शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोपा विमानतळाला विरोध का होतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 20:50 IST

अनेकांना आश्चर्य वाटते, गोवेकरांचे हे काय चाललेय? त्यांनी गोव्यात येऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला विरोध करून त्याचे काम बंद का पाडले?

- राजू नायक 

अनेकांना आश्चर्य वाटते, गोवेकरांचे हे काय चाललेय? त्यांनी गोव्यात येऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला विरोध करून त्याचे काम बंद का पाडले?

गोव्यातील पर्यावरणवादी खूप सजग आहेत. गोव्यात विध्वंस आरंभलेल्या, पर्यावरणाचे सारे नियम झुगारणा-या व महसूलही बुडविणा-या लुटालूट आरंभलेल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या खाण उद्योगालाही त्यांनी बंद पाडलेय. 

याचा अर्थ गोवेकर नकारार्थी आहेत काय? 

एक गोष्ट खरी आहे, गोव्यात यापूर्वीच एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा एकुलता एक विमानतळ नौदलाच्या ताब्यात आहे. तो नौदलाच्या ताब्यात असण्याचे एकमेव कारण पश्चिम किना-यावरील गोवा ही मोक्याची जागा. परंतु पर्यटनवाढीसाठी गोव्याच्या याच विमानतळावर गुंतवणूक करून विस्ताराला संधी दिली होती. ती न विचारात घेता तीन हजार कोटींचा नवा मोपा विमानतळ उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला व पर्यावरण नियमांचे निकष पूर्ण न करता घाईघाईत त्याला रेटण्याचा प्रयत्न झाला. या विमानतळाचा पहिला टप्पा सप्टेंबर २०२० मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न होता, त्याला आता खीळ बसणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने आता विमानतळाचे काम बंद ठेवताना, नव्याने पर्यावरणीय परवाना घेण्याचा आदेश दिला आहे. या संबंधीचा अंतरीम आदेश १८ जानेवारीला देण्यात आला होता. त्यात कोणतेही नवे झाड तोडण्यास मनाई केलेली होती. पुणे येथील हरित लवादाकडून याचिका अव्हेरली गेल्यानंतर रेनबो वॉरियर्स ही संघटना सर्वोच्च न्यायालयात गेली होती. त्यापूर्वी तिने सर्व सरकारी खात्याकडे विनंती अर्ज केले. परंतु पर्यावरण विषयक कोणतेच नियम गांभीर्याने घ्यायचे नाहीत, असे गोवा सरकारचे धोरणच होते. कारण मोपाचे कंत्राट मोठे व गुंतलेले कंत्राटदारही मोठेच. 

मोपाच्या बाबतीत सांगायचे तर सरकारी कारभार संशयाला वाव देणाराच होता. शिवाय आवश्यक सोपस्कार प्रक्रियेचा अवलंब न करता घिसाडघाईने केले असे आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याने बिगर सरकारी संघटनांच्या आक्षेपांमध्ये निश्चितच मुद्दा होता. ज्या २१३३ एकरांच्या मोपा पठारावर हा प्रकल्प येऊ पाहतोय, तेथे पर्यावरणाचे अनेक संकेत पायदळी तुडविण्यात आले. वास्तविक जे सरकार आता प्रकल्पाला पर्यावरणवादी विलंब लावतात असा आरोप करते, त्यांनी पर्यावरणाचा बळी देऊन विकास होत नाही, हे समजून घ्यायला हवे होते. 

गोव्याला पर्यावरण विध्वसांचे खूप मोठे मोल द्यावे लागले आहे. केरळसारखी आपत्ती येथे येऊ शकते याची भीती यापूर्वीच व्यक्त झाली आहे. सरकार त्याबाबत सजग नसल्यानेच पर्यावरणवादी न्यायालयात झुंज देतात. त्यामुळेच आर्थिक विकासावर परिणाम होत असेल तर तो त्यांचा दोष नाही. वास्तविक राज्यावर संक्रात ओढवणारा ‘असला’ विकास हवाच कशाला याचा विचार सुरू व्हायला नकोय काय?

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :goaगोवा