शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

राज्यात नगरपंचायती स्थापणार?

By admin | Updated: September 26, 2015 03:26 IST

म्हापसा : राज्य झपाट्याने शहरीकरणाच्या दिशेने कूच करत असल्याने ग्रामीण भागातील नागरी जीवन विस्तारू लागले आहे.

 म्हापसा : राज्य झपाट्याने शहरीकरणाच्या दिशेने कूच करत असल्याने ग्रामीण भागातील नागरी जीवन विस्तारू लागले आहे. याचा विचार करून राज्यातील काही पंचायतींना शहरी दर्जा मिळावा यासाठी नगरपंचायती स्थापन करण्यावर गंभीरपणे विचार करीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी ‘लोकमत’ला दिली. राज्याचे शहरीकरण झपाट्याने होत आहे. वाढत्या शहरीकरणाचा प्रभाव बऱ्याच पंचायतींवर, खास करून किनारी भागातील पंचायतींवर झाला आहे. काही पंचायतींनी आपला दर्जा वाढवण्याची मागणी करणारा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव सादर करताना पंचायतींनी पालिकेचा दर्जा नको असल्याचे स्पष्ट केले आहे. यात पर्वरीचे आमदार रोहन खंवटे तसेच ताळगाव पंचायतीचा समावेश आहे. ताळगाव पंचायतीने तेथील ग्रामसभेतही तसा निर्णय घेतला आहे. वाढत्या शहरीकरणाचा विचार करताना केलेली मागणी रास्त असल्याने आलेल्या या प्रस्तावावर सरकारने गंभीरपणे विचार करायला सुरुवात केली असल्याचे डिसोझा यांनी सांगितले. एका प्रश्नावर उत्तर देताना डिसोझा यांनी निवडणुकींना सामोरे जाणाऱ्या राज्यातील पालिकांच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त केले. नगरसेवक पालिका क्षेत्रातील विकासावर भर न देता फक्त स्वत:च्या प्रभागापुरते मर्यादित राहून काम करतात, त्याचा परिणाम पालिकेवर होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. विरोधाभास न ठेवता पालिकेच्या विकासावर भर दिल्यास पालिका क्षेत्राचा पूर्णपणे विकास होऊ शकतो. त्यासाठी नगरसेवकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून विकास आराखडा ठरवताना संपूर्ण पालिका क्षेत्राचा विचार होण्याची गरज आहे. तसेच तयार केलेल्या आराखड्याची तज्ज्ञांकडून पडताळणी करून पुढील कार्यवाही करावी. यातून स्मार्ट सिटीची संकल्पनाही साकारणे सहज शक्य होणार असल्याचे डिसोझा म्हणाले. पाच वर्षांसाठी १०० कोटींचे नियोजन केल्यास त्याचा फायदा पालिकेला होऊ शकतो. पालिकेच्या नियोजनाला मदत करण्यासाठी लोकांच्या देखरेख समित्या स्थापन करणे गरजेचे आहे. तसेच निवडून आलेल्या नव्या नगरसेवकांसाठी प्रशिक्षण आयोजित करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. बऱ्याच पालिकांजवळ स्वत:चा महसूल जमा करण्याची क्षमता आहे; पण इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळे ते सरकारवर पूर्णपणे अवलंबून राहतात. मडगाव तसेच मुरगाव पालिकेजवळ तशी क्षमता आहे; पण या पालिका योग्यप्रकारे काम करीत नसल्याचे दिसून आल्याचे ते म्हणाले. पालिकांत सुरू असलेल्या अस्थिर राजकारणावर त्यांना विचारले असता, पक्षपातळीवर या निवडणुका झाल्या असत्या तर अस्थिरता टाळणे शक्य होते; पण त्याला विरोध झाल्यानेच हा निर्णय रद्द करावा लागला, असे ते म्हणाले.