शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

तुमच्या फुटपट्टीची आम्हाला गरज नाही!

By admin | Updated: December 31, 2016 03:19 IST

पणजी : सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार माजला व प्रशासन कमकुवत झाले हे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांचे आरोप आम्हाला

पणजी : सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार माजला व प्रशासन कमकुवत झाले हे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांचे आरोप आम्हाला मान्य नाहीत. मी आर्चबिशपांना स्वतंत्रपणे भेटणार आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले. भाजप कसा आहे व आमचे सरकार कसे आहे, हे आमच्यासोबत काम केलेले सहा ख्रिस्ती आमदारच सांगू शकतील. आम्हाला कुणाच्या फुटपट्टीची गरज नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आर्चबिशपांना प्रतिटोला हाणला. बुधवार, २८ रोजी नाताळनिमित्त आर्चबिशपांनी आल्तिनो येथे बिशप पॅलेससमोर वार्षिक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्यमंत्री पार्सेकर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच आर्चबिशपांनी भाषण करताना प्रशासनाबाबत तिखट भाष्य केले. खाण क्षेत्रातील व्यवहार, प्रशासनाचा कमकुवतपणा व भ्रष्टाचार याविषयी आर्चबिशप बोलले होते. त्यानंतर चहापानास मुख्यमंत्री व पर्रीकर थांबले नाहीत. बिशपांचे भाषण संपले, तरी सोहळा सुरू असताना ते उठून गेले होते. शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना याविषयी विचारले असता, पार्सेकर म्हणाले की, मला ते आरोप मान्य नाहीत. त्या दिवशी आर्चबिशपांच्या भाषणानंतर मी बाहेर जात असताना एक ख्रिस्ती धर्मगुरू मला बाहेर पोहोचविण्यासाठी आले होते, त्या वेळीच मी आर्चबिशपांना स्वतंत्रपणे एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. मी त्यांना भेटेन. नेमके कधी भेटेन ते आताच सांगत नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, गेली पाच वर्षे सहा ख्रिस्ती आमदार आमच्यासोबत आहेत. काही ख्रिस्ती आमदार मंत्रिमंडळात आहेत. आमचे सरकार व भाजप यांच्यासाठी तेच खरे न्यायाधीश आहेत. बाहेरील व्यक्ती आम्ही कसे आहोत याविषयी काही सांगू शकणार नाही, आमच्यासोबत असलेले ख्रिस्ती आमदारच ते सांगू शकतील. पार्सेकर म्हणाले, आम्ही समाजाच्या कुठच्याच एखाद्या घटकाचे लांगूलचालन करून निवडणूक जिंकू पाहत नाही. तर आम्ही पाच वर्षांत केलेल्या भरीव विकासकामांच्या आधारे लढत आहोत. (खास प्रतिनिधी)