शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

सांगेचा सर्वंकष विकास करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2025 10:08 IST

प्रलंबित प्रकल्पांची कामे वेळेवर पूर्ण होतील.

लोकमत न्यूज नेटवर्क, खोतीगाव : 'गेल्या निवडणुकीवेळी सुभाष फळदेसाई यांना विजय मिळवता आला नव्हता. जर ते त्यावेळी निवडून आले असते, तर ग्रामीण भागातील अनेक कामे तडीस लागली असती. त्यांचा राजकीय कारकिर्दीत खंड पडल्याने विकासकामे रेंगाळली. मात्र, आताच्या त्यांच्या कार्यकाळात ही कामे पूर्ण होतील. आता सांगेचा सर्वार्थाने चांगला विकास होईल', असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. काजुघोटो, कल्ला या गावांत दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते. प्रलंबित प्रकल्पांची कामे पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सांगे आणि केपे या दोन तालुक्यांच्या सीमेवरील डोंगरावर असलेल्या काजूघोटो आणि कल्ला या गावांतील लोकांनी गेल्या दहा वर्षांपासून रस्त्याची मागणी केली होती. मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पुढाकाराने यंदा या रस्त्याचे काम सुरू झाले. आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगे मतदारसंघातील विविध प्रकल्पांची या दौऱ्यात पाहणी केली. ग्रामीण वैद्यकीय दवाखाना आणि रिवण येथील पंचायत इमारत, मळकर्णेतील पंचायत इमारत, दांडो येथील पूल, सांतील आरोग्य केंद्र, पाईकदेव पूल आणि मंदिर, आदींची त्यांनी पाहणी केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील मांडवी, जुवारी या नद्यांवर जेव्हा पूल उभे राहिले होते, तेव्हा जे समाधान वाटले होते, तसेच समाधान आज या गावातील रस्ता झाल्यावर वाटते. सध्या हा भाग मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत १४ किलोमीटरचा आहे. शाळकरी मुलांसाठी खास वाहतुकीची सोय केली जाईल. यासाठी शिक्षण खात्याला सूचना देऊ.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'गावात राहून जे काही व्यवसाय करता येतील, ते सुरू करा. दूर ग्रामीण भागातून शहराकडे ये-जा करून नोकरी करणे शक्य नाही. विशेष म्हणजे सर्वांनाच नोकरी मिळणेही शक्य नाही.

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, 'अनेक वेळा कामे लवकर होत नाही किंवा अडकून पडतात. त्यामुळे मी स्वतः काही अधिकारी लोकांवर भडकतो, त्यावेळी माझ्याबद्दल लोक नकारात्मक रीतीने पाहातात. पण, माझा उद्देश लोकसेवा जलद व चांगली व्हावी हा असतो.' कांता वेळीप म्हणाले की, 'सरकार वन कायद्यांतर्गत कित्येकांना जमिनी देते. पण, व्याहूनही पिढ्यानपिढ्या कसत जमिनींचा विषय आजपर्यंत न्यायालयात पडून आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे. प्रदीप गावकर यांनी सूत्रसंचालन केले.

गाड्या झाल्या लालेलाल

मडगाव-काणकोण राष्ट्रीय महामार्गावर पाडी येथून किस्कॉण या गावातून काजूघोटो ते कल्ला हा जो रस्ता नव्याने आता करण्यासाठी सरकारने हातात घेतलेला आहे, त्याच ओबडधोबड रस्त्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यासह प्रवास केला. या ताफ्यावेळी त्यांच्या सफेद गाड्या धुळीने लालेलाल झाल्या होत्या.

सतावणूक करू नका

'या भागातील लोक पिढ्यानपिढ्या येथे वसाहत करून राहिले आहेत. या लोकांनीच हे जंगल सांभाळले आहे. त्या लोकांशी वैर करून जंगल सांभाळणे सरकारला अशक्य आहे. वन खात्याने गावातील लोकांसोबत व्यवहार करताना जंगलाच्या कायद्यावर बोट ठेवून लोकांची सतावणूक करू नये', असा सल्ला मुख्यमंत्री सावंत यांनी कार्यक्रमास उपस्थित वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिला. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत