शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार; मुख्यमंत्री कडाडले, अतिक्रमण करणाऱ्यांची गय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2024 09:16 IST

कचराप्रश्नी आक्रमक धोरण अवलंबणार,  आता प्रत्येक तालुक्यात घेणार आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यात अनेक ठिकाणी सरकारी जागा बळकावून घरे उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बेकायदा बांधकामांची वीज व पाणी कनेक्शन तोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे आता अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

डिचोली तालुक्यातील पालिका आधिकारी पंचायतीचे सरपंच, सचिव व गटविकास अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी साखळी येथे बैठक घेतली. तालुक्यातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कचरा समस्येबरोबर बेकायदा बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले. बैठकीला पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, पराग रांगणेकर, गटविकास अधिकारी ओंकार मांजरेकर यांच्यासह तालुक्यातील सर्व गटविकास अधिकारी, पंचायत सचिव, सरपंच उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कचरा व्यवस्थापनात डिचोली तालुक्यातील पालिका, पंचायतींना अपयश आले आहे. यापुढे त्यांची ही अकार्यक्षमता खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे तातडीने पालिका, पंचायतींनी आपापल्या परिसरातील कचरा व्यवस्थापन गांभीर्याने करावे, तसेच अनेक लोक कचरा कर भरत नाहीत, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर जी बेकायदा घरे आहेत त्यांचे वीज व पाण्याचे कनेक्शन तोडले जाईल. कचरा समस्या सोडविण्याबाबत सरकार गंभीर आहे. त्यामुळे यापुढे दर आठ दिवसांनी कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

ज्या पंचायतींनी कचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदार नियुक्त केलेले नाहीत. त्या ठिकाणी सरकार त्यांची नियुक्त्ती करेल. प्रत्येक पंचायतीत एमआरएफ शेड उभारणे बंधनकारक राहील, पंचायत क्षेत्रात उघड्यावर कचऱ्याचे डीग दिसल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

आता प्रत्येक तालुक्यात घेणार आढावा बैठक

डिस्ट्रिक्ट मिनरल फंडच्या मार्फतही कचरा व्यवस्थापनाबाबत अनेक योजना असून त्याचाही लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी तालुक्यातील सरपंच व गट विकास अधिकाऱ्यांना कचरा व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके व विविध योजनांची माहिती देण्यात आली यापुढे प्रत्येक तालुक्यात अशा बैठका घेऊन कचरा व्यवस्थापनाचा आपण आढावा घेणार आहे.

पालिका, पंचायतींच्या कारभाऱ्यांची कानउघाडणी 

कचरा व्यवस्थापन व निर्मूलनासाठी सरकार वर्षाला चारशे कोटींहून अधिक रुपये खर्च करत असतानाही पालिका, पंचायत मंडळ, सचिव, संबंधित अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत. यापुढे असे चालणार नाही. प्रत्येकाला आपापल्या कार्यक्षेत्रातील कचरा व्यवस्थापन करावे लागेल, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत दिला.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत