शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

म्हापशातील बाजारपेठेतील पारंपारिकता नष्ट होण्याच्या मार्गावर : व्यापारी संघटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 16:35 IST

ऑनलाइन पद्धतीच्या व्यवसायात वाढ झाली असल्याने म्हापशातील बाजारपेठेतल्या व्यापा-यांच्या व्यवसायावर सुमारे ३५ टक्के परिणाम झाले आहेत. पूर्ण गोव्यातील व्यापा-यांना ही समस्या सतावत आहे.

म्हापसा : जगप्रसिद्ध अशा म्हापसा शहरातील पारंपारिक बाजारातील पारंपारिकता बाजाराची ओळख नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शुक्रवारच्या बाजारावरील पालिकेने आपले नियंत्रण गमावले असून त्यात भर म्हणून बनावटगिरी, फसवेगिरी, गैरप्रकार, वेश्या व्यवसाय यांना ऊत आलेला असल्याचा आरोप म्हापसा व्यापारी संघटनेच्या बिनविरोध निवड झालेल्या नुतन समितीने केला आहे. 

ऑनलाइन पद्धतीच्या व्यवसायात वाढ झाली असल्याने म्हापशातील बाजारपेठेतल्या व्यापा-यांच्या व्यवसायावर सुमारे ३५ टक्के परिणाम झाले आहेत. पूर्ण गोव्यातील व्यापा-यांना ही समस्या सतावत आहे. त्यात भर म्हणून सरकारकडून खासगी सरकारी सहकार्याने नवीन बसस्थानक उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यात शॉपिंग मॉल उभारण्याचा प्रयत्न सुरु झाला असून हे मॉल सुरु झाल्यास व्यापा-यांवर होत असलेल्या परिणामात भर पडणार असल्याचे समितीचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी पत्रकारांना सांगितले. 

बाजारपेठेतील विक्रेत्यांना देण्यात येत असलेल्या परवान्यांवर पालिकेने नियंत्रण गमावले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पारंपारिकते बरोबर मसाल्यांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारात रस्त्यावर बसणा-या विक्रेत्यांना व्यापारी परवाने पालिकेकडून देण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून बनावटगिरी केली जात असून दुकानात मिळणारी वस्तू रस्त्यावर उपलब्ध होवू लागल्याने ग्राहकांनी दुकानदारांकडे दुर्लक्ष केले आहे. शुक्रवारी बाजाराच्या दिवशी बाजारातून फिरणे कठीण झाले आहे. गुरांसोबत बाजारातून जाणारी वाहने व जागा मिळेल तिथे बसणा-या विक्रेत्यांमुळे परिणाम झाले आहेत. दुकानातील वस्तू रस्त्यावर मिळू लागल्याने तसेच त्यांच्यामुळे दुकाने ग्राहकांच्या नजरेला पडत नसल्याने परिणामात भर झाल्याची माहिती उपाध्यक्ष नरेश तिवरेकर यांनी दिली. 

बाजारातील परिस्थितीला पालिका जबाबदार असल्याचे आरोप समितीचे उपाध्यक्ष नरेश तिवरेकर यांनी केले. निरीक्षकांनी बाजारावरचे नियंत्रण गमावले आहे. त्यातून सुविधांचा अभाव झाला पालिकेचे मुख्याधिकारी बाजारात कधीच येत नसल्याची किंवा पाहणी सुद्धा करीत नसल्याची माहिती यावेळी दिली. व्यापा-यांकडून पालिकेला फक्त कराच्या रुपात महसूल प्राप्त होतो; पण रस्त्यावरील विक्रेत्यांकडून गैरमार्गाने प्राप्ती होत असल्याचे आरोपही तिवरेकर यांनी केले. 

काही विक्रेत्यांना बाजारातून हटवण्यात आले होते. हटवण्यात आलेल्यांचे पुर्नवसन करण्यात आले असले तरी त्यांच्या जागी नव्या विक्रेत्यांना बसवण्यात आले. भाजी तसेच मासळी मार्केटावरही दुर्लक्ष झाले असल्याने त्याचे परिणाम बाजारावर होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.  

गैरप्रकार नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिका-याचे बाजारावर नियंत्रण हवे असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. तसेच पोलिसांकडून सुद्धा त्यात लक्ष घालून गैरप्रकार थांबवणे गरजेचे असल्याची माहिती दिली. बाजारातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी व्यापारी संघटनेकडून सहकार्य करण्याची तयारी सुद्धा दर्शवण्यात आली. 

टॅग्स :goaगोवा