शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओंच्या हस्तक्षेपाने ७२ जणांच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण

By किशोर कुबल | Updated: October 12, 2023 14:21 IST

ती सर्वसामान्य जनतेच्या पथ्यावर पडली आहे.

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: बीडीओंनी वेगवेगळ्या ७१ प्रकरणांमध्ये अर्जदारांना बांधकाम परवाने मिळवून देत त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले. पंचायतीने 30 दिवसांच्या आत बांधकाम परवाना न दिल्यास सचिवाने सदर अर्ज गटविकास अधिकाऱ्यांकडे (बीडीओ) पाठविण्याची तरतूद कायदा दुरुस्ती अन्वये केली होती. ती सर्वसामान्य जनतेच्या पथ्यावर पडली आहे.

अनेक पंचायती बांधकाम परवान्यांसाठी लोकांची सतावणूक करीत असल्याच्या वाढत्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने ऑक्टोबर २०२१ मध्ये गोवा पंचायती राज कायद्यात (१९९४) दुरुस्ती आणली. बांधकाम परवान्यासाठी एखाद्याने ग्रामपंचायतीकडे अर्ज केला आणि पंचायतीने ३० दिवसांच्या आत तो न दिल्यास पंचायत सचिवाने तो बीडीओंकडे पाठवावा व बीडीओनीही पुढील ३० दिवसांत निर्णय न घेतल्यास परवाना दिल्याचे गृहित धरून अर्जदारास बांधकाम करण्यास मोकळीक देण्यात यावी, अशी ही महत्त्वपूर्ण तरतूद होती.

ग्रामपंचायतींचे पंच सदस्य, सरपंच, उपसरपंच अनेकवेळा बांधकाम परवाने देण्यासाठी अडवणूक करीत असत. काही पंचायतींमध्ये परवान्यांसाठी मोठया रकमेची लाचही मागितली जात असे. लाच न दिल्यास परवाना नाही व अपील करायचे झाल्यास पंचायत उपसंचालकांकडे करावे लागत असे. तेथे वकील वगैरे देणे खर्चिक, तसेच वेळकाढू काम असायचे. अनेकदा वर्षानुवर्षे खटला चालत असे व यामुळे घरांची बांधकामे रखडत असत व सर्वसामान्य जनतेला हा खर्चही परवडत नसे. बीडीओच्या हस्तक्षेपाने आता लोकांना परवाने मिळू लागल्याने पंचायती वठणीवर आल्या आहेत.

लवकरच आणखी बीडीओ

काही तालुक्यांमध्ये गटविकास अधिकाऱ्यांची कमतरता आहे. एकेकाकडे अतिरिक्त ताबाही आहे. प्राप्त माहितीनुसार बार्देश, सासष्टी व फोडा हे तालुके मोठे असल्याने तेथे प्रत्येकी दोन बीडीओ आवश्यक असूनही ते उपलब्ध नव्हते. याबाबत उपसंचालकांना विचारले असता ते म्हणाले की, नवीन बीडीओची भरती झालेली असून सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच ते ताब घेतील.

१८ प्रकरणांमध्ये सुनावण्या

सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी वरील तरतूद केल्यानंतर गेल्या दोन वर्षातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी 'लोकमत'ने पंचायत उपसंचालक कृष्णकांत पांगम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पंचायतीने ३० दिवसांत बांधकाम परवाने न दिल्याने गेल्या दोन वर्षात ८८ प्रकरणे बीडीओंकडे आली. पैकी ७१ प्रकरणांमध्ये बीडीओनी हस्तक्षेप करुन अर्जदारांना परवाने मिळवून दिले, तर १८. प्रकरणांमध्ये बीडीओकडे सुनावण्या सुरु आहेत.

 

टॅग्स :goaगोवा