शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

मालगाडीच्या धडकेत वाघाचा १ बछडा ठार, १ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:32 IST

गोंदिया : वाघिणीसह तिचे तीन बछडे रेल्वे रुळ पार करीत असताना बल्लारशाकडून गोंदियाकडे येणाऱ्या मालगाडीने दिलेल्या धडकेत १ बछडा ...

गोंदिया : वाघिणीसह तिचे तीन बछडे रेल्वे रुळ पार करीत असताना बल्लारशाकडून गोंदियाकडे येणाऱ्या मालगाडीने दिलेल्या धडकेत १ बछडा ठार तर १ बछडा जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.८) सकाळी ६ वाजताच्या सुमारास गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावरील तिरोडा तालुक्यातील गराडा गावाजवळ घडली.

गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गालगतचा बराच भाग हा नवेगावबांध-नागझिरा अभयारण्य लगत आहे, त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांची वर्दळ असते. दोन दिवसांपूर्वीच हावडा-मुंबई मार्गावर रेल्वेच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता एक बछडा ठार तर एक बछडा गंभीर झाल्याची घटना घडली. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या दरम्यान नागझिरा अभयारण्यातील टि-१४ वाघिणी आपल्या तिन्ही बछड्यांसह पांढरी-गराडा परिसरात वावरत होती. दरम्यान, आपल्या बछड्यांसह गोंदिया-बल्लारशा मार्गावरील रेल्वे रुळ पार करीत असताना बल्लारशाकडून गोंदियाकडे येणाऱ्या मालगाडीने धडक दिली. यात एक बछडा ठार झाला तर एक बछडा जखमी झाल्याची माहिती आहे. टि-१४ वाघिण गेल्या दोन तीन वर्षांपासून या भागात वास्तव्यास आहे. तिचे तिन्ही बछडे हे सहा ते आठ महिन्यांचे होते. एका बछड्याचा मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान, या घटनेची माहिती गावकऱ्यांनी वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक कुलराज सिंह, सहायक उपवनसंरक्षक आर.आर.सदगिर,नागझिरा अभयारण्याच्या उप-संचालक पुनम पाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, वन विभागाचेे क्षेत्रसहायक धुर्व दोनोडे यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली.

.........

अनेक वन्य प्राण्यांचा बळी जाऊनही दखल नाही

रेल्वे आणि वाहनाच्या धडकेत मागील वर्षभरात पंधरा ते वीस वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, तसेच याला प्रतिबंध लावून उपाययोजना करण्याची मागणी अनेक दिवसांपासून वन्यप्रेमींकडून केली जात आहे; पण यानंतरही वन्यजीव विभाग, वन विभाग व रेल्वे विभाग यांच्याकडून कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी, वन्य प्राण्यांचा नाहक बळी जात आहे.

.......