शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

'तिळारी'ची उंची वाढवण्याआधी अभ्यास करणार; म्हादई प्रश्नी आम्ही गोव्याबरोबरच - मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: June 17, 2023 16:37 IST

धरणग्रस्त २२ कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३३० कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली.

पणजी : तिळारी धरणाची उंची वाढवण्याआधी अभ्यास करणार तसेच म्हादई प्रश्नी आम्ही गोव्याबरोबरच आहोत व एकत्रपणे लढू, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. धरणग्रस्त २२ कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३३० कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली.

'तिळारी' नियंत्रण मंडळाची आज तब्बल दहा वर्षांनी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर तसेच वरिष्ठ उपस्थित होते. निकृष्ट बांधकामामुळे वरचेवर फुटणारे कालवे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन तसेच तिळारीविषयी अन्य महत्वाचे विषय बैठकीत चर्चेला आले. 

'गोवा- महाराष्ट्र भाऊ-भाऊ'

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तिळारीच्या बाबतीत सर्व प्रश्नांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा आणि निर्णयही झालेले आहेत. गोवा आणि महाराष्ट्र भाऊ-भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही तंटे नाहीत. आजची बैठक अतिशय सकारात्मक  झाली. म्हादईच्या बाबतीतही आम्ही गोव्या बरोबरच आहोत.

शिंदे म्हणाले की, तिळारी धरणात भरपूर पाणी आहे. परंतु ते वाया जात आहेत. कालव्यांची दुरुस्ती प्राधान्यक्रमे हाती घेतली जाईल. त्यासाठी उभय राज्यांच्या जलसंपदा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच होईल. युद्धपातळीवर कालवे दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. तिळारी धरणग्रस्तांच्या नुकसान भरपाईचाही प्रश्न होता तोही निकालात काढण्यात आलेला आहे.'

तिळारी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'याबाबतीत सखोल अभ्यास करण्याचा आदेश मी दिलेला आहे. अभ्यासांतीच योग्य तो निर्णय घेतला जाईल.'

२२ कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, तिळारी धरणग्रस्त २२ कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय बैठकीत झालेला आहे.  तिळारीच्या कालव्यांची दुरुस्ती हा प्रमुख विषय होता. ३० दिवसांच्या कालावधीत कालवे दुरुस्त करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दाखवली आहे. तिळारी धरण पेडणे, बार्देस व डिचोली तालुक्यांना तसेच खास करून मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला पिण्याचे पाणी पुरवते. त्यामुळे हे धरण गोव्यासाठी फार महत्त्वाचे आहे.'

सावंत पुढे म्हणाले की, तिळारीची उंची वाढविण्याचा प्रश्नही चर्चेला आला. महाराष्ट्र सरकारने सखोल अभ्यास करूनच यावर निर्णय घेण्याची ग्वाही दिलेली आहे. बैठकीचे आयोजन करण्यासाठी गोव्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :goaगोवाEknath Shindeएकनाथ शिंदेPramod Sawantप्रमोद सावंत