शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विर्डीच्या पाण्याचा थेंबही देणार नाही!

By admin | Updated: May 6, 2015 02:26 IST

पणजी : गोवा-महाराष्ट्राच्या सीमेवरील विर्डी नदीतील पाण्यावर गोव्याचा हक्कच नाही. आम्ही गोव्याला पाण्याचा थेंबही देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे.

पणजी : गोवा-महाराष्ट्राच्या सीमेवरील विर्डी नदीतील पाण्यावर गोव्याचा हक्कच नाही. आम्ही गोव्याला पाण्याचा थेंबही देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे.महाराष्ट्रातर्फे मंगळवारी म्हादई पाणी तंटा लवादासमोर युक्तिवाद पूर्ण करण्यात आले. विर्डी नदीवर आठ धरणे बांधण्याची महाराष्ट्र सरकारची योजना असून ती बंद करावी, अशी गोवा सरकारची मागणी आहे. तथापि, विर्र्डी नदीवर आपण २००६ सालापासून काम करत असून त्या कामास २०१२ सालापर्यंत गोवा सरकारने कधीच आक्षेप घेतला नाही, असा मुद्दा महाराष्ट्राने मंगळवारी लवादासमोर मांडला. या पूर्वी एका माजी मुख्यमंत्र्याने विर्डी धरण प्रकल्पासाठी ना हरकत दाखलाही दिला असल्याचे महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी लवादासमोर सांगितले. गोव्याने प्रथमच २०१२ साली विर्डी प्रकल्पास आक्षेप घेतला. गोव्याला आता विर्डीच्या पाण्यावर हक्क सांगता येणार नाही. गोव्याला एक थेंबही पाणी मिळणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्राने घेतल्याने गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी हे महाराष्ट्राच्या युक्तिवादांना बुधवारी उत्तर देणार आहेत. आपले पुरवणी युक्तिवाद गोवा सरकार बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू करील. महाराष्ट्र सरकारचे मुद्दे खोडून काढण्याची तयारी गोवा सरकारने केली आहे.गेल्या आठवड्यात अ‍ॅडव्होकेट जनरल नाडकर्णी यांनी गोव्याच्या वतीने आपले मुद्दे मांडले आहेत. विर्डी धरणाची योजना सुमारे दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची आहे. केंद्र सरकारने किंवा नियोजन आयोगानेही या योजनेला मान्यता दिलेली नाही. केंद्राने त्यास पर्यावरणविषयक दाखलाही दिलेला नाही. त्यामुळे ते काम बेकायदा ठरते, असे गोवा सरकारचे म्हणणे आहे. विर्र्डीचे पाणी महाराष्ट्राने वळविले, तर गोव्यातील साखळी भागातून वाहणाऱ्या वाळवंटी नदीवरील पाणीपुरवठा प्रकल्प अडचणीत येतील, असाही मुद्दा यापूर्वी गोवा सरकारने लवादासमोर मांडला आहे. (खास प्रतिनिधी)