शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार; मुख्यमंत्री कडाडले, अतिक्रमण करणाऱ्यांची गय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2024 09:16 IST

कचराप्रश्नी आक्रमक धोरण अवलंबणार,  आता प्रत्येक तालुक्यात घेणार आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यात अनेक ठिकाणी सरकारी जागा बळकावून घरे उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बेकायदा बांधकामांची वीज व पाणी कनेक्शन तोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे आता अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

डिचोली तालुक्यातील पालिका आधिकारी पंचायतीचे सरपंच, सचिव व गटविकास अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी साखळी येथे बैठक घेतली. तालुक्यातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कचरा समस्येबरोबर बेकायदा बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले. बैठकीला पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, पराग रांगणेकर, गटविकास अधिकारी ओंकार मांजरेकर यांच्यासह तालुक्यातील सर्व गटविकास अधिकारी, पंचायत सचिव, सरपंच उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कचरा व्यवस्थापनात डिचोली तालुक्यातील पालिका, पंचायतींना अपयश आले आहे. यापुढे त्यांची ही अकार्यक्षमता खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे तातडीने पालिका, पंचायतींनी आपापल्या परिसरातील कचरा व्यवस्थापन गांभीर्याने करावे, तसेच अनेक लोक कचरा कर भरत नाहीत, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर जी बेकायदा घरे आहेत त्यांचे वीज व पाण्याचे कनेक्शन तोडले जाईल. कचरा समस्या सोडविण्याबाबत सरकार गंभीर आहे. त्यामुळे यापुढे दर आठ दिवसांनी कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

ज्या पंचायतींनी कचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदार नियुक्त केलेले नाहीत. त्या ठिकाणी सरकार त्यांची नियुक्त्ती करेल. प्रत्येक पंचायतीत एमआरएफ शेड उभारणे बंधनकारक राहील, पंचायत क्षेत्रात उघड्यावर कचऱ्याचे डीग दिसल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

आता प्रत्येक तालुक्यात घेणार आढावा बैठक

डिस्ट्रिक्ट मिनरल फंडच्या मार्फतही कचरा व्यवस्थापनाबाबत अनेक योजना असून त्याचाही लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी तालुक्यातील सरपंच व गट विकास अधिकाऱ्यांना कचरा व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके व विविध योजनांची माहिती देण्यात आली यापुढे प्रत्येक तालुक्यात अशा बैठका घेऊन कचरा व्यवस्थापनाचा आपण आढावा घेणार आहे.

पालिका, पंचायतींच्या कारभाऱ्यांची कानउघाडणी 

कचरा व्यवस्थापन व निर्मूलनासाठी सरकार वर्षाला चारशे कोटींहून अधिक रुपये खर्च करत असतानाही पालिका, पंचायत मंडळ, सचिव, संबंधित अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत. यापुढे असे चालणार नाही. प्रत्येकाला आपापल्या कार्यक्षेत्रातील कचरा व्यवस्थापन करावे लागेल, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत दिला.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत