शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

राज्यात नगरपंचायती स्थापणार?

By admin | Updated: September 26, 2015 03:26 IST

म्हापसा : राज्य झपाट्याने शहरीकरणाच्या दिशेने कूच करत असल्याने ग्रामीण भागातील नागरी जीवन विस्तारू लागले आहे.

 म्हापसा : राज्य झपाट्याने शहरीकरणाच्या दिशेने कूच करत असल्याने ग्रामीण भागातील नागरी जीवन विस्तारू लागले आहे. याचा विचार करून राज्यातील काही पंचायतींना शहरी दर्जा मिळावा यासाठी नगरपंचायती स्थापन करण्यावर गंभीरपणे विचार करीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी ‘लोकमत’ला दिली. राज्याचे शहरीकरण झपाट्याने होत आहे. वाढत्या शहरीकरणाचा प्रभाव बऱ्याच पंचायतींवर, खास करून किनारी भागातील पंचायतींवर झाला आहे. काही पंचायतींनी आपला दर्जा वाढवण्याची मागणी करणारा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव सादर करताना पंचायतींनी पालिकेचा दर्जा नको असल्याचे स्पष्ट केले आहे. यात पर्वरीचे आमदार रोहन खंवटे तसेच ताळगाव पंचायतीचा समावेश आहे. ताळगाव पंचायतीने तेथील ग्रामसभेतही तसा निर्णय घेतला आहे. वाढत्या शहरीकरणाचा विचार करताना केलेली मागणी रास्त असल्याने आलेल्या या प्रस्तावावर सरकारने गंभीरपणे विचार करायला सुरुवात केली असल्याचे डिसोझा यांनी सांगितले. एका प्रश्नावर उत्तर देताना डिसोझा यांनी निवडणुकींना सामोरे जाणाऱ्या राज्यातील पालिकांच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त केले. नगरसेवक पालिका क्षेत्रातील विकासावर भर न देता फक्त स्वत:च्या प्रभागापुरते मर्यादित राहून काम करतात, त्याचा परिणाम पालिकेवर होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. विरोधाभास न ठेवता पालिकेच्या विकासावर भर दिल्यास पालिका क्षेत्राचा पूर्णपणे विकास होऊ शकतो. त्यासाठी नगरसेवकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून विकास आराखडा ठरवताना संपूर्ण पालिका क्षेत्राचा विचार होण्याची गरज आहे. तसेच तयार केलेल्या आराखड्याची तज्ज्ञांकडून पडताळणी करून पुढील कार्यवाही करावी. यातून स्मार्ट सिटीची संकल्पनाही साकारणे सहज शक्य होणार असल्याचे डिसोझा म्हणाले. पाच वर्षांसाठी १०० कोटींचे नियोजन केल्यास त्याचा फायदा पालिकेला होऊ शकतो. पालिकेच्या नियोजनाला मदत करण्यासाठी लोकांच्या देखरेख समित्या स्थापन करणे गरजेचे आहे. तसेच निवडून आलेल्या नव्या नगरसेवकांसाठी प्रशिक्षण आयोजित करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. बऱ्याच पालिकांजवळ स्वत:चा महसूल जमा करण्याची क्षमता आहे; पण इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळे ते सरकारवर पूर्णपणे अवलंबून राहतात. मडगाव तसेच मुरगाव पालिकेजवळ तशी क्षमता आहे; पण या पालिका योग्यप्रकारे काम करीत नसल्याचे दिसून आल्याचे ते म्हणाले. पालिकांत सुरू असलेल्या अस्थिर राजकारणावर त्यांना विचारले असता, पक्षपातळीवर या निवडणुका झाल्या असत्या तर अस्थिरता टाळणे शक्य होते; पण त्याला विरोध झाल्यानेच हा निर्णय रद्द करावा लागला, असे ते म्हणाले.