शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
3
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
4
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
5
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
6
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
7
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
8
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
9
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
10
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
11
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
12
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
13
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
14
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
15
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
16
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
17
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
18
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
19
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
20
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

गोव्याच्या सांस्कृतिक वैभवाचा युवकांना विसर

By admin | Updated: December 29, 2014 01:48 IST

राजेंद्र आर्लेकर : साखळी येथे रवींद्र महोत्सवाचा समारोप

डिचोली : गोव्याची परंपरा व संस्कृती महान आहे. शेकडो वर्षांपासून पिढ्यान््पिढ्या ती जपण्याचे कार्य आजपर्यंत झालेले आहे. लोकोत्सव, सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून सातत्याने नव्या पिढीला हा समृद्ध वारसा पुनर्जीवित करण्याचे भाग्य लाभत असते. दुर्दैवाने या जुन्या परंपरांचे, कलांचे महत्त्व नव्या पिढीला समजत नाही. त्यामुळे रवींद्र महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक संचित व वारसा जपण्याचा हा प्रयत्न अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी केले. साखळी येथे रवींद्र भवनात दोन दिवशीय रवींद्र महोत्सवाचा समारोप रविवारी झाला. त्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर उपसभापती अनंत शेट, आमदार डॉ. प्रमोद सावंत, भाजपाचे विश्वजित कृ. राणे, रवींद्र काणेकर, उमेश सरनाईक, उपेंद्र कर्पे आदी उपस्थित होते. आर्लेकर म्हणाले की, नवी पिढी आधुनिक संस्कृतीकडे वळत असल्याने व त्यांना पालकांचेही प्रोत्साहन लाभत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. एकीकडे विशिष्ट संगीत महोत्सवातून विकृतीचा खेळ सुरू असताना संस्कृतीच्या रक्षणासाठी रवींद्र महोत्सवाचे आयोजन करून त्या विकृतीवर मात केली जात आहे. संस्कृती व सांस्कृतिक वारसा जपण्याचे महान कार्य या महोत्सवातून होत असल्याची समाधानाची बाब आहे. युवा पिढीने हा वारसा टिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे सांगून आर्लेकर यांनी संस्कृती व विकृतीतील फरक ओळखण्याचे आवाहन केले. या वेळी विविध पथकांनी लोककलेचा आविष्कार सादर केला. फुगडी, धालो, रणमाले, मोदलो आदी नृत्यांचे सादरीकरण झाले. दोन दिवसांत झालेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. रेणुका देसाई, हनुमंत परब यांनी महोत्सवाचा आढावा घेतला. या वेळी शंभरी उलटलेल्या तारामती गावकर यांचा सभापती आर्लेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आमदार सावंत यांनी स्वागत केले. प्रमोद महाडेश्वर यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. पुरातन वस्तूंचे प्रदर्शन, चित्रकला, पाककला व लघु उद्योगाच्या स्टॉलवर गर्दी होती. (प्रतिनिधी)