शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओंच्या हस्तक्षेपाने ७२ जणांच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण

By किशोर कुबल | Updated: October 12, 2023 14:21 IST

ती सर्वसामान्य जनतेच्या पथ्यावर पडली आहे.

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: बीडीओंनी वेगवेगळ्या ७१ प्रकरणांमध्ये अर्जदारांना बांधकाम परवाने मिळवून देत त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले. पंचायतीने 30 दिवसांच्या आत बांधकाम परवाना न दिल्यास सचिवाने सदर अर्ज गटविकास अधिकाऱ्यांकडे (बीडीओ) पाठविण्याची तरतूद कायदा दुरुस्ती अन्वये केली होती. ती सर्वसामान्य जनतेच्या पथ्यावर पडली आहे.

अनेक पंचायती बांधकाम परवान्यांसाठी लोकांची सतावणूक करीत असल्याच्या वाढत्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने ऑक्टोबर २०२१ मध्ये गोवा पंचायती राज कायद्यात (१९९४) दुरुस्ती आणली. बांधकाम परवान्यासाठी एखाद्याने ग्रामपंचायतीकडे अर्ज केला आणि पंचायतीने ३० दिवसांच्या आत तो न दिल्यास पंचायत सचिवाने तो बीडीओंकडे पाठवावा व बीडीओनीही पुढील ३० दिवसांत निर्णय न घेतल्यास परवाना दिल्याचे गृहित धरून अर्जदारास बांधकाम करण्यास मोकळीक देण्यात यावी, अशी ही महत्त्वपूर्ण तरतूद होती.

ग्रामपंचायतींचे पंच सदस्य, सरपंच, उपसरपंच अनेकवेळा बांधकाम परवाने देण्यासाठी अडवणूक करीत असत. काही पंचायतींमध्ये परवान्यांसाठी मोठया रकमेची लाचही मागितली जात असे. लाच न दिल्यास परवाना नाही व अपील करायचे झाल्यास पंचायत उपसंचालकांकडे करावे लागत असे. तेथे वकील वगैरे देणे खर्चिक, तसेच वेळकाढू काम असायचे. अनेकदा वर्षानुवर्षे खटला चालत असे व यामुळे घरांची बांधकामे रखडत असत व सर्वसामान्य जनतेला हा खर्चही परवडत नसे. बीडीओच्या हस्तक्षेपाने आता लोकांना परवाने मिळू लागल्याने पंचायती वठणीवर आल्या आहेत.

लवकरच आणखी बीडीओ

काही तालुक्यांमध्ये गटविकास अधिकाऱ्यांची कमतरता आहे. एकेकाकडे अतिरिक्त ताबाही आहे. प्राप्त माहितीनुसार बार्देश, सासष्टी व फोडा हे तालुके मोठे असल्याने तेथे प्रत्येकी दोन बीडीओ आवश्यक असूनही ते उपलब्ध नव्हते. याबाबत उपसंचालकांना विचारले असता ते म्हणाले की, नवीन बीडीओची भरती झालेली असून सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच ते ताब घेतील.

१८ प्रकरणांमध्ये सुनावण्या

सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी वरील तरतूद केल्यानंतर गेल्या दोन वर्षातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी 'लोकमत'ने पंचायत उपसंचालक कृष्णकांत पांगम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पंचायतीने ३० दिवसांत बांधकाम परवाने न दिल्याने गेल्या दोन वर्षात ८८ प्रकरणे बीडीओंकडे आली. पैकी ७१ प्रकरणांमध्ये बीडीओनी हस्तक्षेप करुन अर्जदारांना परवाने मिळवून दिले, तर १८. प्रकरणांमध्ये बीडीओकडे सुनावण्या सुरु आहेत.

 

टॅग्स :goaगोवा