शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

विधवांना आता दरमहा मिळणार चार हजार रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 13:15 IST

सुधारित योजना : ६० वर्षे वयाखालील १९,५०० महिलांना होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत विधवांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली असून, आता दरमहा ४ हजार रुपये मिळतील. पात्रतेसाठी उत्पन्न मर्यादाही वाढवून दीड लाख रुपये केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

सुधारित योजनेनुसार सर्वांत लहान मुलगा अथवा मुलगी २१ वर्षांखालील आहे, अशी विधवा महिला या योजनेस पात्र आहे. ६० वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या तसेच २१ वर्षांपेक्षा जास्त वयाचे अपत्य असलेल्या विधवेला महिना २,५०० रुपये मिळतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या वार्षिक २४ हजार रुपये उत्पन्न मर्यादा आवश्यक आहे, ती वाढवून आता दीड लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे लाभापासून वंचित असलेल्या विधवांनाही या योजनेचा फायदा मिळेल.

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एक घोषणा केली होती ती अशी की, गृहआधारचा लाभ घेणाऱ्या गृहिणींचा कुंकवाचा आधार गेल्यास त्यांना गृह आधारचे १५०० व विधवांना समाजकल्याण खात्याच्या योजनेतून मिळणारे २५०० मिळून ४ हजार रुपये दिले जातील. त्यासाठी एकच योजना असेल. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत आवश्यक ती दुरुस्ती करून ही तरतूद सरकारने आता केलेली आहे, त्यामुळे विधवांना तो फार मोठा दिलासा ठरणार आहे.

महिना आठ कोटी रुपये अतिरिक्त भार पडणार...

समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ३९,०६६ पैकी साधारणपणे ५० टक्के विधवांना ४ हजार रुपये अर्थ साहाय्याचा लाभ मिळू शकेल. त्यामुळे दरमहा साडेसात ते आठ कोटी रुपये अतिरिक्त बोजा पडेल. विधवा महिला जर ६० वर्षापेक्षा अधिक वयाची असेल व तिचे अपत्य २१ वर्षे वयापेक्षा अधिक वयाचे असेल तर महिना २,५०० रुपयेच मिळतील. अशा साधारणपणे ५० टक्के विधवा असू शकतात. सरकारने विधवांना आधार म्हणून ही सुधारित योजना आणली आहे. आता नवीन अर्ज समाजकल्याण खात्याकडेच करावे लागतील.

 

टॅग्स :goaगोवा