शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खाण घोटाळेबाजांवर आता तरी कारवाई होणार?

By admin | Updated: March 23, 2015 02:06 IST

पणजी : खाण घोटाळा प्रकरणी न्यायमूर्ती शहा आयोगाने काढलेल्या निष्कर्षांवर केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने

पणजी : खाण घोटाळा प्रकरणी न्यायमूर्ती शहा आयोगाने काढलेल्या निष्कर्षांवर केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने मोहोर उठवली आहे, त्यामुळे घोटाळेबाजांवर आता तरी कारवाईची अक्कल प्रशासनाला येणार का, असा सवाल पर्यावरणप्रेमी विचारत आहेत. बेकायदा खाणींचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेऊन लढा देणारे गोवा फाउंडेशनचे संस्थापक क्लॉड आल्वारिस म्हणाले की, आयोगाने जे काही निष्कर्ष काढले होते, ते तटस्थपणे काढले होते आणि सत्य तेच उजेडात आणले होते. तज्ज्ञ समितीने त्यावर शिक्कामोर्तब केल्यास नवल नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ईसी निलंबन मागे घेण्याचा जो निर्णय घेतला त्यावरही आयोग नाराज आहे. क्लॉड हे सध्या गोव्याबाहेर असून २ किंवा ३ एप्रिलला परतणार आहेत. गोव्यातील खाण लिजधारकांनी अमर्याद खनिज उत्खननाबरोबरच बेकायदा अतिक्रमणे, डंपच्या बाबतीत गैरव्यवहार तसेच संरक्षित वनक्षेत्रातही बेदरकार खाणी चालवल्याचा जो ठपका आयोगाने ठेवला होता तो तज्ज्ञ समितीने उचलून धरला आहे. केंद्रीय वन तथा पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी डॉ. यु. श्रीधरन यांनी शुकवारी राज्य सरकारला पत्र पाठवून नियमांची पायमल्ली केलेल्या लिजधारकांवर कारवाईची शिफारस केलेली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २१ मार्च २०१३ रोजी माजी सचिव विश्वनाथ आनंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. लिजधारकांनी राष्ट्रीय वन्यप्राणी मंडळाचा परवाना न घेताच खाणी सुरू केल्या. केंद्रीय भूजल मंडळाचा किंवा वन खात्याचा परवाना घेतला नाही, तसेच बेसुमार उत्खनन केले. अतिक्रमण केले तसेच सत्य लपवून खोटी माहिती दिली, असा ठपका या समितीनेही काही लिजधारकांवर ठेवला आहे. न्यायमूर्ती शहा आयोगानेही तीन भागांमध्ये दिलेल्या आपल्या अहवालात अनेक गैरव्यवहार उजेडात आणले होते, त्यावर समितीने मोहोर उठवली आहे. शहा आयोगाचा अहवाल २०१२ साली संसदेत सादर झालेला आहे. सुमारे १०० खाणींच्या बाबतीत बेकायदा खनिज निर्यात तसेच अन्य गैरव्यवहार झाल्याचे आयोगाने म्हटले होते. (प्रतिनिधी)