भरपाईपोटी मंजुर झालेल्या निधी तहसील कार्यालयातंर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे. हंगामाला सुरूवात झाली असून नुकसान भरपाईच्या रक्कमेचे वाटप लवकर होणार का याकडे लक्ष आहे.शासन शेतकऱ्यांच्या पाठीशीकमी पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शासनाने सुध्दा याची दखल घेत १२ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे आ.संजय पुराम यांनी सांगितले.