शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

म्हादईसाठी रस्त्यावर उतरावेच लागणार; वकिलांवर ३.२ कोटी खर्चूनही लढ्याला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2025 09:39 IST

पणजीत शुक्रवारी अभियानतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादईच्या न्यायालयीन लढाईसाठी सरकारने पाच वर्षात ३.२ कोटी रुपये वकिलांवर खर्च केलेत. तरीही सरकारला या लढाईत हवे तसे यश आलेले नाही. आता लोकांनीच हा विषय उचलून धरत रस्त्यावर येऊन आंदोलने करावेत, असे आवाहन म्हादाई बचाव अभियानाने केले आहे.

पणजीत शुक्रवारी अभियानतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अभियानच्या निमंत्रक निर्मला सावंत, अॅड. भवानी शंकर गडणीस, प्रा. राजेंद्र केरकर, प्रजल साखरदांडे, अॅड. अविनाश भोसले उपस्थित होते. यावेळी निर्मला सावंत म्हणाल्या, अनेक वर्षांपासून सरकार कायदेशीर मार्गाने लढत आहे. पण या लढ्याला यश आलेले नाही. दुसरीकडे कर्नाटक फायदा करून घेत आहे. सरकार फक्त दिशाभूल करत आहे. करदात्यांचे पैसे वकिलांवर उधळत आहेत.

...तोवर प्रश्न रेंगाळणार

डॉ. भवानी शंकर गडणीस म्हणाले, सरकारने वकिलांची फौज उभी करून केवळ जनतेचा पैसा खर्च केला आहे. सर्वोच्च न्यायालयात म्हादईसाठी कर्नाटकसोबत संषर्घ सुरू आहे. मात्र, याला भाजप सरकारच जबाबदार आहे. जर सरकारने याची योग्य दखल घेतली असती तर हा विषय २०२५ मध्ये सुटला असता. पण सरकार आपण कायद्याने जातो असे सांगून लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता लोक जोपर्यंत हा विषय घेऊन रस्त्यावर येत नाही तो पर्यंत हा विषय असा रेंगाळत राहणार आहे.

सरकारला व्याघ्र क्षेत्र नको

राजेंद्र केरकर म्हणाले, या सरकारला व्याघ्र क्षेत्र झालेले नको आहे. म्हणून जाणून बुजून याला उशीर लावला जात आहे. व्याघ्र क्षेत्र घोषित झाले तर म्हादईचा विषयही सुटणार आहे.

 

टॅग्स :goaगोवा