शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या योजना गोव्यात का फसतात? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:04 IST

केंद्र सरकारच्या काही योजनांचे निकष लागू होत नसल्याने अनेक योजना गोव्यात फसल्याचे चित्र पहावयास मिळते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेपासून घर बांधणीसाठी सबसिडीची सोय असलेली प्रधानमंत्री आवास योजना ते अलीकडच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेपर्यंत अनेक योजना राज्यात सपशेल अपयशी ठरल्या आहेत.

पणजी : केंद्र सरकारच्या काही योजनांचे निकष लागू होत नसल्याने अनेक योजना गोव्यात फसल्याचे चित्र पहावयास मिळते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेपासून घर बांधणीसाठी सबसिडीची सोय असलेली प्रधानमंत्री आवास योजना ते अलीकडच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेपर्यंत अनेक योजना राज्यात सपशेल अपयशी ठरल्या आहेत.

केंद्राने खेड्यापाड्यांमधील रस्ते सुधारावेत यासाठी ग्राम सडक योजना आणली परंतु या योजनेचा येथे बोजवारा उडाला. ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगांवकर यांना विचारले असता ते म्हणाले की,‘ गोव्यात ग्राम सडक योजना फसण्याचे कारण म्हणजे लोक जमिनी दान करत नाहीत. मोठ्या राज्यांमध्ये सरकारच्या मालकीच्या प्रचंड जमिनी असतात. जमीनमालकांकडेही मोठमोठे भूखंड असतात. गोव्यात लहान भूखंडधारक आहेत. तसेच येथील राहणीमान उच्च दर्जाचे असून गावांनाही निम शहरी स्वरुप आलेले आहे.’

प्रधानमंत्री आवास योजनाही राज्यात फसली. केंद्राच्या या योजनेत घर बांधण्यासाठी १ लाख २0 हजार रुपये सबसिडी दिली जाते परंतु गोव्यातील जमिनी कूळ, मुंडकार आणि मालक यांच्या वादात फसल्याने तीही अडचणीची बाब ठरत आहे. स्वत:च्या मालकीची जमीन असली तरच घर बांधणीसाठी सबसिडी दिली जाते. 

याबाबतीत मंत्री जयेश साळगांवकर म्हणाले की ‘ गोव्यासाठी स्वतंत्र निकष असावेत, अशी मागणी हल्लीच दिल्लीत मंत्र्यांच्या बैठकीत मी केलेली आहे. १00 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहेत. निम शहरी भागांमध्येही घरांच्याबाबतीत गरजूंना त्याचा लाभ घेता येईल.’गृहनिर्माण खातेही साळगांवकर यांच्याकडेच आहे. 

पिक विमा योजनेचाही बोजवारा प्रधानमंत्री पिक विमा योजनाही गोव्यात फसल्याचे स्पष्ट झाले आहे. या खरीप मोसमात राज्यात केवळ ३४१ शेतकºयांनी याचा लाभ घेतला यात ३३३ ऊस उत्पादक, केवळ ७ जण भात उत्पादक तर १ भुईमुग उत्पादन घेणारा शेतकरी आहे. खात्याचे साहाय्यक संचालक चिंतामणी पेरणी यांनी यास दुजोरा दिला ते म्हणाले की, संपूर्ण गावात किंवा वाड्यावर किमान ८0 टक्के पिकाचे नुकसान झालेले असले तरच या विमा योजनेखाली लाभ मिळतो, अन्यथा नाही. ही अट शेतकºयांच्या मुळावर आली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला अटी भरपूर आहेत शिवाय शेतक-यांना हप्तेही भरावे लागतात. त्या तुलनेत राज्य सरकारच्या शेतकरी आधार योजनेला कोणताही हप्ता भरावा लागत नाही. त्यामुळे शेतकरी केंद्र सरकारची ही योजना घ्यायला बघत नाही. आतापर्यंत केवळ १ टक्का शेतजमीनच केंद्राच्या विमा योजनेखाली आलेली आहे. योजनेचे निकष पाहता गोव्यासारख्या राज्यात ही योजना संयुक्तिक नाही. येथे लागवडीखाली असलेले भूखंडही लहान आहेत. 

टॅग्स :goaगोवा