शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

तरुणांनो, शेतीमध्ये उतरा

By admin | Updated: January 3, 2016 01:45 IST

साखळी : भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्याचप्रमाणे गोवा राज्यातही कृषी संस्कृती अविरत नांदत आली आहे. परंतु

साखळी : भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्याचप्रमाणे गोवा राज्यातही कृषी संस्कृती अविरत नांदत आली आहे. परंतु काही कारणास्तव आज कृषी संस्कृती लोप पावण्याची भीती आहे. हा व्यवसाय जोमाने पुढे नेऊन कृषी संस्कृती टिकवण्यासाठी ज्येष्ठांबरोबरच तरुणाईनेही पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे हंगामी सभापती तथा मये मतदारसंघाचे आमदार अनंत शेट यांनी साखळी येथे केले. कृषी संचालनालय, गोवा आणि विभागीय कृषी कार्यालय, साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने साखळी रवींद्र भवनात कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे या नात्याने उपसभापती अनंत शेट उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर साखळी मतदारसंघाचे आमदार तथा साखळी रवींद्र भवनचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित होते. खास निमंत्रित म्हणून पाळी मतदारसंघाचे माजी आमदार सदानंद मळीक, गोवा राज्य कृषी संचालनालयाचे संचालक उल्हास पै काकोडे, साखळी कृषी खात्याचे कृषी अधिकारी किशोर भावे, गोवा फलोत्पादन महामंडळाचे संचालक सुभाष मळीक, संतोष मळीक, विश्वंभर गावस, शांबा गावकर, भोला खोडगीणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनंत शेट म्हणाले की, एकेकाळी आपल्या पूर्वजांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी शेतीत आपले सर्वस्व पणाला लावले. कित्येक वर्षे गोव्यातील शेती कसण्याबरोबरच कृषी संस्कृतीलाही चालना मिळाली. परंतु आज नोकरीच्या मोहात अडकलेला तरुण शेती व्यवसायाला दुय्यम मानू लागला आहे. त्याचप्रमाणे शेतकामगारांच्या कमतरतेमुळे आणि महागाईमुळे शेती व्यवसायाला खीळ बसू लागली आहे. हे चित्र बदलायला हवे, असे शेट म्हणाले. डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, भाजपाचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यावर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक शेतीप्रधान कामांना चालना मिळाली. शेतातील गाळ उपसण्याबरोबरच विविध योजना आखून शेती व्यवसायातील अडथळे दूर केले आहे. आवश्यक त्या ठिकाणी बंधारे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना साधनसुविधा पुरविल्या. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने शेतीत कष्ट करण्याची तयारी ठेवून एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे. यावेळी माजी मंत्री सदानंद मळीक म्हणाले, खाणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कृषी खात्याने अधिक सवलती द्यावात. खाणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती देऊन शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. कृषी अधिकारी किशोर भावे यांनी सर्वांचे स्वागत केले. कृषी खात्याचे संचालक उल्हास पै काकोडे यांनी प्रास्ताविक करून सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कृषी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषी कार्डसाठी अर्ज केलेल्यांना उपसभापती अनंत शेट यांच्या हस्ते कृषी कार्ड देण्यात आले. किशोर भावे यांनी आभार व्यक्त केले, तर डॉ. गोविंद परब यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)