शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

११.४८ टक्केच निधी खर्च

By admin | Updated: August 15, 2015 01:41 IST

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०१५-१६ करिता वितरित निधीच्या केवळ ११.४८ टक्केच निधी गेल्या चार महिन्यात खर्च झाला आहे.

नियोजन समितीची बैठक : तीन महिन्यांत खर्चाचे नियोजन करणारगोंदिया : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०१५-१६ करिता वितरित निधीच्या केवळ ११.४८ टक्केच निधी गेल्या चार महिन्यात खर्च झाला आहे. प्राप्त निधीच्या तुलनेतील हा खर्च केवळ ५.६ टक्के आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यात निधीचा विनियोग लावण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ना.राजकुमार बडोले यांनी दिले.समितीची बैठक शुक्रवारी (दि.१४) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, खासदार अशोक नेते, आ.गोपालदास अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, पालक सचिव डॉ.पी.एस. मीना, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी दिलीप गावडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, नगर परिषदेतील जिल्हा नियोजन समितीवर असलेले सदस्य तथा कार्यान्वित यंत्रणांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.या बैठकीत मार्च २०१५ अखेर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या १७६ कोटी ७८ लाख, २३ हजार रुपयांच्या एकूण खर्चास मान्यता देण्यात आली. हा खर्च एकूण तरतुदीच्या ९९.०३ टक्के आहे. आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये १८२ कोटी ४५ लाख ९४ हजाराची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी १७८ कोटी ५१ लाख ४६ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. वर्ष २०१५-१६ करिता अर्थसंकल्पीय तरतुदीत मोठी वाढ करून २२३ कोटी ३० लाख ३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी १९१ कोटी ३० लाख ४९ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला तर ८७ कोटी ६६ लाख ११ हजारांचा निधी वितरित करण्यात आला. मात्र त्यापैकी एप्रिल ते जुलै या चार महिन्यात केवळ १० कोटी ६ लाख २४ हजार खर्च करण्यात आले. त्यात सर्वसाधारण योजनांवर २ कोटी ५३ लाख ३५ हजार, आदिवासी उपयोजनांवर ५१ कोटी ९ लाख ३१ हजार, ओटीएसपी योजनांवर २३ कोटी ३ लाख ५८ हजार तर अनुसूचित जाती उपयोजनांवर कोणताही खर्च झाला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)आचारसंहितेमुळे निधीची विल्हेवाट लागण्यास उशीरगेल्या काही दिवसात सतत झालेल्या निवडणुका आणि आचारसंहितेमुळे निधीची योग्य विल्हेवाट लावणे शक्य झाले नसल्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी नियोजन समितीच्या सभेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.