शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

‘कालचा गोंधळ बरा नव्हता’

By admin | Updated: September 14, 2015 02:01 IST

दोन आठवड्यांपूर्वी अगदीच अनिर्बंध असलेली पणजी शहरातील वाहतूक काही नियमांची वळणे घालून ‘वन वे’ करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घे

दोन आठवड्यांपूर्वी अगदीच अनिर्बंध असलेली पणजी शहरातील वाहतूक काही नियमांची वळणे घालून ‘वन वे’ करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आणि अंमलबजावणीही केली. पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून वळणे रोखली किंवा सक्तीची वळणे घेण्यास भाग पाडले तेव्हा सुरुवातीला अनेकांनी नाके मुरडली; परंतु दोन आठवड्यांनंतरचा अनुभव मात्र नवीन व्यवस्था ही योग्य आणि सुखकर असल्याचा निष्कर्ष काढत आहे. कालपर्यंत चाललेला गोंधळ हा योग्य नव्हता, हेच आता स्पष्ट होत आहे. पणजीत नेहमीच होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाने काही बारीकसारीक बदल करण्याचे प्रयोग करून पाहिले होते; परंतु मोठा बदल करण्याचे धाडस दाखविले नव्हते. पहिल्यांदाच मोठा निर्णय घेताना शहरातील ९० टक्के रस्ते हे एकेरी (वन वे) करण्याचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. अगदीच किरकोळ रहदारीचे आणि रुंदी अधिक असलेल्या एक-दोन रस्त्यांवरून दोन्ही बाजूने वाहतूक चालू ठेवण्यात आली. १ सप्टेंबरपासून नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू केली. सुरुवातीला गोंधळ झाला. शॉर्टकट्स रोखल्यामुळे काही प्रमाणात पोलिसांबरोबर अरेरावीची भाषाही झाली; पण एक-दोन दिवसांनंतर नवीन रचना सोयीची वाटू लागली. विविध क्षेत्रांतील पणजीतील लोकांशी संवाद साधला असता सकारात्मक प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत. वाहतूक विभागाच्या वेबसाईटवर व एसएमएसद्वारे मिळालेला प्रतिसाद हा अत्यंत सकारात्मक होता, अशी माहिती वाहतूक विभागाचे उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी दिली. याविषयी प्रतिक्रिया देताना व्यवसायाने वैद्यकीय प्रतिनिधी असलेले देवदत्त पागी यांनी सांगितले की, नवीन रचना जरा अडखळल्यासारखी वाटली. शॉर्टकट्स रोखल्यामुळे हिरमोडही झाला; परंतु आता नवीन व्यवस्थेशी ताळमेळ जुळू लागला आहे. वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार फारच कमी होऊन वाहतूक सुरळीत झाली आहे. एक महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर नवीन रचना जरी असली तरी ती कायम ठेवावी, असे ते म्हणाले. अशाच प्रतिक्रिया आणखी चार जणांनी दिल्या.