शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

सांगेचा सर्वंकष विकास करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2025 10:08 IST

प्रलंबित प्रकल्पांची कामे वेळेवर पूर्ण होतील.

लोकमत न्यूज नेटवर्क, खोतीगाव : 'गेल्या निवडणुकीवेळी सुभाष फळदेसाई यांना विजय मिळवता आला नव्हता. जर ते त्यावेळी निवडून आले असते, तर ग्रामीण भागातील अनेक कामे तडीस लागली असती. त्यांचा राजकीय कारकिर्दीत खंड पडल्याने विकासकामे रेंगाळली. मात्र, आताच्या त्यांच्या कार्यकाळात ही कामे पूर्ण होतील. आता सांगेचा सर्वार्थाने चांगला विकास होईल', असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. काजुघोटो, कल्ला या गावांत दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते. प्रलंबित प्रकल्पांची कामे पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सांगे आणि केपे या दोन तालुक्यांच्या सीमेवरील डोंगरावर असलेल्या काजूघोटो आणि कल्ला या गावांतील लोकांनी गेल्या दहा वर्षांपासून रस्त्याची मागणी केली होती. मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पुढाकाराने यंदा या रस्त्याचे काम सुरू झाले. आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगे मतदारसंघातील विविध प्रकल्पांची या दौऱ्यात पाहणी केली. ग्रामीण वैद्यकीय दवाखाना आणि रिवण येथील पंचायत इमारत, मळकर्णेतील पंचायत इमारत, दांडो येथील पूल, सांतील आरोग्य केंद्र, पाईकदेव पूल आणि मंदिर, आदींची त्यांनी पाहणी केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील मांडवी, जुवारी या नद्यांवर जेव्हा पूल उभे राहिले होते, तेव्हा जे समाधान वाटले होते, तसेच समाधान आज या गावातील रस्ता झाल्यावर वाटते. सध्या हा भाग मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत १४ किलोमीटरचा आहे. शाळकरी मुलांसाठी खास वाहतुकीची सोय केली जाईल. यासाठी शिक्षण खात्याला सूचना देऊ.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'गावात राहून जे काही व्यवसाय करता येतील, ते सुरू करा. दूर ग्रामीण भागातून शहराकडे ये-जा करून नोकरी करणे शक्य नाही. विशेष म्हणजे सर्वांनाच नोकरी मिळणेही शक्य नाही.

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, 'अनेक वेळा कामे लवकर होत नाही किंवा अडकून पडतात. त्यामुळे मी स्वतः काही अधिकारी लोकांवर भडकतो, त्यावेळी माझ्याबद्दल लोक नकारात्मक रीतीने पाहातात. पण, माझा उद्देश लोकसेवा जलद व चांगली व्हावी हा असतो.' कांता वेळीप म्हणाले की, 'सरकार वन कायद्यांतर्गत कित्येकांना जमिनी देते. पण, व्याहूनही पिढ्यानपिढ्या कसत जमिनींचा विषय आजपर्यंत न्यायालयात पडून आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे. प्रदीप गावकर यांनी सूत्रसंचालन केले.

गाड्या झाल्या लालेलाल

मडगाव-काणकोण राष्ट्रीय महामार्गावर पाडी येथून किस्कॉण या गावातून काजूघोटो ते कल्ला हा जो रस्ता नव्याने आता करण्यासाठी सरकारने हातात घेतलेला आहे, त्याच ओबडधोबड रस्त्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यासह प्रवास केला. या ताफ्यावेळी त्यांच्या सफेद गाड्या धुळीने लालेलाल झाल्या होत्या.

सतावणूक करू नका

'या भागातील लोक पिढ्यानपिढ्या येथे वसाहत करून राहिले आहेत. या लोकांनीच हे जंगल सांभाळले आहे. त्या लोकांशी वैर करून जंगल सांभाळणे सरकारला अशक्य आहे. वन खात्याने गावातील लोकांसोबत व्यवहार करताना जंगलाच्या कायद्यावर बोट ठेवून लोकांची सतावणूक करू नये', असा सल्ला मुख्यमंत्री सावंत यांनी कार्यक्रमास उपस्थित वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिला. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत