शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांचे १ हजार ६२९ प्रस्ताव निबंधकांकडे

By admin | Updated: July 5, 2015 02:05 IST

सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधीत तालुक्याचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहे.

संख्या वाढणार : सर्वाधिक प्रस्ताव अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून गोंदिया : शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने सावकारांकडून येत्या ३० जून पर्यंत प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार जिल्ह्यातून एकूण १६२९ प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे जमा झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रस्तावांत आणखी वाढ होणार असून आजघडीला सर्वाधिक प्रस्ताव अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दिसून येत आहेत. खासगी सावकारांकडील कर्ज हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील प्रमुख कारण असल्याचे विविध समितींच्या अहवालांतून पुढे आले आहे. त्यामुळे दुष्काळी भागात मोडत असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी किंवा त्यांच्या कुंटुबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर या योजनेंतर्गत परवानाधारक सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधीत तालुक्याचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील सावकारांनी त्यांच्या तालुकास्थळावर सहायक निबंधकांकडे १६२९ प्रस्ताव सादर केले आहेत. यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातून सर्वाधिक ६९९ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. गोंदिया तालुक्यातून फक्त चार प्रस्ताव प्राप्त झाल्याचे नमूद आहे. या शिवाय तिरोडा तालुक्यातून ३७१, सडक-अर्जुनी तालुक्यातून ५५५ प्रस्ताव आले आहेत. (शहर प्रतिनिधी)आणखी प्रस्ताव येणारसध्या तरी जिल्हा उपनिबंधकांकडे १६२९ प्रस्ताव असले तरी त्यांची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती आहे. यात देवरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येणार आहेत. शिवाय अन्य तालुक्यातूनही थोड्याफार प्रमाणात प्रस्ताव वाढणार असल्याची माहिती आहे. कर्जमाफीसाठी ३.६० कोटी मिळालेशासनाकडून शेतकऱ्याचे कर्जमाफी करण्यासाठी अर्थात प्रस्ताव सादर करणाऱ्या देण्यासाठी शासनाकडून निबंधकांच्या खात्यात ३.६० कोटी रूपये टाकण्यात आले आहेत. निबंधकांकडे असलेले १६२९ प्रस्तावएक कोटी ८० लाख ३७ हजार १२३ रूपयांचे आहेत. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांची एवढी रक्कम माफ केली जाणार असल्याचे समजते. मात्र त्यानंतरी निबंधकांच्या खात्यात रक्कम शिल्लक राहणार असल्याने पुढे येणारे प्रस्तावही माफ होतील. प्रस्ताव काढणार निकाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका त्यानंतर त्यांचे निकाल आल्याने शासकीय यंत्रणा त्या कामांत व्यस्त आहे. जिल्हाधिकारीही कामांत व्यस्त असल्याने या प्रकरणाला घेऊन बैठक झालेली नाही. मात्र या आठवड्यांत शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर बैठक होणार असून त्यात बहुतांश प्रस्ताव निकाली काढले जातील असे जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्याकडून कळले.