शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

‘कालचा गोंधळ बरा नव्हता’

By admin | Updated: September 14, 2015 02:01 IST

दोन आठवड्यांपूर्वी अगदीच अनिर्बंध असलेली पणजी शहरातील वाहतूक काही नियमांची वळणे घालून ‘वन वे’ करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घे

दोन आठवड्यांपूर्वी अगदीच अनिर्बंध असलेली पणजी शहरातील वाहतूक काही नियमांची वळणे घालून ‘वन वे’ करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आणि अंमलबजावणीही केली. पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून वळणे रोखली किंवा सक्तीची वळणे घेण्यास भाग पाडले तेव्हा सुरुवातीला अनेकांनी नाके मुरडली; परंतु दोन आठवड्यांनंतरचा अनुभव मात्र नवीन व्यवस्था ही योग्य आणि सुखकर असल्याचा निष्कर्ष काढत आहे. कालपर्यंत चाललेला गोंधळ हा योग्य नव्हता, हेच आता स्पष्ट होत आहे. पणजीत नेहमीच होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाने काही बारीकसारीक बदल करण्याचे प्रयोग करून पाहिले होते; परंतु मोठा बदल करण्याचे धाडस दाखविले नव्हते. पहिल्यांदाच मोठा निर्णय घेताना शहरातील ९० टक्के रस्ते हे एकेरी (वन वे) करण्याचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. अगदीच किरकोळ रहदारीचे आणि रुंदी अधिक असलेल्या एक-दोन रस्त्यांवरून दोन्ही बाजूने वाहतूक चालू ठेवण्यात आली. १ सप्टेंबरपासून नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू केली. सुरुवातीला गोंधळ झाला. शॉर्टकट्स रोखल्यामुळे काही प्रमाणात पोलिसांबरोबर अरेरावीची भाषाही झाली; पण एक-दोन दिवसांनंतर नवीन रचना सोयीची वाटू लागली. विविध क्षेत्रांतील पणजीतील लोकांशी संवाद साधला असता सकारात्मक प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत. वाहतूक विभागाच्या वेबसाईटवर व एसएमएसद्वारे मिळालेला प्रतिसाद हा अत्यंत सकारात्मक होता, अशी माहिती वाहतूक विभागाचे उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी दिली. याविषयी प्रतिक्रिया देताना व्यवसायाने वैद्यकीय प्रतिनिधी असलेले देवदत्त पागी यांनी सांगितले की, नवीन रचना जरा अडखळल्यासारखी वाटली. शॉर्टकट्स रोखल्यामुळे हिरमोडही झाला; परंतु आता नवीन व्यवस्थेशी ताळमेळ जुळू लागला आहे. वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार फारच कमी होऊन वाहतूक सुरळीत झाली आहे. एक महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर नवीन रचना जरी असली तरी ती कायम ठेवावी, असे ते म्हणाले. अशाच प्रतिक्रिया आणखी चार जणांनी दिल्या.