शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

खाण धोरणासाठी पर्यावरणप्रेमींना विश्वासात घेणार की नाही?

By admin | Updated: May 5, 2014 19:34 IST

पणजी : खाण धोरण ठरविताना सरकार पर्यावरणप्रेमींनाही विश्वासात घेणार आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पणजी : खाण धोरण ठरविताना सरकार पर्यावरणप्रेमींनाही विश्वासात घेणार आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सवार्ेच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाणमालकांची बैठक घेतली; परंतु पर्यावरणप्रेमींशी विचार विनिमय करावासा वाटला नाही काय, असा सवाल ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी तथा बेकायदा खाणींच्या बाबतीत सवार्ेच्च न्यायालयापर्यंत धडक मारलेले गोवा फाउंडेशनचे क्लॉड आल्वारिस यांनी परवा पेडणे येथे सत्कारावेळी केला. खाणविरोधी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते रमेश गावस यांच्या मते सवार्ेच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर आता नव्याने खाण धोरण ठरविताना सरकारने प्रत्येक ग्रामसभेला, पंचायतीला विश्वासात घ्यावे लागेल. आधीच्या धोरण मसुद्यात काही बदल केले, तर ते लोकांसमोर यायला हवेत. खास करून ज्या गावामंध्ये खाणी आहेत तेथील लोकांना सरकार काय करायला निघाले आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. जाणकारांचीही मते घेतली पाहिजेत. पर्यावरणप्रेमी म्हणून आमच्याकडे काही माहिती मागितल्यास आम्ही ती निश्चितच देऊ. सवार्ेच्च न्यायालयाच्या निवाड्याशी सरकारचे धोरण सुसंगत असावे. सार्वजनिक सुनावण्या हव्यात : काकोडकर समाजकार्यकर्ते तथा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ राजेंद्र काकोडकर म्हणाले की, २८ सप्टेंबर २0१३ रोजी सरकारने खाण धोरणाचा मसुदा जाहीर केला होता. सात महिन्यांतच सवार्ेच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर तो स्थगित ठेवून सरकारला नव्या धोरणाचा विचार करावा लागत आहे. यावरून त्यावेळचे सरकारचे धोरण चुकीचे होते, हे स्पष्ट होते. न्यायालयाने खरे तर याबाबतीत सरकारला दणकाच दिलेला आहे. नव्याने धोरण ठरविताना सरकारने पर्यावरणप्रेमी, शेतकरी तसेच खाण अवलंबित ट्रकवाले, बार्जमालक, गावातील लोक या सर्वांनाच विश्वासात घ्यालया हवे. खरे तर याबाबतीत सार्वजनिक सुनावण्या झाल्या पाहिजेत. (प्रतिनिधी)