शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनो, शेतीमध्ये उतरा

By admin | Updated: January 3, 2016 01:45 IST

साखळी : भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्याचप्रमाणे गोवा राज्यातही कृषी संस्कृती अविरत नांदत आली आहे. परंतु

साखळी : भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्याचप्रमाणे गोवा राज्यातही कृषी संस्कृती अविरत नांदत आली आहे. परंतु काही कारणास्तव आज कृषी संस्कृती लोप पावण्याची भीती आहे. हा व्यवसाय जोमाने पुढे नेऊन कृषी संस्कृती टिकवण्यासाठी ज्येष्ठांबरोबरच तरुणाईनेही पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे हंगामी सभापती तथा मये मतदारसंघाचे आमदार अनंत शेट यांनी साखळी येथे केले. कृषी संचालनालय, गोवा आणि विभागीय कृषी कार्यालय, साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने साखळी रवींद्र भवनात कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे या नात्याने उपसभापती अनंत शेट उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर साखळी मतदारसंघाचे आमदार तथा साखळी रवींद्र भवनचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित होते. खास निमंत्रित म्हणून पाळी मतदारसंघाचे माजी आमदार सदानंद मळीक, गोवा राज्य कृषी संचालनालयाचे संचालक उल्हास पै काकोडे, साखळी कृषी खात्याचे कृषी अधिकारी किशोर भावे, गोवा फलोत्पादन महामंडळाचे संचालक सुभाष मळीक, संतोष मळीक, विश्वंभर गावस, शांबा गावकर, भोला खोडगीणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनंत शेट म्हणाले की, एकेकाळी आपल्या पूर्वजांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी शेतीत आपले सर्वस्व पणाला लावले. कित्येक वर्षे गोव्यातील शेती कसण्याबरोबरच कृषी संस्कृतीलाही चालना मिळाली. परंतु आज नोकरीच्या मोहात अडकलेला तरुण शेती व्यवसायाला दुय्यम मानू लागला आहे. त्याचप्रमाणे शेतकामगारांच्या कमतरतेमुळे आणि महागाईमुळे शेती व्यवसायाला खीळ बसू लागली आहे. हे चित्र बदलायला हवे, असे शेट म्हणाले. डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, भाजपाचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यावर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक शेतीप्रधान कामांना चालना मिळाली. शेतातील गाळ उपसण्याबरोबरच विविध योजना आखून शेती व्यवसायातील अडथळे दूर केले आहे. आवश्यक त्या ठिकाणी बंधारे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना साधनसुविधा पुरविल्या. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने शेतीत कष्ट करण्याची तयारी ठेवून एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे. यावेळी माजी मंत्री सदानंद मळीक म्हणाले, खाणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कृषी खात्याने अधिक सवलती द्यावात. खाणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती देऊन शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. कृषी अधिकारी किशोर भावे यांनी सर्वांचे स्वागत केले. कृषी खात्याचे संचालक उल्हास पै काकोडे यांनी प्रास्ताविक करून सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कृषी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषी कार्डसाठी अर्ज केलेल्यांना उपसभापती अनंत शेट यांच्या हस्ते कृषी कार्ड देण्यात आले. किशोर भावे यांनी आभार व्यक्त केले, तर डॉ. गोविंद परब यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)