शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बीडीओंच्या हस्तक्षेपाने ७२ जणांच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण

By किशोर कुबल | Updated: October 12, 2023 14:21 IST

ती सर्वसामान्य जनतेच्या पथ्यावर पडली आहे.

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: बीडीओंनी वेगवेगळ्या ७१ प्रकरणांमध्ये अर्जदारांना बांधकाम परवाने मिळवून देत त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले. पंचायतीने 30 दिवसांच्या आत बांधकाम परवाना न दिल्यास सचिवाने सदर अर्ज गटविकास अधिकाऱ्यांकडे (बीडीओ) पाठविण्याची तरतूद कायदा दुरुस्ती अन्वये केली होती. ती सर्वसामान्य जनतेच्या पथ्यावर पडली आहे.

अनेक पंचायती बांधकाम परवान्यांसाठी लोकांची सतावणूक करीत असल्याच्या वाढत्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने ऑक्टोबर २०२१ मध्ये गोवा पंचायती राज कायद्यात (१९९४) दुरुस्ती आणली. बांधकाम परवान्यासाठी एखाद्याने ग्रामपंचायतीकडे अर्ज केला आणि पंचायतीने ३० दिवसांच्या आत तो न दिल्यास पंचायत सचिवाने तो बीडीओंकडे पाठवावा व बीडीओनीही पुढील ३० दिवसांत निर्णय न घेतल्यास परवाना दिल्याचे गृहित धरून अर्जदारास बांधकाम करण्यास मोकळीक देण्यात यावी, अशी ही महत्त्वपूर्ण तरतूद होती.

ग्रामपंचायतींचे पंच सदस्य, सरपंच, उपसरपंच अनेकवेळा बांधकाम परवाने देण्यासाठी अडवणूक करीत असत. काही पंचायतींमध्ये परवान्यांसाठी मोठया रकमेची लाचही मागितली जात असे. लाच न दिल्यास परवाना नाही व अपील करायचे झाल्यास पंचायत उपसंचालकांकडे करावे लागत असे. तेथे वकील वगैरे देणे खर्चिक, तसेच वेळकाढू काम असायचे. अनेकदा वर्षानुवर्षे खटला चालत असे व यामुळे घरांची बांधकामे रखडत असत व सर्वसामान्य जनतेला हा खर्चही परवडत नसे. बीडीओच्या हस्तक्षेपाने आता लोकांना परवाने मिळू लागल्याने पंचायती वठणीवर आल्या आहेत.

लवकरच आणखी बीडीओ

काही तालुक्यांमध्ये गटविकास अधिकाऱ्यांची कमतरता आहे. एकेकाकडे अतिरिक्त ताबाही आहे. प्राप्त माहितीनुसार बार्देश, सासष्टी व फोडा हे तालुके मोठे असल्याने तेथे प्रत्येकी दोन बीडीओ आवश्यक असूनही ते उपलब्ध नव्हते. याबाबत उपसंचालकांना विचारले असता ते म्हणाले की, नवीन बीडीओची भरती झालेली असून सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच ते ताब घेतील.

१८ प्रकरणांमध्ये सुनावण्या

सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी वरील तरतूद केल्यानंतर गेल्या दोन वर्षातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी 'लोकमत'ने पंचायत उपसंचालक कृष्णकांत पांगम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पंचायतीने ३० दिवसांत बांधकाम परवाने न दिल्याने गेल्या दोन वर्षात ८८ प्रकरणे बीडीओंकडे आली. पैकी ७१ प्रकरणांमध्ये बीडीओनी हस्तक्षेप करुन अर्जदारांना परवाने मिळवून दिले, तर १८. प्रकरणांमध्ये बीडीओकडे सुनावण्या सुरु आहेत.

 

टॅग्स :goaगोवा