शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

केंद्राच्या योजना गोव्यात का फसतात? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:04 IST

केंद्र सरकारच्या काही योजनांचे निकष लागू होत नसल्याने अनेक योजना गोव्यात फसल्याचे चित्र पहावयास मिळते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेपासून घर बांधणीसाठी सबसिडीची सोय असलेली प्रधानमंत्री आवास योजना ते अलीकडच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेपर्यंत अनेक योजना राज्यात सपशेल अपयशी ठरल्या आहेत.

पणजी : केंद्र सरकारच्या काही योजनांचे निकष लागू होत नसल्याने अनेक योजना गोव्यात फसल्याचे चित्र पहावयास मिळते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेपासून घर बांधणीसाठी सबसिडीची सोय असलेली प्रधानमंत्री आवास योजना ते अलीकडच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेपर्यंत अनेक योजना राज्यात सपशेल अपयशी ठरल्या आहेत.

केंद्राने खेड्यापाड्यांमधील रस्ते सुधारावेत यासाठी ग्राम सडक योजना आणली परंतु या योजनेचा येथे बोजवारा उडाला. ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगांवकर यांना विचारले असता ते म्हणाले की,‘ गोव्यात ग्राम सडक योजना फसण्याचे कारण म्हणजे लोक जमिनी दान करत नाहीत. मोठ्या राज्यांमध्ये सरकारच्या मालकीच्या प्रचंड जमिनी असतात. जमीनमालकांकडेही मोठमोठे भूखंड असतात. गोव्यात लहान भूखंडधारक आहेत. तसेच येथील राहणीमान उच्च दर्जाचे असून गावांनाही निम शहरी स्वरुप आलेले आहे.’

प्रधानमंत्री आवास योजनाही राज्यात फसली. केंद्राच्या या योजनेत घर बांधण्यासाठी १ लाख २0 हजार रुपये सबसिडी दिली जाते परंतु गोव्यातील जमिनी कूळ, मुंडकार आणि मालक यांच्या वादात फसल्याने तीही अडचणीची बाब ठरत आहे. स्वत:च्या मालकीची जमीन असली तरच घर बांधणीसाठी सबसिडी दिली जाते. 

याबाबतीत मंत्री जयेश साळगांवकर म्हणाले की ‘ गोव्यासाठी स्वतंत्र निकष असावेत, अशी मागणी हल्लीच दिल्लीत मंत्र्यांच्या बैठकीत मी केलेली आहे. १00 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहेत. निम शहरी भागांमध्येही घरांच्याबाबतीत गरजूंना त्याचा लाभ घेता येईल.’गृहनिर्माण खातेही साळगांवकर यांच्याकडेच आहे. 

पिक विमा योजनेचाही बोजवारा प्रधानमंत्री पिक विमा योजनाही गोव्यात फसल्याचे स्पष्ट झाले आहे. या खरीप मोसमात राज्यात केवळ ३४१ शेतकºयांनी याचा लाभ घेतला यात ३३३ ऊस उत्पादक, केवळ ७ जण भात उत्पादक तर १ भुईमुग उत्पादन घेणारा शेतकरी आहे. खात्याचे साहाय्यक संचालक चिंतामणी पेरणी यांनी यास दुजोरा दिला ते म्हणाले की, संपूर्ण गावात किंवा वाड्यावर किमान ८0 टक्के पिकाचे नुकसान झालेले असले तरच या विमा योजनेखाली लाभ मिळतो, अन्यथा नाही. ही अट शेतकºयांच्या मुळावर आली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला अटी भरपूर आहेत शिवाय शेतक-यांना हप्तेही भरावे लागतात. त्या तुलनेत राज्य सरकारच्या शेतकरी आधार योजनेला कोणताही हप्ता भरावा लागत नाही. त्यामुळे शेतकरी केंद्र सरकारची ही योजना घ्यायला बघत नाही. आतापर्यंत केवळ १ टक्का शेतजमीनच केंद्राच्या विमा योजनेखाली आलेली आहे. योजनेचे निकष पाहता गोव्यासारख्या राज्यात ही योजना संयुक्तिक नाही. येथे लागवडीखाली असलेले भूखंडही लहान आहेत. 

टॅग्स :goaगोवा