शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

राज्यातील 85 टक्के गुन्हे परप्रांतीय मजुरांमुळे, नवा कायदा करणार- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 19:24 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत घोषणा

पणजी : गोव्यात 80 ते 85 टक्के गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय म्हणजेच स्थलांतरित मजूर आढळून येतात. त्यांच्यामुळेच 85 टक्के गुन्हे घडतात. अनेक मजुर राहतात कुठे, काम काय करतात याची कोणतीच माहिती कुणाकडेच नसते. याविरुद्ध उपाययोजना म्हणून सरकार नवा कायदा अस्तित्वात आणेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले.दुपारी अडीच वाजता अधिवेशनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री उभे राहिले. मडगावला झालेल्या दोघांच्या खून प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी चोवीस तासांत लगेच आरोपींना अटक केल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. खून करणारा जर गोव्याबाहेर पळून गेला असता, तर कदाचित खुनाचा उलगडाही झाला नसता. तो गोव्यात राहिला म्हणून सापडला असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात अनेक घरांमध्ये परप्रांतीय मजुर भाडय़ाने राहतात. घर मालक त्याविषयी कोणतीही माहिती पोलिसांना देत नाही. दुहेरी खुनात जे सापडले आहेत, त्यांच्याकडे कसलेही ओळखपत्र नाही किंवा लेबर कार्ड नाही. त्यांची कुठेच नोंद नाही. अशा प्रकारचे स्थलांतरित मजूर गोव्यात खूप मोठ्या संख्येने आहेत. लोकांनी त्यांची माहिती पोलिस स्थानकांवर द्यावी. जर कुणी संशयास्पद आढळले तरी पोलिसांना सांगावे.यावेळी आमदार चर्चिल आलेमाव यांनी शंका उपस्थित केली, पोलिसांना लोकांनी माहिती देऊनही पोलीस धावून आले नाही तर काय करावे असे आलेमाव यांनी विचारले. शंभर क्रमांक डायल केला तरी, पोलीस मदतीसाठी येतात, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री म्हणाले, की घर मालकांनी भाडय़ाने राहणाऱ्या व्यक्तींची पोलिस स्थानकात माहिती देणो बंधनकारक आहे. तथापि, मजुरांविषयी एक कायदा लवकरच सरकार तयार करील. खून, चोऱ्या, बलात्कार अशा अनेक गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय मजुर आढळून येत आहेत. त्यामुळे मजूर तपासणीविषयीचा एक कायदा करावाच लागेल. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत