शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
4
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
5
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
6
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
7
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
8
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
9
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
10
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
11
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
12
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
13
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
14
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
15
Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
16
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
17
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
18
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
19
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
20
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा

पावसाअभावी शेतकऱ्यांत चिंता

By admin | Updated: June 26, 2014 01:25 IST

हणखणे : पावसाच्या भरवशावर नांगरलेल्या जमिनीला पाण्याची आस आहे तर तिळारी कालव्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

हणखणे : पावसाच्या भरवशावर नांगरलेल्या जमिनीला पाण्याची आस आहे तर तिळारी कालव्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशात शेती करावी या चिंतेने हणखणे परिसरातील शेतकरी अस्वस्थ झाला आहे. पेरणीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील पाणी वाटप समित्यांनी अशा गंभीर वेळी तिळारी कालव्यातील पाणी कसे पुरविता येईल या बाबत तिळारी प्रकल्प अभियंत्यांना विचारणा करावयास हवी, अशी मागणी होत आहे. पेडणे तालुक्यातील युवक शेतीकडे वळू लागल्याचे समाधानकारक चित्र असताना यंदाचा पावसाळ्याचा पहिला महिना तर कोरडाच गेल्याने चिंतेत भरच पडली आहे. पावसाळा वेळीच सुरू झाला असता तर आता तरवा वाढून आला असता. एव्हाना लावणी सुरू झाली असती; परंतु पावसाअभावी गणिते चुकत चालली आहेत. शिवाय तिळारीतूनही पाणी सोडले जात नसल्याने कालव्यांत ही ठणठणाट आहे. गावागावांत स्थापन केलेल्या पाणी वाटप समित्या कालव्यात पाणी का नाही याबाबत मौन बाळगून असल्याचा आरोप होत आहे. अधीक्षक अभियंता एम. के. प्रसाद, शेतकी खात्याचे अधिकारी प्रसाद परब यांनीही पावसाळा सुमारे एक महिना लांबणीवर पडल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. पेरणी प्रक्रियेस उशीर होत गेल्यास ऐन भरात असताना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती खुटवळ येथील शेतकरी अशोक सावंत यांनी व्यक्त केली आहे. तरव्यासाठी घातलेला भातही खराब होण्याच्या मार्गावर आहे. शेतात चिखल झाल्याशिवाय तरवा लावताच येत नाही. मात्र, त्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, गत काही वर्षांत वन्यजीवांच्या त्रासाने शेतकरी पुरता हैराण झालेला असताना चालू वर्षी पावसाळा लांबल्याने चिंतेत भरच पडत चालली आहे. भोळा बळीराजा मात्र पावसासाठी देवाला साकडे घालत आहे. (प्रतिनिधी)