शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येची ११४ प्रकरणे अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:41 IST

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. आधीच शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आता प्रशासकीय धोरणांचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात मागील १८ वर्षात २५२ शेतकरी आत्महत्यांपैकी तब्बल ११४ शेतकºयांच्या आत्महत्या मदतीस अपात्र ठरविल्या आहे. त्यामुळे मदत मिळावी यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पायपीट सुरू आहे.

ठळक मुद्दे१८ वर्षात २५२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या : १३६ शेतकऱ्यांना दिली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. आधीच शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आता प्रशासकीय धोरणांचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात मागील १८ वर्षात २५२ शेतकरी आत्महत्यांपैकी तब्बल ११४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीस अपात्र ठरविल्या आहे. त्यामुळे मदत मिळावी यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांची पायपीट सुरू आहे.गोंदिया जिल्ह्यात २००२ व २००३ या वर्षात प्रत्येकी एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. सन २००४ मध्ये ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. सन २००५ मध्ये आत्महत्या करणाऱ्या ६ शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. सन २००६ मध्ये २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. सन २००७ मध्ये १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील २ शेतकरी आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आल्या. २००८ मध्ये १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरल्या. २००९ मध्ये १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे नोंद करण्यात आली. परंतु यातील ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जामुळे नसल्याचे ठरवून मदत दिली नाही.२०१० मध्ये २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. २०११ मध्ये १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील ३ शेतकऱ्यांचे कर्ज नसल्यामुळे त्या आत्महत्यांना अपात्र ठरविण्यात आले. २०१२ मध्ये १० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरल्या. सन २०१३ मध्ये ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यातील दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. २०१४ मध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आहेत.२०१५ व २०१६ मध्ये प्रत्येकी ३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.यातील दोन्ही वर्षात प्रत्येकी २१-२१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरल्या आहेत. सन २०१७ मध्ये १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरल्या. सन २०१८ मध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील १२ शेतकºयांच्या कुटुंबीयांना मदत नाकारण्यात आली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या २५२ पैकी फक्त १३६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रूपयाची मदत देण्यात आली.आत्महत्येचे सत्र सुरूचजिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. दरवर्षी शेतकरी आत्महत्यामध्ये वाढ होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. सन २०१९ या वर्षातही जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नाही. चौकशीकरीता सदर प्रकरण असल्याचे पुढे आले आहे.अपात्रतेसाठी वेगळीच कारणेसततची नापीकी, दुष्काळ यामुळे शेती तोट्याची होत चालली आहे. त्यामुळे शेती करणाºया शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते. परंतु त्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ आणि यातून आलेल्या नैराश्यापोटी शेतकरी आत्महत्या करतो.त्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले नाही म्हणून त्या शेतकरी आत्महत्येला मदतीपासून नाकारण्यात येत आहे. उसणवारीवर घेतलेल्या पैशाकडे शासन लक्ष देत नसून शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरवित आहे.