शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

विर्डीच्या पाण्याचा थेंबही देणार नाही!

By admin | Updated: May 6, 2015 02:26 IST

पणजी : गोवा-महाराष्ट्राच्या सीमेवरील विर्डी नदीतील पाण्यावर गोव्याचा हक्कच नाही. आम्ही गोव्याला पाण्याचा थेंबही देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे.

पणजी : गोवा-महाराष्ट्राच्या सीमेवरील विर्डी नदीतील पाण्यावर गोव्याचा हक्कच नाही. आम्ही गोव्याला पाण्याचा थेंबही देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे.महाराष्ट्रातर्फे मंगळवारी म्हादई पाणी तंटा लवादासमोर युक्तिवाद पूर्ण करण्यात आले. विर्डी नदीवर आठ धरणे बांधण्याची महाराष्ट्र सरकारची योजना असून ती बंद करावी, अशी गोवा सरकारची मागणी आहे. तथापि, विर्र्डी नदीवर आपण २००६ सालापासून काम करत असून त्या कामास २०१२ सालापर्यंत गोवा सरकारने कधीच आक्षेप घेतला नाही, असा मुद्दा महाराष्ट्राने मंगळवारी लवादासमोर मांडला. या पूर्वी एका माजी मुख्यमंत्र्याने विर्डी धरण प्रकल्पासाठी ना हरकत दाखलाही दिला असल्याचे महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी लवादासमोर सांगितले. गोव्याने प्रथमच २०१२ साली विर्डी प्रकल्पास आक्षेप घेतला. गोव्याला आता विर्डीच्या पाण्यावर हक्क सांगता येणार नाही. गोव्याला एक थेंबही पाणी मिळणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्राने घेतल्याने गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी हे महाराष्ट्राच्या युक्तिवादांना बुधवारी उत्तर देणार आहेत. आपले पुरवणी युक्तिवाद गोवा सरकार बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू करील. महाराष्ट्र सरकारचे मुद्दे खोडून काढण्याची तयारी गोवा सरकारने केली आहे.गेल्या आठवड्यात अ‍ॅडव्होकेट जनरल नाडकर्णी यांनी गोव्याच्या वतीने आपले मुद्दे मांडले आहेत. विर्डी धरणाची योजना सुमारे दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची आहे. केंद्र सरकारने किंवा नियोजन आयोगानेही या योजनेला मान्यता दिलेली नाही. केंद्राने त्यास पर्यावरणविषयक दाखलाही दिलेला नाही. त्यामुळे ते काम बेकायदा ठरते, असे गोवा सरकारचे म्हणणे आहे. विर्र्डीचे पाणी महाराष्ट्राने वळविले, तर गोव्यातील साखळी भागातून वाहणाऱ्या वाळवंटी नदीवरील पाणीपुरवठा प्रकल्प अडचणीत येतील, असाही मुद्दा यापूर्वी गोवा सरकारने लवादासमोर मांडला आहे. (खास प्रतिनिधी)