शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मध्यान्ह आहाराचे काम स्वयंसहाय्य गटांकडेच : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 19:05 IST

मध्यान्ह आहार योजनेचे काम अक्षय पात्रकडे सोपविले जाणार नाही. ते काम राज्यातील महिलांकडे म्हणजेच स्वयंसहाय्य गटांकडेच असेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभेत स्पष्ट केले.

पणजी : मध्यान्ह आहार योजनेचे काम अक्षय पात्रकडे सोपविले जाणार नाही. ते काम राज्यातील महिलांकडे म्हणजेच स्वयंसहाय्य गटांकडेच असेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभेत स्पष्ट केले. तसेच ज्या स्वयंसहाय्य गटांची तीन महिन्यांची बिले सरकारकडे प्रलंबित उरली आहेत, ती बिले येत्या आठ दिवसांत फेडली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.प्रश्नोत्तराच्या तासावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मध्यान्ह आहार योजनेविषयीचा मूळ प्रश्न मांडला होता. राज्यातील गरीब महिलांकडून विद्याथ्र्याना मध्यान्ह आहार पुरविला जातो. स्वयंसहाय्य गटांना काही फार मोठा फायदा मिळत नाही. त्यांच्याकडून दुकानातून उधारीवर सामान आणले जाते. त्याना बिले सरकारने वेळेत दिली तरच स्वयंसहाय्य गट दुकानदारांना पैसे देऊ शकतात, असा मुद्दा कामत यांनी मांडला. अनेक महिने सरकार बिलेच फेडत नसल्याने अडचण होते असे कामत म्हणाले. एखाद्या स्वयंसहाय्य गटातील एक-दोन सदस्यांनी बँक खात्याविषयी तक्रार केली म्हणून त्या गटाचे बिल अडवून ठेवू नका, असाही सल्ला कामत यांनी दिला.सरकार अक्षय पात्रला मध्यान्ह आहाराचे काम देऊ पाहत आहे काय अशी विचारणा आमदार विजय सरदेसाई यांनी केली. अक्षय पात्रशी पूर्वी काररही झालेला आहे, असे ते म्हणाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित उत्तर दिले. करार जर झालेला असेल तर तो आपण रद्द करून घेईन. गोव्यातील स्वयंसहाय्य गट आता चांगल्या प्रकारे मध्यान्ह आहार पुरवितात. आहाराचा दर्जाही सुधारला आहे. हे काम गोव्यातील महिलांकडेच राहिल. एकूण 112 स्वयंसहाय्य गट या कामात गुंतलेले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विविध कारणास्तव काही स्वयंसहाय्य गटांना तीन महिन्यांची बिले मिळाली नाहीत पण आता ती लवकरच फेडली जातील,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तीन तरी स्वयंसहाय्य गटांतील काही सदस्यांची बँक खात्यांविषयी तक्रार होती. तुम्ही त्या खात्यात पैसे जमा करू नका असे आम्हाला सदस्यांनी सांगितले होते. आम्ही त्यांना बोलावून घेऊन तोडगा काढण्याचाही प्रयत्न केला आहे. अंतर्गत वादामुळे त्यांचे बिल अडले होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अनेक स्वयंसहाय्य गटांशी गेल्या जून-जुलैमध्ये जो करार व्हायला हवा होता, तोही वेळेत न झाल्याने बिले अडली होती असेही सावंत यांनी नमूद केले.1 लाख 61 हजार मुलांना आहारदरम्यान, किती विद्याथ्र्याना रोज सरकारकडून मध्यान्ह आहार पुरविला जातो अशी विचारणा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी केली होती. पाचवी ते आठवीर्पयतच्या एकूण 1 लाख 61 हजार 693 मुलांकडून मध्यान्ह आहाराचा लाभ घेतला जातो. त्यात सरकारी व अनुदानित अशा सर्वच विद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत