शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:46 IST

मागील वर्षी खरीप हंगामात कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर शासनाने आमगाव व सालेकसा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्देकीडरोगामुळे झाले होते नुकसान : पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : मागील वर्षी खरीप हंगामात कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर शासनाने आमगाव व सालेकसा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.आमगाव, सालेकसा, देवरी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली होती.सुरूवातीला या पिकांना पावसाचा व त्यानंतर कीडरोगाचा फटका बसला. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमविण्याची पाळी आली होती. कीडरोगांमुळे हाती आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचे संकट ओढवले. बँकेतून व उधार उसनवारी करुन शेतकऱ्यांनी खरीपात पिकांची लागवड केली होती. मात्र कमी पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे यावर पाणी फेरल्या गेले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. कीडरोगांमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. याचीच दखल आ. सजंय पुराम यांनी या दोन्ही तालुक्यातील कीडरोगांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला. शेतकऱ्यांना नुकसान भरापाई मिळावी, यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत शासनाने या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १२ कोटी १० लाख ५९ हजार २२६ रूपयांचा निधी मंजूर केला. याचा लाभ आमगाव तालुक्यातील १४ हजार ४३ शेतकऱ्यांना तर सालेकसा तालुक्यातील ११ हजार ४८९ शेतकऱ्यांना मिळणार आहे. नुकसान भरपाईपोटी मंजुर झालेल्या निधी तहसील कार्यालयातंर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे. हंगामाला सुरूवात झाली असून नुकसान भरपाईच्या रक्कमेचे वाटप लवकर होणार का याकडे लक्ष आहे.शासन शेतकऱ्यांच्या पाठीशीकमी पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शासनाने सुध्दा याची दखल घेत १२ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे आ.संजय पुराम यांनी सांगितले.