शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

सावकारांचे १ हजार ६२९ प्रस्ताव निबंधकांकडे

By admin | Updated: July 5, 2015 02:05 IST

सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधीत तालुक्याचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहे.

संख्या वाढणार : सर्वाधिक प्रस्ताव अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून गोंदिया : शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने सावकारांकडून येत्या ३० जून पर्यंत प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार जिल्ह्यातून एकूण १६२९ प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे जमा झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रस्तावांत आणखी वाढ होणार असून आजघडीला सर्वाधिक प्रस्ताव अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दिसून येत आहेत. खासगी सावकारांकडील कर्ज हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील प्रमुख कारण असल्याचे विविध समितींच्या अहवालांतून पुढे आले आहे. त्यामुळे दुष्काळी भागात मोडत असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी किंवा त्यांच्या कुंटुबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर या योजनेंतर्गत परवानाधारक सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधीत तालुक्याचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील सावकारांनी त्यांच्या तालुकास्थळावर सहायक निबंधकांकडे १६२९ प्रस्ताव सादर केले आहेत. यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातून सर्वाधिक ६९९ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. गोंदिया तालुक्यातून फक्त चार प्रस्ताव प्राप्त झाल्याचे नमूद आहे. या शिवाय तिरोडा तालुक्यातून ३७१, सडक-अर्जुनी तालुक्यातून ५५५ प्रस्ताव आले आहेत. (शहर प्रतिनिधी)आणखी प्रस्ताव येणारसध्या तरी जिल्हा उपनिबंधकांकडे १६२९ प्रस्ताव असले तरी त्यांची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती आहे. यात देवरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येणार आहेत. शिवाय अन्य तालुक्यातूनही थोड्याफार प्रमाणात प्रस्ताव वाढणार असल्याची माहिती आहे. कर्जमाफीसाठी ३.६० कोटी मिळालेशासनाकडून शेतकऱ्याचे कर्जमाफी करण्यासाठी अर्थात प्रस्ताव सादर करणाऱ्या देण्यासाठी शासनाकडून निबंधकांच्या खात्यात ३.६० कोटी रूपये टाकण्यात आले आहेत. निबंधकांकडे असलेले १६२९ प्रस्तावएक कोटी ८० लाख ३७ हजार १२३ रूपयांचे आहेत. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांची एवढी रक्कम माफ केली जाणार असल्याचे समजते. मात्र त्यानंतरी निबंधकांच्या खात्यात रक्कम शिल्लक राहणार असल्याने पुढे येणारे प्रस्तावही माफ होतील. प्रस्ताव काढणार निकाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका त्यानंतर त्यांचे निकाल आल्याने शासकीय यंत्रणा त्या कामांत व्यस्त आहे. जिल्हाधिकारीही कामांत व्यस्त असल्याने या प्रकरणाला घेऊन बैठक झालेली नाही. मात्र या आठवड्यांत शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर बैठक होणार असून त्यात बहुतांश प्रस्ताव निकाली काढले जातील असे जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्याकडून कळले.