शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

भाजपचे ९ भंडारी उमेदवार का पडले?

By admin | Updated: March 16, 2017 01:01 IST

पणजी : भंडारी समाज हा गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्याने ठामपणे भाजपच्याच बाजूने राहिला. गेली वीस वर्षे प्रत्येक विधानसभा

पणजी : भंडारी समाज हा गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्याने ठामपणे भाजपच्याच बाजूने राहिला. गेली वीस वर्षे प्रत्येक विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळी तसाच अनुभव आला; पण या वेळी प्रथमच भंडारी समाजानेही भाजपची साथ सोडून अन्य पक्षांमधील भंडारी समाजातील उमेदवारांना निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. भाजपने उभे केलेले भंडारी समाजातील नऊ उमेदवार पराभूत झाले. यामागील कारणमीमांसा करण्यासाठी भाजपमध्ये विचारमंथन सुरू झाले आहे.सुमारे अडीच लाख लोकसंख्या असलेल्या भंडारी समाजाची व्होट बँक ही कोणत्याही हिंदुत्ववादी पक्षासाठी महत्त्वाची असते. पंचवीस वर्षांपूर्वी भंडारी समाज हा मगोपसोबत राहायचा. १९९४ सालापासून भंडारी समाजाने भाजपची साथ देणे सुरू केले. १९९४ साली जे चार आमदार भाजपचे निवडून आले होते, त्यात श्रीपाद नाईक व नरहरी हळदणकर हे दोघे भंडारी समाजातील होते. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीवेळी भाजपचे तिकीट वाटप करताना भंडारी समाजाला जास्त उमेदवारी दिली व काँग्रेसपेक्षाही जास्त भंडारी समाज आमदार हे भाजपमधून तयार होऊ लागले. या वेळी एकूण दहा भंडारी समाजातील उमेदवार भाजपने दिले. त्यापैकी नऊ जणांचा दणदणीत पराभव झाला. मिलिंद नाईक हे एकटेच कसेबसे टिकले. त्यांचा पराभव केवळ १४० मतांनी टळला. बहुजन समाजाने भाजपची साथ या निवडणुकीवेळी का सोडली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कूळ-मुंडकार कायद्यातील दुरुस्ती हे एक त्यामागील महत्त्वाचे कारण आहे. शिवाय या समाजातील काही मंत्र्यांनी लोकांना तसेच आपल्या कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूकही त्यास कारणीभूत ठरली. शिरोड्यात महादेव नाईक, थिवीत किरण कांदोळकर, साळगावमध्ये दिलीप परुळेकर, शिवोलीत दयानंद मांद्रेकर हे पराभूत झाले. त्याशिवाय फातोर्डामध्ये दामू नाईक, वाळपईत सत्यविजय नाईक, सांताक्रुझमध्ये हेमंत गोलतकर, ताळगावमध्ये दत्तप्रसाद नाईक, सांतआंद्रेत रामराव नाईक वाघ हे भंडारी समाजातील उमेदवार पराभूत झाले. काँग्रेसने भंडारी समाजातील पाच जणांना तिकीट दिले होते. त्यात रवी नाईक, सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे, अमरनाथ पणजीकर व उर्मिला नाईक यांचा समावेश होता. यापैकी तिघांचा विजय झाला. शिवाय गोवा फॉरवर्डतर्फे जयेश साळगावकर व विनोद पालयेकर हे भंडारी समाजातील उमेदवार निवडून आले. ज्या मतदारसंघांमध्ये भंडारी समाज विरुद्ध भंडारी समाजातील उमेदवार, अशी लढत झाली, तिथे मतदारांनी बिगरभाजप उमेदवारास साथ दिली.