शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

‘कालचा गोंधळ बरा नव्हता’

By admin | Updated: September 14, 2015 02:01 IST

दोन आठवड्यांपूर्वी अगदीच अनिर्बंध असलेली पणजी शहरातील वाहतूक काही नियमांची वळणे घालून ‘वन वे’ करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घे

दोन आठवड्यांपूर्वी अगदीच अनिर्बंध असलेली पणजी शहरातील वाहतूक काही नियमांची वळणे घालून ‘वन वे’ करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आणि अंमलबजावणीही केली. पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून वळणे रोखली किंवा सक्तीची वळणे घेण्यास भाग पाडले तेव्हा सुरुवातीला अनेकांनी नाके मुरडली; परंतु दोन आठवड्यांनंतरचा अनुभव मात्र नवीन व्यवस्था ही योग्य आणि सुखकर असल्याचा निष्कर्ष काढत आहे. कालपर्यंत चाललेला गोंधळ हा योग्य नव्हता, हेच आता स्पष्ट होत आहे. पणजीत नेहमीच होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाने काही बारीकसारीक बदल करण्याचे प्रयोग करून पाहिले होते; परंतु मोठा बदल करण्याचे धाडस दाखविले नव्हते. पहिल्यांदाच मोठा निर्णय घेताना शहरातील ९० टक्के रस्ते हे एकेरी (वन वे) करण्याचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. अगदीच किरकोळ रहदारीचे आणि रुंदी अधिक असलेल्या एक-दोन रस्त्यांवरून दोन्ही बाजूने वाहतूक चालू ठेवण्यात आली. १ सप्टेंबरपासून नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू केली. सुरुवातीला गोंधळ झाला. शॉर्टकट्स रोखल्यामुळे काही प्रमाणात पोलिसांबरोबर अरेरावीची भाषाही झाली; पण एक-दोन दिवसांनंतर नवीन रचना सोयीची वाटू लागली. विविध क्षेत्रांतील पणजीतील लोकांशी संवाद साधला असता सकारात्मक प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत. वाहतूक विभागाच्या वेबसाईटवर व एसएमएसद्वारे मिळालेला प्रतिसाद हा अत्यंत सकारात्मक होता, अशी माहिती वाहतूक विभागाचे उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी दिली. याविषयी प्रतिक्रिया देताना व्यवसायाने वैद्यकीय प्रतिनिधी असलेले देवदत्त पागी यांनी सांगितले की, नवीन रचना जरा अडखळल्यासारखी वाटली. शॉर्टकट्स रोखल्यामुळे हिरमोडही झाला; परंतु आता नवीन व्यवस्थेशी ताळमेळ जुळू लागला आहे. वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार फारच कमी होऊन वाहतूक सुरळीत झाली आहे. एक महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर नवीन रचना जरी असली तरी ती कायम ठेवावी, असे ते म्हणाले. अशाच प्रतिक्रिया आणखी चार जणांनी दिल्या.