शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

११२ गावांनी कोराेनाला वेशीवरच रोखले ! (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST

गोंदिया : कोराेना विषाणूने जगात थैमान घातले. गोंदिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत ...

गोंदिया : कोराेना विषाणूने जगात थैमान घातले. गोंदिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत गेला. जिल्ह्यातील २ शहरांसोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक झाला. जिल्ह्यातील एकूण ९३१ गावांपैकी ८१९ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यातील ४४९ गावांमध्ये अजूनही रूग्ण क्रियाशील आहेत, तर ११२ गावांत अजूनही कोरोनाने पाय ठेवला नाही. ग्रामीण भागातील लोकांच्या सतर्कतेमुळे ११२ गावांत वेशीवरच कोरोनाला रोखण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.

कोरोना स्वत:हून येत नाही तर कोरोनाला आणायला जाऊ नका, असा संदेश ग्रामीण भागात देण्यात आल्याने आजही ११२ गावांपर्यंत कोरोना पोहोचू शकला नाही. गावकऱ्यांकडून गावात कोरोना रोखण्यासाठी समित्या तयार करण्यात आल्या. त्या समित्यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवून कोरोनाला वेशीबाहेर थांबविण्याचा प्रयत्न केला. आरोग्य विभाग, आशा कार्यकर्त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. आता महाराष्ट्र शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ हा उपक्रम आणून कोरोनासंदर्भात जनजागृती केली. शारीरिक अंतर ठेवून तोंडाचा मास्क खाली उतरू देऊ नका, असे आवाहन करण्यात आले.

..........

सद्यस्थितीत रुग्ण-२३८६

शहरी रुग्ण-१४८६

ग्रामीण रुग्ण- ९००

कोरोनावर मात-१५६३२

एकूण मृत्यू-२०२

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण- २७ मार्च २०२०

जिल्ह्यात एकूण गावे-९३१

गावांत कोरोनाचा रुग्ण नाही-११२

......

आधी रुग्ण आढळला पण सद्या शुन्यावर

गोंदिया जिल्ह्यातील ३७० गावांत यापूर्वी रूग्ण आढळले होते. परंतु आता ही गावे शुन्यावर आहेत. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी आता गावकऱ्यांचे तेवढे उपक्रम सुरू नाहीत, तर आपली काळजी आपणच घेण्याची जनजागृती आता होत आहे.

........

कोट

कोरोनावर औषध नसल्याने लोकांनी सुरुवातीपासून काळजी घेतली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ या उपक्रमाला उत्कृष्टपणे राबिवले. याची ही फलश्रुती आहेे. आपल्या गावात कोरोना येऊ नये, यासाठी गावकऱ्यांनी काळजी घेतली. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात कीटकनाशक फवारणी केली. गावकऱ्यांना साबणाचे वाटप करून जनजागृती करण्यात सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अग्रेसर राहिले.

रोशनी राजकुमार भुते, सरपंच, शिलापूर

...........

प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधावा, यासाठी ग्रामपंचायतीकडून मास्क वितरण करण्यात आले. सुरुवातीला गावातील सीमा सील केल्या होत्या. मोठ्या शहरातून किंवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तिंसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये अलगीकरण, विलगीकरण कक्ष तयार केले होते. बाहेरून येणाऱ्यांना गावाबाहेर राहण्याची सोय केली होती. सोबतच त्यांच्या खाण्यापिण्याची सोयदेखील गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून केली.

- लीलेश्वर खुने, सरपंच, संभलपूर

.......

सुरूवातीपासून माहिती न देणाऱ्याला दंड ठोठावण्यात आला. आधी माहिती द्या, अशी जागृती गावात दवंडी देऊन करण्यात आली. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले. मास्कचा वापर करण्याबाबत जनजागृती केली. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यावर भर दिला.

मार्कंड बडवाईक, उपसरपंच, बिटटोला