शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोपा विमानतळाला विरोध का होतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 20:50 IST

अनेकांना आश्चर्य वाटते, गोवेकरांचे हे काय चाललेय? त्यांनी गोव्यात येऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला विरोध करून त्याचे काम बंद का पाडले?

- राजू नायक 

अनेकांना आश्चर्य वाटते, गोवेकरांचे हे काय चाललेय? त्यांनी गोव्यात येऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला विरोध करून त्याचे काम बंद का पाडले?

गोव्यातील पर्यावरणवादी खूप सजग आहेत. गोव्यात विध्वंस आरंभलेल्या, पर्यावरणाचे सारे नियम झुगारणा-या व महसूलही बुडविणा-या लुटालूट आरंभलेल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या खाण उद्योगालाही त्यांनी बंद पाडलेय. 

याचा अर्थ गोवेकर नकारार्थी आहेत काय? 

एक गोष्ट खरी आहे, गोव्यात यापूर्वीच एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा एकुलता एक विमानतळ नौदलाच्या ताब्यात आहे. तो नौदलाच्या ताब्यात असण्याचे एकमेव कारण पश्चिम किना-यावरील गोवा ही मोक्याची जागा. परंतु पर्यटनवाढीसाठी गोव्याच्या याच विमानतळावर गुंतवणूक करून विस्ताराला संधी दिली होती. ती न विचारात घेता तीन हजार कोटींचा नवा मोपा विमानतळ उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला व पर्यावरण नियमांचे निकष पूर्ण न करता घाईघाईत त्याला रेटण्याचा प्रयत्न झाला. या विमानतळाचा पहिला टप्पा सप्टेंबर २०२० मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न होता, त्याला आता खीळ बसणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने आता विमानतळाचे काम बंद ठेवताना, नव्याने पर्यावरणीय परवाना घेण्याचा आदेश दिला आहे. या संबंधीचा अंतरीम आदेश १८ जानेवारीला देण्यात आला होता. त्यात कोणतेही नवे झाड तोडण्यास मनाई केलेली होती. पुणे येथील हरित लवादाकडून याचिका अव्हेरली गेल्यानंतर रेनबो वॉरियर्स ही संघटना सर्वोच्च न्यायालयात गेली होती. त्यापूर्वी तिने सर्व सरकारी खात्याकडे विनंती अर्ज केले. परंतु पर्यावरण विषयक कोणतेच नियम गांभीर्याने घ्यायचे नाहीत, असे गोवा सरकारचे धोरणच होते. कारण मोपाचे कंत्राट मोठे व गुंतलेले कंत्राटदारही मोठेच. 

मोपाच्या बाबतीत सांगायचे तर सरकारी कारभार संशयाला वाव देणाराच होता. शिवाय आवश्यक सोपस्कार प्रक्रियेचा अवलंब न करता घिसाडघाईने केले असे आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याने बिगर सरकारी संघटनांच्या आक्षेपांमध्ये निश्चितच मुद्दा होता. ज्या २१३३ एकरांच्या मोपा पठारावर हा प्रकल्प येऊ पाहतोय, तेथे पर्यावरणाचे अनेक संकेत पायदळी तुडविण्यात आले. वास्तविक जे सरकार आता प्रकल्पाला पर्यावरणवादी विलंब लावतात असा आरोप करते, त्यांनी पर्यावरणाचा बळी देऊन विकास होत नाही, हे समजून घ्यायला हवे होते. 

गोव्याला पर्यावरण विध्वसांचे खूप मोठे मोल द्यावे लागले आहे. केरळसारखी आपत्ती येथे येऊ शकते याची भीती यापूर्वीच व्यक्त झाली आहे. सरकार त्याबाबत सजग नसल्यानेच पर्यावरणवादी न्यायालयात झुंज देतात. त्यामुळेच आर्थिक विकासावर परिणाम होत असेल तर तो त्यांचा दोष नाही. वास्तविक राज्यावर संक्रात ओढवणारा ‘असला’ विकास हवाच कशाला याचा विचार सुरू व्हायला नकोय काय?

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :goaगोवा