शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार गरजूंना मदतीचा हात

By admin | Updated: August 13, 2016 00:10 IST

गरजूंना मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत करणारी संजय गांधी व श्रावणबाळ योजना वरदान ठरत आहे.

संजय गांधी-श्रावणबाळ योजना : फक्त १२९ प्रस्ताव प्रलंबित गोंदिया : गरजूंना मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत करणारी संजय गांधी व श्रावणबाळ योजना वरदान ठरत आहे. योजनेंतर्गत तालुक्यात ११ हजार २२ लाभार्थ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. तर फक्त १२९ प्रस्ताव प्रलंबीत असल्याची माहिती आहे. तोकडी का असो ना मात्र योजनेतून काही तरी मदत पुरविण्याचे कार्य शासनाकडून केले जात आहे. निराधारांसह गरजूंना आर्थिक मदत करता यावी या उद्देशातून शासनाने संजय गांधी व श्रावणबाळ योजना सुरू केली आहे. यातील संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ६४ वर्षापर्यंतच्या विधवा, अपंग, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त, परित्यक्ता व घटस्फोटीतांना मदत दिली जाते. तर श्रावणबाळ योजनेंतर्गत ६५ वर्षानंतरच्या वृद्ध व अपंगांना या योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. यासाठी तालुकास्तरावर संबंधीतांकडून प्रस्ताव मागवून यासाठी असलेल्या समितीच्या माध्यमातून प्रस्तावांना मंजूरी दिली जाते. यासाठी गठीत समितीची तीन महिन्यांतून एकदा सभा होत असल्याची माहिती असून त्यातूनच प्रस्तावांना मंजूरी दिली जात असल्याची प्रक्रीया आहे. या दोन्ही योजनांतर्गत तालुक्यात ११ हजार २२ लाभार्थ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जात आहे. यात संजय गांधी योजनेंतर्गत ५३३१ तर श्रावणबाळ योजनेंतर्गत ५६९१ लाभार्थी लाभ घेत आहेत. येथे शहर व ग्रामीण क्षेत्र बघावयाचे झाल्यास शहरी क्षेत्रात संजय गांधी योजनेचे १७६७ व श्रावणबाळ योजनेचे ११४४ लाभार्थी आहेत. तर ग्रामीण क्षेत्रात संजय गांधी योजनेचे ३४६५ व श्रावणबाळ योजनेचे ४५४७ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना दरमहा ६०० रूपयांची आर्थिक मदत दिली जात असून थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते. विशेष म्हणजे बीपीएल लाभार्थ्यांना ४०० रूपये राज्य तर २०० रूपये केंद्र शासनाकडून दिले जातात. (शहर प्रतिनिधी) अनुदानात वाढ करा मदतीचा हात म्हणून शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या या योजना वाखाणण्याजोग्या आहेत. मात्र आजघडीला महागाई बघता ६०० रूपयांत संबंधीत लाभार्थ्यांना एक वेळचे जेवण किंवा आवश्यक ती गरज भागविणे शक्य नाही. अशात शासनाकडून दिले जाणारे हे अनुदान एक थट्टाच वाटते. अन्यत्र वारेमाप खर्च करीत असतानाच शासनाकडून या निराधार व गरजूंसाठी थोडा हात सैल करण्याची गरज असल्याचेही लाभार्थ्यांकडून अपेक्षीत आहे.