शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

पावसाअभावी शेतकऱ्यांत चिंता

By admin | Updated: June 26, 2014 01:25 IST

हणखणे : पावसाच्या भरवशावर नांगरलेल्या जमिनीला पाण्याची आस आहे तर तिळारी कालव्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

हणखणे : पावसाच्या भरवशावर नांगरलेल्या जमिनीला पाण्याची आस आहे तर तिळारी कालव्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशात शेती करावी या चिंतेने हणखणे परिसरातील शेतकरी अस्वस्थ झाला आहे. पेरणीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील पाणी वाटप समित्यांनी अशा गंभीर वेळी तिळारी कालव्यातील पाणी कसे पुरविता येईल या बाबत तिळारी प्रकल्प अभियंत्यांना विचारणा करावयास हवी, अशी मागणी होत आहे. पेडणे तालुक्यातील युवक शेतीकडे वळू लागल्याचे समाधानकारक चित्र असताना यंदाचा पावसाळ्याचा पहिला महिना तर कोरडाच गेल्याने चिंतेत भरच पडली आहे. पावसाळा वेळीच सुरू झाला असता तर आता तरवा वाढून आला असता. एव्हाना लावणी सुरू झाली असती; परंतु पावसाअभावी गणिते चुकत चालली आहेत. शिवाय तिळारीतूनही पाणी सोडले जात नसल्याने कालव्यांत ही ठणठणाट आहे. गावागावांत स्थापन केलेल्या पाणी वाटप समित्या कालव्यात पाणी का नाही याबाबत मौन बाळगून असल्याचा आरोप होत आहे. अधीक्षक अभियंता एम. के. प्रसाद, शेतकी खात्याचे अधिकारी प्रसाद परब यांनीही पावसाळा सुमारे एक महिना लांबणीवर पडल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. पेरणी प्रक्रियेस उशीर होत गेल्यास ऐन भरात असताना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती खुटवळ येथील शेतकरी अशोक सावंत यांनी व्यक्त केली आहे. तरव्यासाठी घातलेला भातही खराब होण्याच्या मार्गावर आहे. शेतात चिखल झाल्याशिवाय तरवा लावताच येत नाही. मात्र, त्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, गत काही वर्षांत वन्यजीवांच्या त्रासाने शेतकरी पुरता हैराण झालेला असताना चालू वर्षी पावसाळा लांबल्याने चिंतेत भरच पडत चालली आहे. भोळा बळीराजा मात्र पावसासाठी देवाला साकडे घालत आहे. (प्रतिनिधी)