शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

10 कर्मचारी परतले कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असलेले हे आंदोलन उच्च न्यायालयात होते व त्यावर ७ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने सुनावणी घेत कारवाईची भीती बाळगता २२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत रूजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यात वाढ करून २२ एप्रिलची मुदत देण्यात आली आहे. 

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यापासून महामंडळातील कर्मचारी आंदोलनावर गेले आहेत. यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा कारभार विस्कळीत झाला आहे. वाहक व चालक आंदोलनात असल्यामुळे मध्यंतरी एसटीच्या संपूर्ण फेऱ्या रद्द होऊन एसटी आगारातच उभी होती. अशात महामंडळाने कंत्राटी तत्त्वावर चालक घेऊन फेऱ्या सुरू केल्या व त्यानंतर आता मोजक्याच फेऱ्या सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला घेऊन ७ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. अशात आता राज्यातील सर्वच कर्मचारी कामावर रूजू होतील, असे समजते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील दोन्ही आगारांत १० कर्मचारी कामावर परतले आहेत. यामध्ये ४ चालकांचा समावेश असल्याने आता दोन्ही आगारांतील फेऱ्यांमध्ये वाढ होणार असल्याचे दिसते.  फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यास प्रवाशांना आणखी सोयीचे होणार आहे. 

४ चालक, ३ वाहक परतले - राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ऑक्टोबर महिन्यापासून सुरू आहे. या आंदोलनात सर्वच चालक व वाहक सहभागी झाले होते. मात्र, काही कामावर परतल्याचेही दिसून आले. तरीही बहुतांश कर्मचारी आंदोलनात असल्याने महामंडळाला कारभार विस्कटला होता. त्यात ७ एप्रिल रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गोंदिया आगारात २ मेकॅनिक व २ चालक परतले आहेत, तर तिरोडा आगारातील २ चालक, ३ वाहक व १ मॅकेनिक कामावर परतला आहे. 

एसटीच्या फेऱ्या वाढणार - गोंदिया आगारात सध्या २६ चालक ५४ फेऱ्या मारत आहेत. अशात आता आणखी २ चालक कामावर परतल्याने त्यांच्याकडून ६ फेऱ्या वाढवून घेतल्या जातील. त्यानंतर आता ६० फेऱ्या होतील, असा अंदाज आहे, तर तिरोडा आगारात सध्या १५ चालक ४४ फेऱ्या मारत आहेत. त्यात आता २ चालक वाढल्याने सुमारे १० फेऱ्या वाढतील म्हणतेच ५४ फेऱ्या होतील, असा अंदाज आहे. 

२२ एप्रिलची डेडलाईन ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असलेले हे आंदोलन उच्च न्यायालयात होते व त्यावर ७ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने सुनावणी घेत कारवाईची भीती बाळगता २२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत रूजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यात वाढ करून २२ एप्रिलची मुदत देण्यात आली आहे. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता २ चालक कामावर परतले आहेत. आता ते आल्याने फेऱ्या वाढविल्या जातील व परिणामी प्रवाशांना आणखी सोयीचे होणार आहे. - संजना पटले, आगार प्रमुख, गोंदिया

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप