शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

विजेवर उपाय का नाही? पावसाचे आगमन अन् जनतेला कटकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2024 07:53 IST

अशा स्थितीत लोकांनी जगायचे तरी कसे?

राज्यातील वीज समस्येवर उपाय काढण्यात गेली अनेक वर्षे प्रत्येक सरकार अपयशी ठरत आले आहे. पाऊस सुरू झाला की, लगेच वीज पुरवठ्याबाबत कटकटी सुरू होतात. ग्रामीण भागात तर लोकांचे खूपच हाल होतात. मात्र, सरकारला याची चिंता आहे की नाही असा प्रश्न विचारावासा वाटतो. कारण अजून पावसाळा सुरूदेखील झालेला नाही. मात्र, थोडा वारा आला किंवा आकाशात थोडा गडगडाट झाला की, वीज गुल होते. एका बाजूने वीज नाही व दुसऱ्या बाजूने नळाला पाणी नाही अशा स्थितीत लोकांनी जगायचे तरी कसे?

जनता सध्या सोशल मीडियावरून आपल्या तीव्र भावना व्यक्त करत आहे. सुदिन ढवळीकर यांनी वीज मंत्री झाल्यानंतर वीज खाते सक्रिय केले हे मान्य करावे लागेल. त्यांनी केंद्राकडून बाराशे ते दीड हजार कोटी रुपयांची कामे मंजूरही करून आणली. सहा महिन्यांपूर्वी बऱ्याच कामांचे आदेशदेखील दिले. अनेक ठिकाणी वीज उपकेंद्रे तयार होतील. नवे ट्रान्स्फॉर्मर बसविले जात आहेत. मात्र, राजधानी पणजी असो किंवा ताळगावचा भाग असो किंवा पर्वरी-म्हापशाचा भाग असो, सगळीकडे वीज पुरवठ्याच्या नावाने बोंब आहे. 

फोंडा तालुक्यातदेखील वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. सत्तरी व सांगे तालुक्यातील ग्रामीण भागात तर नागरिकांचे हालच होत आहेत. तासनतास वीज गायब असते. संतापजनक गोष्ट म्हणजे वीज खात्याकडून लोकांना प्रतिसाद मिळत नाही. लोक वीज कार्यालयांमध्ये फोन करतात. फोन एक तर वाजत राहतात किंवा ते मुद्दाम व्यस्त ठेवले जातात, फोन एंगेज ठेवून वीज अभियंते कुठे गेलेले असतात ते कळत नाही. खात्याचे तक्रार निवारण कक्ष म्हणजे टाईमपास केंद्रे झालेली आहेत. अर्थात पूर्वी तरी अशीच स्थिती असायची. आता जर वीज मंत्री ढवळीकर हे सुधारणा करणार असतील तर त्याचे स्वागतच आहे.

वीज समस्येवर उपाय म्हणून आता यापुढे चोवीस तास तक्रार निवारण कक्ष कार्यरत करण्याची सरकारची योजना आहे. मंत्री ढवळीकर यांनी त्याचे सूतोवाच केले आहे. तक्रार निवारण कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण आपल्या कार्यालयात आपल्या ओएसडींना असेल, असेही ढवळीकर यांनी जाहीर केले आहे. याशिवाय मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंते यांच्याकडेही थेट प्रक्षेपण असेल, म्हणजे त्या कक्षात काय चालतेय हे सगळे सीसीटीव्हीवर मंत्र्यांच्या ओएसडींना व सीईना कळून येणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था सरकारने लवकर अमलात आणावी. 

अर्धा पाऊस पडून गेल्यानंतर मग तक्रार निवारण कक्ष स्थापन करू नयेत. ते आताच करावेत. शिवाय सीसीटीव्ही यंत्रणा या सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये व काही रुग्णालयांतही असतात, पण त्या काही काळानंतर बंद पडतात. सीसीटीव्हींद्वारे कामावर देखरेख ठेवता येते, पण ते सीसीटीव्ही काही महिन्यांनंतर चालणारच नाहीत, त्या नादुरुस्त होतील याची काळजी अनेकदा संबंधित कर्मचारीच घेत असतात. 

काही अभियंत्यांना व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम नको असते. मुळात सर्व कनिष्ठ अभियंत्यांकडे व लाईनमनांकडेही मोबाइल फोन आहेत. ते सगळे फोन क्रमांक वीज खात्याने लोकांसाठी खुले करावेत. लोकांना ते क्रमांक द्यावेत. तक्रार केल्यानंतर लगेच वीज खात्याची गाडी तक्रारदारापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था ढवळीकर यांना करावी लागेल. दिगंबर कामत वीज खाते सांभाळायचे तेव्हा अशी व्यवस्था होती. कुठेही वीज पुरवठा खंडित झाला की त्या भागात वीज खात्याचे वाहन पोहोचायचे. नंतरच्या काळात या सगळ्या व्यवस्था बंद पडल्या. मिलिंद नाईक वीजमंत्री होते तेव्हा खाते सुधारले नाहीच. नीलेश काब्राल यांनी वीज मंत्री या नात्याने काही काळ चांगले काम केले होते.

गोव्याच्या ग्रामीण भागात वीज यंत्रणा जुनाट झालेली आहे हा एक भाग आहेच. मात्र, वीज खात्याचे अभियंते, लाईनमन, आदी कर्मचारी जर सतर्क राहिले, तर अनेकदा पुरवठा लवकर नव्याने सुरू करता येतो. झाडे पडून वीज वाहिन्या तुटल्या की एक-दोन दिवस गावे अंधारात राहतात. वीज नाही म्हणून मग नळाला पाणी नाही अशी स्थिती येते. लोक यामुळेच कंटाळलेले आहेत. याकडे ढवळीकर यांनी लक्ष द्यावेच लागेल. 

टॅग्स :goaगोवाelectricityवीज