शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

लमाण्यांबाबत आदर, आम्ही माफी मागतो

By admin | Updated: April 12, 2017 02:36 IST

पणजी : लमाण्यांबाबत आम्हाला आदर आहे. लमाणी ही जमात आहे. लमाण्यांवर नव्हे तर किनाऱ्यांवरील फिरत्या विक्रेत्यांवर बंदी घालायला हवी.

पणजी : लमाण्यांबाबत आम्हाला आदर आहे. लमाणी ही जमात आहे. लमाण्यांवर नव्हे तर किनाऱ्यांवरील फिरत्या विक्रेत्यांवर बंदी घालायला हवी. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांना विधान करताना लमाणी ही जमात असल्याचे लक्षात आले नाही. भाजपप्रणीत आघाडी सरकारच्या वतीने आम्ही माफी मागतो, असे भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी मंगळवारी येथे सांगितले.भाजपच्या कार्यालयात लोबो यांनी दत्तप्रसाद नाईक व हेमंत गोलतकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. लोबो म्हणाले, की लमाण्यांना दुखविण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. लमाणी समाजातील नेते आपल्याला भेटायला आले होते. आपण नंतर मंत्री आजगावकर यांच्याशीही बोलणी केली. किनाऱ्यांवरील फिरत्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई व्हायला हवी, असे आजगावकर यांना म्हणायचे होते. त्यांनी चुकून लमाणी म्हटले. भाजपच्या वतीने व सरकारच्या वतीने आम्ही माफी मागतो. फिरत्या विक्रेत्यांना बंदी लागू करायला हवी, आम्ही कळंगुटमध्ये तशी ती केली आहे.किनारपट्टीत रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत सुरू राहू नये याविषयी गोवा फॉरवर्डचे मंत्री विनोद पालयेकर यांनी घेतलेल्या भूमिकेविषयी पत्रकारांनी विचारले असता, लोबो म्हणाले की संगीत हे गोव्याच्या संस्कृतीचा भाग आहे. संगीतावर बंदी लागू करता येणार नाही. फक्त कायद्याचे उल्लंघन करून खूप मोठ्या प्रमाणात संगीत वाजविले जात असेल तर त्यावर नियंत्रण आणायला हवे. मंत्री पालयेकर यांच्या शिवोली मतदारसंघात काही ठिकाणी तसे होत असावे. त्यामुळे तिथे त्यांनी कारवाई करावी. योग्य अशा आवाजात जर संगीत वाजविले जात असेल तर ते रात्री बारा वाजेपर्यंत वाजविण्यास हरकत नसावी. मी तर एक पाऊल पुढे टाकून म्हणेन की, गोव्यात रात्री बारा वाजेपर्यंत संगीत वाजविण्यासाठीच विशेष असे झोन तयार केले जायला हवेत. लोबो म्हणाले, की कळंगुट मतदारसंघात ड्रग्स व्यवसाय आता पूर्णपणे बंद झाला आहे. वेश्या व्यवसायाविरुद्धही कारवाई होत आहे; पण विविध पद्धतीने तो चालू राहतो ही खरी गोष्ट आहे. काही लोक फ्लॅट्स, घरे वगैरे भाडेपट्टीवर देतात. तिथे गैरधंदे चालतात.कॅसिनोंविषयी बोलताना लोबो म्हणाले, की कॅसिनो हे आता गोव्याच्या पर्यटनाचा भाग झालेले आहेत. मांडवी नदीतून त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्याबाबत सरकार तोडगा काढील. सरकारमध्ये नवे दोन मंत्री आता येत असले तरी, ते पूर्वीच्या चुका करणार नाहीत याची काळजी मुख्यमंत्री घेतील. (खास प्रतिनिधी)