शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

लेखकांची भूमिका योग्य

By admin | Updated: October 18, 2015 02:42 IST

पणजी : सांस्कृतिक लोकशाही सिद्ध झाल्याशिवाय राजकीय लोकशाहीला अर्थ उरणार नाही. सांस्कृतिक दहशतवादाविरुद्ध देशातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त

पणजी : सांस्कृतिक लोकशाही सिद्ध झाल्याशिवाय राजकीय लोकशाहीला अर्थ उरणार नाही. सांस्कृतिक दहशतवादाविरुद्ध देशातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांनी घेतलेली भूमिका योग्य आहे, असे मनोगत ज्येष्ठ लेखक प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. सबनीस यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गोव्यात ५० मतदार आहेत. त्यांना संपर्क करण्याच्यादृष्टीने सबनीस गोवा भेटीवर आले आहेत. येथील गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात सबनीस यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. स्व. नरेंद्र दाभोलकर स्व. गोविंद पानसरे, स्व. कलबुर्गी, दादरी हत्याकांड अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना सबनीस म्हणाले, की सध्याची स्थिती चिंताजनक आहे. विचारवंतांच्या हत्या होत आहेत. हिंदू धर्मवादाचा उन्माद सर्वांवर थोपविण्याचा प्रयत्न होत आहे. अशावेळी देशातील विचारवंत व साहित्यिकांनी दंड थोपटले व साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करत सरकारचा निषेध केला तर ती त्यांची चूक आहे असे मुळीच म्हणता येणार नाही. मात्र, पुरस्कार परत केल्यानंतर विषय संपला असे होत नाही. सध्याच्या स्थितीवर उपाय काढण्यासाठी साहित्यिकांनी संवाद करायला हवा, रस्त्यावर उतरायला हवे. सबनीस म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवादासाठी योग्य नेते आहेत, असे मला वाटते. गोध्रा हत्याकांडामुळे कलंकित झालेले मोदी पंतप्रधान बनल्यानंतर जगात फिरताना बुद्ध व गांधींचे तत्त्वज्ञान मान्य करतात हे आम्ही लक्षात घ्यायला हवे. म्हणून मला वाटते की मोदी यांचे हिंदुत्व हे संघाच्या भागवतांच्या हिंदुत्वाची चौकट ओलांडून पुढे गेले आहे म्हणून त्यांच्याशी संवाद व्हायला हवा. मोदी कदाचित राजकीय तडजोड म्हणून बुद्ध व गांधींचा उल्लेख करत असतीलही; पण जगासमोर ते या महामानवांविषयी बोलतात हे महत्त्वाचे आहे. मी मोदींचा टीकाकारचआहे. (खास प्रतिनिधी)