शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

खाण घोटाळेबाजांवर आता तरी कारवाई होणार?

By admin | Updated: March 23, 2015 02:06 IST

पणजी : खाण घोटाळा प्रकरणी न्यायमूर्ती शहा आयोगाने काढलेल्या निष्कर्षांवर केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने

पणजी : खाण घोटाळा प्रकरणी न्यायमूर्ती शहा आयोगाने काढलेल्या निष्कर्षांवर केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने मोहोर उठवली आहे, त्यामुळे घोटाळेबाजांवर आता तरी कारवाईची अक्कल प्रशासनाला येणार का, असा सवाल पर्यावरणप्रेमी विचारत आहेत. बेकायदा खाणींचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेऊन लढा देणारे गोवा फाउंडेशनचे संस्थापक क्लॉड आल्वारिस म्हणाले की, आयोगाने जे काही निष्कर्ष काढले होते, ते तटस्थपणे काढले होते आणि सत्य तेच उजेडात आणले होते. तज्ज्ञ समितीने त्यावर शिक्कामोर्तब केल्यास नवल नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ईसी निलंबन मागे घेण्याचा जो निर्णय घेतला त्यावरही आयोग नाराज आहे. क्लॉड हे सध्या गोव्याबाहेर असून २ किंवा ३ एप्रिलला परतणार आहेत. गोव्यातील खाण लिजधारकांनी अमर्याद खनिज उत्खननाबरोबरच बेकायदा अतिक्रमणे, डंपच्या बाबतीत गैरव्यवहार तसेच संरक्षित वनक्षेत्रातही बेदरकार खाणी चालवल्याचा जो ठपका आयोगाने ठेवला होता तो तज्ज्ञ समितीने उचलून धरला आहे. केंद्रीय वन तथा पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी डॉ. यु. श्रीधरन यांनी शुकवारी राज्य सरकारला पत्र पाठवून नियमांची पायमल्ली केलेल्या लिजधारकांवर कारवाईची शिफारस केलेली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २१ मार्च २०१३ रोजी माजी सचिव विश्वनाथ आनंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. लिजधारकांनी राष्ट्रीय वन्यप्राणी मंडळाचा परवाना न घेताच खाणी सुरू केल्या. केंद्रीय भूजल मंडळाचा किंवा वन खात्याचा परवाना घेतला नाही, तसेच बेसुमार उत्खनन केले. अतिक्रमण केले तसेच सत्य लपवून खोटी माहिती दिली, असा ठपका या समितीनेही काही लिजधारकांवर ठेवला आहे. न्यायमूर्ती शहा आयोगानेही तीन भागांमध्ये दिलेल्या आपल्या अहवालात अनेक गैरव्यवहार उजेडात आणले होते, त्यावर समितीने मोहोर उठवली आहे. शहा आयोगाचा अहवाल २०१२ साली संसदेत सादर झालेला आहे. सुमारे १०० खाणींच्या बाबतीत बेकायदा खनिज निर्यात तसेच अन्य गैरव्यवहार झाल्याचे आयोगाने म्हटले होते. (प्रतिनिधी)