शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

विधवांना आता ४ हजार रुपये मिळणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; सीएम स्कॉलरशिप पोर्टल सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:26 IST

पत्रकार परिषदेस समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हेही उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील विधवांना आता महिना चार हजार रुपये मानधन दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. गृह आधारचे १५०० रुपये महिना मानधन घेताना एखाद्या गृहिणीला वैधव्य आल्यास गृहआधाराचे १५०० व दयानंद सुरक्षेचे २५०० रुपये मिळून दरमहा ४००० रुपये मिळतील', असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही मानधन समाजकल्याण खात्यामार्फतच दिले जाईल. महिला बालकल्याण खात्यात गृह आधारचे पैसे बंद करण्यासाठी अर्ज करावा लागणार नाही. सरकारने ही प्रक्रिया आता सुटसुटीत केली आहे' अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. पत्रकार परिषदेस समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हेही उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते काल सीएम स्कॉलरशिप पोर्टलचे अनावरण झाले. यानंतर माहिती देताना ते म्हणाले की, 'गृह आधारचा लाभ घेताना विधवा झाल्यास महिलेच्या सर्वात लहान मुलाचे वय २१ वर्षापेक्षा कमी असायला हवे. राज्यात सुमारे ३६ हजार विधवा लाभार्थी आहेत. आतापर्यंत २,०४९ अर्ज प्रलंबित होते. ते मंजूर केल्याच्या तारखेपासून महिना अडीच हजार रुपये याप्रमाणे दोन दिवसात लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा होतील.' सीएम पोर्टलविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, 'सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. पोर्टलवर शिक्षण, उच्चशिक्षण किंवा आदिवासी कल्याण खात्याच्या शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करता येतील. एक महिन्याच्या आत अर्ज निकालात काढले जातील.

पैशांच्या अडचणीमुळे शिक्षणासाठी कोणीही वंचित राहणार नाही हे सरकार पाहील. आजपावतो शिष्यवृत्त्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करावे लागत होते. त्यामुळे ते वेळेत निकालात काढण्यात अडचणी येत होत्या. आता एकाच पोर्टलवर सर्व प्रकारच्या शैक्षणिक शिष्यवृत्तींसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतील. सरकारने अलीकडेच आदिवासी कल्याण खात्याच्या शिष्यवृत्ती योजनेत तब्बल १३ हजार विद्यार्थ्यांना पंधरा दिवसांत पैसे दिले. या पोर्टलवर भविष्यात कामगार कल्याण शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना ४५ दिवसात पैसे मिळतील.'

मुख्यमंत्री म्हणाले की, 'गोव्याबाहेर नर्सिंग अभ्यासक्रम 3 करणाऱ्या मुलींना चाळीस हजार रुपयांपर्यंत फीचा परतावा दिला जातो. एसटी, एससी, ओबीसी कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, हे सरकार ते ध्येय आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जातात. गेल्या चार-पाच वर्षात मला असे आढळून आले की, पात्र असूनही पन्नास टक्के विद्यार्थी अर्ज भरत नाही. आता पोर्टलमुळे प्रक्रिया सुटसुटीत झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावी अशी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, दहावी ते बारावी व त्यानंतर मॅट्रिकनंतरच्या शिष्यवृत्तीही दिल्या जातात.

१३ हजार बोगस लाभार्थी; ५० कोटी वसूल

दरम्यान, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई देसाई यांनी अन्य एका ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे सुमारे १३ हजार बोगस लाभार्थी सापडले आहेत. यापैकी काहीजण एकतर मृत झालेले आहेत किंवा बिगर गोमंतकीय अथवा उत्पन्न जास्त असतानाही लाभ घेत आहेत. या सर्वांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. त्यांच्याकडील ५० कोटी रुपये वसूल करण्यात आलेले आहेत. सर्वेक्षणात आणखी काही बोगस लाभार्थी ही सापडण्याची शक्यता आहे.'

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत